शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

उमरोळी एक आदर्श गाव बनवणार- आठवले

By admin | Updated: October 29, 2015 23:21 IST

देशाच्या अर्थव्यवस्थेमुळे श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब आणखीन गरीब होत दोघांतली दरी वाढत चालली आहे. आपला देश स्वतंत्र झाला असला तरी सर्वसामान्य माणूस अजूनही स्वातंत्र्याची फळे खऱ्या

पालघर : देशाच्या अर्थव्यवस्थेमुळे श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब आणखीन गरीब होत दोघांतली दरी वाढत चालली आहे. आपला देश स्वतंत्र झाला असला तरी सर्वसामान्य माणूस अजूनही स्वातंत्र्याची फळे खऱ्या अर्थाने चाखू शकला नसल्याची खंत रिपब्लिकन पक्षाचे खासदार रामदास आठवले यांनी उमरोळी येथील कार्यक्रमात व्यक्त केली.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साकारलेल्या सांसद आदर्श ग्रामयोजनेंतर्गत खासदार आठवले यांनी पालघर तालुक्यातील उमरोळी या गावाची निवड केली आहे. या गावातील विकासकामांचे उद्घाटन गुरुवारी त्यांच्या हस्ते करण्यात आले. गावस्तर व तालुकास्तरावरील सर्व अधिकाऱ्यांची सभा घेऊन गावाची गरज लक्षात घेऊन ६३ कामांची निवड करून प्रारूप विकास आराखडा मंजूर करण्यात आला होता. यामध्ये खारे पाणी प्रतिबंधक बंधारा, बायपास रोड, गटार बांधकाम, विद्युत वितरण विभागांतर्गत कामे, पाणीपुरवठा, वृक्षलागवड, इ ६३ प्रकारच्या कामांसाठी ६ कोटी ३० लाखांच्या खर्चाच्या निधीचा मंजूर आराखडा तयार करण्यात आला असून खासदार व जिल्हाधिकाऱ्याने या कामांना मंजुरीही दिली आहे. त्यापैकी राजस्व अभियानांतर्गत दाखलेवाटप, औषध फवारणी, तलावातील गाळ काढणे, रस्ते उभारणे इ. कामे पूर्ण झाली आहेत, तर आरोग्य उपकेंद्रे, पाण्याची टाकी उभारणे, वाचनालय, फळझाडे लागवड, कर्मचारी निवासस्थान इ. कामांचे भूमिपूजन झाले.या वेळी पालकमंत्री विष्णू सवरा, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, जि.प. सभापती अशोक वडे, पं.स. सभापती रवींद्र पागधरे, बविआ तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, सुधीर बारशिंगे, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव उपस्थित होते. (वार्ताहर)