शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
2
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; १० वीचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता 
3
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
4
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
5
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
6
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
7
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
8
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
9
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
10
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
11
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
12
म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?
13
देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक वर्दीच्या मागे..."
14
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
15
गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
16
कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
17
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
18
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
19
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
20
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?

वसई रोड नव्हे, हे आहे असुविधांचे जंक्शन

By admin | Updated: January 22, 2016 02:01 IST

लोकल ट्रेन आणि दिवा-पनवेल मेमूसह पश्चिम, मध्य आणि उत्तर रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या किमान २५ गाड्यांचा थांबा असलेले वसई रोड रेल्वे स्टेशन पश्चिम रेल्वेवरील मिनी

वसई : लोकल ट्रेन आणि दिवा-पनवेल मेमूसह पश्चिम, मध्य आणि उत्तर रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या किमान २५ गाड्यांचा थांबा असलेले वसई रोड रेल्वे स्टेशन पश्चिम रेल्वेवरील मिनी जंक्शन मानले जाते. पण, रेल्वेने प्रवाशांना प्राथमिक सुविधा न दिल्याने वसई रोड रेल्वे स्टेशन असुविधांचे महाजंक्शन बनले आहे. वसई रोड रेल्वे स्टेशनवर सात फलाट आहेत. यातील एक ते पाच क्रमांकाच्या फलाटावून लोकल ट्रेनची ये-जा असते. फलाट क्रमांक एकपासून असुविधांचा पाढा सुरु होतो. मुख्य स्टेशनपासून दूरवर असलेला फलाट क्रमांक एकवर वारांगना, गर्दुल्ले, भिकारी, प्रेमी युुगुलांचा वावर असतो. पोलिसांचे त्यांना अभय असल्याने प्रवाशांना त्यांचा त्रास मुकाट्याने सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. या फलाटावर पंखे, विजेचे दिवे यांची कमतरता आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधुक प्रकाशात याठिकाणी समाजकंटकांची गैरकृत्ये सुरु असतात.या रेल्वे स्टेशनवरून लोकल आणि लांबपल्ल्यांच्या गाड्या मिळून दिवसाला किमान एक लाख चाळीस हजारांच्या आसपास प्रवासी ये-जा करीत असून त्यातून रेल्वेला दरदिवशी दहा लाखाच्या घरात उत्पन्न मिळते. वसई रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहाची सोय नाही. गैरसोयीच्या वसई रोड रेल्वे परिसरात गेल्या वर्षभरात अपघातात ५५ जणांनी आपला जीव गमावला आहे. फलाट क्रमांक एक हा जंक्शनवरील सर्वात घाणेरडा आणि गैरधंद्याचे आगार असलेला फलाट आहे. फलाट क्रमांक दोन, तीन, चार आणि पाचवरून बहुतांश लोकलची ये-जा आहे. पण, एकाही फलाटावर स्वच्छतागृहाची सोय नाही. फलाट क्रमांक दोन-तीनवर एक स्वच्छतागृह होते. पण, पादचारी पुलाच्या कामामुळे तेही नेस्तनाबूत करण्यात आले. फलाट क्रमांक दोन-तीनवर एक जुनी पाणपोई आहे. पण, अतिशय घाणेरड्या स्थितीत असलेल्या पाणपोईकडे कुणी ढुंकूनसुद्धा पहात नाही. फलाट क्रमांक एकवर एकही कँटीन नाही. फलाट क्रमांक चार व पाचवर देखील कुठल्याही प्राथमिक सुविधा नाहीत. या पाचही फलाटांवरून लोकलची ये-जा असते. चार व पाचवरुन लांबपल्ल्यांच्या गाड्याही सुटतात. याही फलाटांवर स्वच्छतागृह आणि पाणपोई नाही. त्यामुळे लोकलने प्रवास करून थकून भागून आलेल्या प्रवाशांना नैसर्गिक विधी करायची सोय नाही. पिण्याचे पाणी स्टॉलवरून विकत घ्यावे लागते. सध्या रेल्वेने फलाटावर अनेक कामे सुुरु केली आहेत. त्यासाठी रेती, माती, खडीचे फलाटांवरच ढीग लागलेले आहेत. गर्दीच्या वेळी धावपळ करणारे अनेक प्रवासी त्यामुळे पडताना दिसतात. सर्वच फलाटांची उंची कमी असल्याने प्रवाशांना चढ-उतार करताना त्रासदायक होते. सर्वच फलाटांवर पुरेसे पंखे नाहीत. बसायला पुरेशी बाके नाहीत. इंडिकेटरची संख्या देखील अपुरी आहे. फलाट क्रमांक एकवर दोन्ही दिशांना तिकीट खिडक्या आहेत. प्रवासी संख्येच्या मानाने त्या अपुऱ्या आहेत. पश्चिमेला एकच तिकीट खिडकी आहे. त्याठिकाणी चार खिड्क्या आणि पाच एटीव्हीएम मशिन्स आहेत. त्याही कमी पडत असल्याने तिकीटांसाठी लोकांच्या रांगा लागलेल्या दिसतात. फलाट क्रमांक चार, पाच, सहा आणि सातवरून दिवा आणि पनवेल मेमूसह लांबपल्ल्यांच्या पंचवीसहून अधिक गाड्यांची ये-जा आहे. त्या गाड्यांना बराच काळ थांबाही आहे. पण, एकाही फलाटावर स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. गाडीचा वाट पहात असलेल्या प्रवाशांना बसायला पुरेशी बाके नाहीत. फर्स्टक्लासच्या प्रवाशांसाठी विश्रांती कक्ष नाही. लांबपल्लयांच्या गाडया इतक्या मोठ्या प्रमाणावर असताना डब्या दर्शक इंडिकेटर नाहीत. त्यामुळे गाडी आली की डब्या शोधण्यासाठी प्रवाशांना अवजड सामान, मुले, वयस्कर लोकांना घेऊन पळापळ करावी लागते. विशेष म्हणजे सातही फलाटांना अद्याप पूर्णपणे छप्पर बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे ऊन आणि पावसाळ्यात प्रवाशांची मोठी गैरसोय होते. रेल्वेच्या सर्व स्टेशनला जोडून पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा सबवे कधीच मंजूर झाला आहे. पण, गेल्या दहा वर्षांपासून सवबेचे काम रखडून पडले आहे.