शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

उमरोळी एक आदर्श गाव बनवणार- आठवले

By admin | Updated: October 29, 2015 23:21 IST

देशाच्या अर्थव्यवस्थेमुळे श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब आणखीन गरीब होत दोघांतली दरी वाढत चालली आहे. आपला देश स्वतंत्र झाला असला तरी सर्वसामान्य माणूस अजूनही स्वातंत्र्याची फळे खऱ्या

पालघर : देशाच्या अर्थव्यवस्थेमुळे श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब आणखीन गरीब होत दोघांतली दरी वाढत चालली आहे. आपला देश स्वतंत्र झाला असला तरी सर्वसामान्य माणूस अजूनही स्वातंत्र्याची फळे खऱ्या अर्थाने चाखू शकला नसल्याची खंत रिपब्लिकन पक्षाचे खासदार रामदास आठवले यांनी उमरोळी येथील कार्यक्रमात व्यक्त केली.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साकारलेल्या सांसद आदर्श ग्रामयोजनेंतर्गत खासदार आठवले यांनी पालघर तालुक्यातील उमरोळी या गावाची निवड केली आहे. या गावातील विकासकामांचे उद्घाटन गुरुवारी त्यांच्या हस्ते करण्यात आले. गावस्तर व तालुकास्तरावरील सर्व अधिकाऱ्यांची सभा घेऊन गावाची गरज लक्षात घेऊन ६३ कामांची निवड करून प्रारूप विकास आराखडा मंजूर करण्यात आला होता. यामध्ये खारे पाणी प्रतिबंधक बंधारा, बायपास रोड, गटार बांधकाम, विद्युत वितरण विभागांतर्गत कामे, पाणीपुरवठा, वृक्षलागवड, इ ६३ प्रकारच्या कामांसाठी ६ कोटी ३० लाखांच्या खर्चाच्या निधीचा मंजूर आराखडा तयार करण्यात आला असून खासदार व जिल्हाधिकाऱ्याने या कामांना मंजुरीही दिली आहे. त्यापैकी राजस्व अभियानांतर्गत दाखलेवाटप, औषध फवारणी, तलावातील गाळ काढणे, रस्ते उभारणे इ. कामे पूर्ण झाली आहेत, तर आरोग्य उपकेंद्रे, पाण्याची टाकी उभारणे, वाचनालय, फळझाडे लागवड, कर्मचारी निवासस्थान इ. कामांचे भूमिपूजन झाले.या वेळी पालकमंत्री विष्णू सवरा, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, जि.प. सभापती अशोक वडे, पं.स. सभापती रवींद्र पागधरे, बविआ तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, सुधीर बारशिंगे, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव उपस्थित होते. (वार्ताहर)