शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

‘त्या’५० गावांसाठी अंडर बायपासची गरज

By admin | Updated: July 21, 2015 04:58 IST

मुंबई-नाशिक महामार्गालगत खारेगाव टोलनाका ते वडपे दरम्यान तालुक्यातील आठ मुख्य गावे येत असून या गावास जोडणारी इतर गावे आहेत.

भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गालगत खारेगाव टोलनाका ते वडपे दरम्यान तालुक्यातील आठ मुख्य गावे येत असून या गावास जोडणारी इतर गावे आहेत. त्या सर्व ग्रामस्थांना नियमित रस्त्यापलीकडे जाण्यासाठी अंडर बायपास मार्ग करावा, अशी मागणी परिसरातील ५० गावांतून जोर धरू लागली आहे.या महामार्गालगतच्या गावांतील नागरिकांना रस्त्यापलीकडे जाण्या-येण्याकरिता अंडर बायपास मार्ग केले आहेत. मात्र, वडपे ते खारेगाव टोलनाकादरम्यान मुख्य आठ गावे असली तरी या गावांना जोडणारी किमान ५० छोटी-मोठी गावे आहेत. त्या गावातील ग्रामस्थांना शहरात जाण्या-येण्यासाठी रस्ते महामंडळाने कोणताही सर्व्हिस रोड अथवा अंडर बायपास ठेवलेला नाही. त्यामुळे गावात जाण्यासाठी रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांचा व दुचाकी वाहनचालकांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सध्या खारेगाव टोलनाका ते वडपादरम्यान रस्ता रुंदीकरणाचे तसेच माणकोली, रांजनोली व वडपा येथे उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. या गावांतील ग्रामस्थांना रस्त्यापलीकडे जाणारा वाहतुकीचा मार्ग अथवा सुविधा केलेली नाही. त्यामुळे महामार्गावरून भरधाव वेगाने जाणारी वाहने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना व दुचाकींना ठोकर मारून पळून जातात. तसेच झेब्रा पट्ट्यावरील वाहने व पादचाऱ्यांनादेखील ठोकर मारून पळून जाण्याच्या घटना रात्रंदिवस घडत आहेत. या सर्व घटनांमुळे ग्रामस्थांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.