शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

वसई विजयोत्सव एक दिवसात आटोपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:26 IST

नरवीर चिमाजी आप्पा यांनी १६ मे १७३९ रोजी युद्ध जिंकून पोर्तुगीजांच्या जाचातून वसईचा किल्ला जिंकला व वसई मुक्त केली होती. हा दिवस ‘वसई विजयोत्सव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

पारोळ : नरवीर चिमाजी आप्पा यांनी १६ मे १७३९ रोजी युद्ध जिंकून पोर्तुगीजांच्या जाचातून वसईचा किल्ला जिंकला व वसई मुक्त केली होती. हा दिवस ‘वसई विजयोत्सव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. तीन दिवस चालणारा हा उत्सव मागील सहा वर्षापासून वसई विरार महानगरपालिका, वसई विजयोत्सव स्मारक समिती आणि वसई तालुका कलाक्रीडा महोत्सव समिती यांच्या संयु्क्त विद्यामाने साजरा करत होता. यंदा मात्र यातून महापालिका अलिप्त असल्याने तो एकच दिवस साजरा होणार आहे.सोमवार, ३० एप्रिल रोजी केवळ वसई विजयोत्सव स्मारक समिती आणि वसई तालुका कला-क्र ीडा महोत्सव समिती यांच्या संयु्क्त विद्यामाने संपूर्ण दिवसभर यंदाच्या २८० व्या वसई विजय दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नरवीर चिमाजी अप्पांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पुजन सकाळी ७ वाजता स्मारक समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. किल्ला सफर या विषयावर डॉ. श्रीदत्त राऊत यांचे माहितीपूर्ण व्याख्यान आयोजीत करून दुपारी ३ वाजता वज्रेश्वरी ते वसई किल्ला अशी मशाल रॅली काढण्यात आली.या प्रसंगी आ. हितेद्र ठाकुर, आ. क्षितिज ठाकूर व आ. विलास तरे, तसेच महापौर रु पेश जाधव, उपमहापौर प्रकाश रॉड्रीक्स, स्थायी समिती सभापती असिफ शेख या मान्यवरांनी हजेरी लावली.विशिष्ट समूहाचे गुणगाण करणारे कुठलेच उत्सव साजरे करू नयेत, केवळ स्वातंत्र्य दिन म्हणजेच १५ आॅगस्ट हाच विजयोत्सव दिन असावा, अशी भूमिक समाजशुद्ध अभियानाचे फा. मायकल जी यांनी घेतली होती. त्यातच महापालिकांनी राष्ट्रीय सणा ंव्यतिरिक्त कोणतेही सण उत्सव साजरे करू नये असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. हा निर्णय आणि निर्माण झालेला वाद यामुळे यंदा महापालिकेने विजयोत्सवापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे.