शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

वसईत वनजमिनींवर अनधिकृत बांधकामे

By admin | Updated: August 11, 2015 23:36 IST

वसई-विरार पुर्वेस तुंगारेश्वर, तिल्हेर, पेल्हार भागात असलेल्या जंगलामध्ये भूमाफीया सक्रीय झाले आहेत. सरसकट वनजमीनी बळकावून त्यावर अनधिकृत बांधकामे करण्याचा सपाटाच

वसई : वसई-विरार पुर्वेस तुंगारेश्वर, तिल्हेर, पेल्हार भागात असलेल्या जंगलामध्ये भूमाफीया सक्रीय झाले आहेत. सरसकट वनजमीनी बळकावून त्यावर अनधिकृत बांधकामे करण्याचा सपाटाच त्यांनी लावला आहे. या भूमाफीयांना वनखात्यातीलच कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत असल्यामुळे भविष्यात येथील जंगलातील मौल्यवान वनस्पती नष्ट होण्याची शक्यता आहे.काही वर्षांपासून वसई विरार उपप्रदेशाच्या पूर्व भागातील वनक्षेत्र हळुहळू कमी होत आहे. अनधिकृत चाळी, दगडखाणी तसेच झोपडपट्ट्यांचे पेव फुटल्याने वनजमीनी गिळंकृत होत आहेत. तुंगारेश्वरच्या जंगलात मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती आहेत. मात्र, जमीनी गिळंकृत करण्यासाठी होत असलेल्या वृक्षकत्तलीमध्ये हा ठेवा नष्ट होत आहे. मध्यंतरी वनविभागाने येथील नागरीकांना ये-जा करण्यासाठी असलेला मार्ग बंद करण्याचा घाट घातला होता परंतु वनजमीनी बळकावणाऱ्या भूमाफीयांना मात्र त्यांनी मोकळे रान दिले. त्यामुळे गेल्या १५ वर्षात हजारो हेक्टर वनजमीनी भूमाफीयांच्या ताब्यात गेल्या. या सर्व गैरकारभाराला वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेच सहकार्य मिळत असल्याने भूमाफीयांची हिम्मत वाढली आहे. नालासोपारा पूर्वेस तुळींज भागात असलेल्या डोंगरावरही अनधिकृत बांधकाम दिवसेंदिवस वाढत आहे. येथे तत्कालीन नालासोपारा नगरपरिषदेने सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून वृक्षलागवड केली होती. परंतु अल्पावधीतच भूमाफीयांनी या या जंगलात वणवे लावून येथील जागा गिळंकृत केली. पूर्व भागात महामार्गालगत असलेल्या अनेक ठिकाणी वनजमीनीवर सरसकट अतिक्रमणे होत आहेत. वन जमीनीचा कारभार हा महसूल विभागाच्या अंतर्गत येत नसल्यामुळे अनधिकृत दगडखाणीही येथे उभारण्यात आल्या आहेत. मध्यंतरी शिरवली गावात अशाच एका दगडखाणीने पर्यावरणाचे सारे नियम धाब्यावर बसवत प्रचंड खडी काढली. परंतु त्या मोबदल्यात सरकारच्या तिजोरीत कोणताही महसूल जमा केलेला नाही. (प्रतिनिधी)