शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

वसईच्या बाजारात रानमेवा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 23:15 IST

जांभूळ, करवंद, आंबा : रासायनिक प्रक्रिया नसल्याने ग्राहकांची पसंती

पारोळ : आंबा अशा मोठ्या फळांबरोबर आपले अस्तित्व टिकवून ठेवलेला रानमेवा उन्हाळ्यात म्हणजेच ग्रीष्म ऋतूत दृष्टीस पडतो. या महिन्यात जांभूळ, राजन, करवंद, जाम वसईच्या बाजारात दाखल झाली असून ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. रानमेवा बाजारात दाखल झाल्याने उन्हाच्या काहिलीपासून लोकांना दिलासा देण्यास पूरक ठरते आहे.

हजारो वर्षांपासून चालत आलेली रानमेव्याची परंपरा काळाच्या ओघात बदलत गेली असली तरी आदिवासी समाजात अन्नाचा घटक म्हणून मान्यता असलेल्या रानमेव्याचे महत्त्व कमी झालेले नाही. रानावनात अतिदुर्गम ठिकाणी वास्तव्य करून राहिलेला आदिवासी समाज अनेक गोष्टींवर आपली उपजीविका चालवतात. त्यामुळे आदिवासींना हंगामी रोजगाराचे साधन उपलब्ध होते.

उन्हाळ्यात मध, करवंदे, गावठी आंबे, तोरणे, पायरी, पिंपळाची फळे, आवळा, रान फणस, ताडगोळे, भोकर, जाम, जांभळे गोळा करतात आणि बाजारात येऊन विकतात. वर्षांतून एकदाच आस्वाद घ्यायला मिळणारी ही फळे वसईच्या बाजारात दाखल झाल्याने ग्राहकांचा रानमेव्याकडे चांगलाच कल दिसून येत आहे. सफरचंद, संत्री अशा फळावर सुखावणारे ग्राहक आता सध्या रानमेव्याची खरेदी करताना दिसत आहेत. खेडयापाडयातून आलेल्या महिला टोपल्यातून ही फळे विकायला बसलेल्या बाजारात दिसत आहेत.

दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाडयात ही फळे खूप लाभदायक ठरतात. वेगवेगळया रोगांवर ती गुणकारी मानली जातात. सफरचंद, संत्री, आंबा, टरबूज, डाळिंब, चिकू, केळी या फळांवर मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रक्रि या करण्यात येते, त्यामुळे ही फळे आरोग्याला घातक असल्यामुळे रानमेव्याच्या रूपाने आरोग्यवर्धक पर्याय लोकांसाठी उपलब्ध आहे. आतुरतेने वाट पाहिल्या जाणाऱ्या या रानमेव्याचा भाग असलेली करवंदे आदिवासी बांधवांना एप्रिल अखेरपासून ते जूनपर्यंत साधारणपणे अडीच महिने रोजगार मिळवून देते.

भरपूर मागणीवसईच्या बाजारात १० रु पये एक वाटा या दराने ही करवंदे, जांभूळ विकली जातात. एका टोपलीत साधारणपणे ५० ते ६० वाटे असतात. त्यानुसार दिवसभरात ४५० ते ५०० रुपये त्यांना मिळत असल्याचेही रानमेवा विक्र ेत्या महिलांनी सांगितले. पाणीदार ताडगोळे शरीरातील उष्णता कमी करतात. त्यांनाही मागणी आहे

टॅग्स :Vasai Virarवसई विरार