शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

आदिवासी भागात समिती फिरकलीच नाही

By admin | Updated: April 23, 2017 03:56 IST

विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी किनारपट्टीच्या काहीभागाचा धावता दौरा करून आदीवासी प्रदेशात येण्याचे टाळल्याने अधिकारी

- सुरेश काटे,  तलासरी

विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी किनारपट्टीच्या काहीभागाचा धावता दौरा करून आदीवासी प्रदेशात येण्याचे टाळल्याने अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या परीसरातल्या समस्यांबाबत मोठ्या मेहनतीने गोळा केलेली माहिती यामुळे निरर्थक ठरली आहे. तसेच समितीच्या दौऱ्यामुळे येथील काही समस्या सुटतील ही जनतेची अपेक्षाही फोल ठरली आहे. पालघर जिल्हा दौरा २० एप्रिल २०१७ या रोजी पासून आयोजित करण्यात आला होता, या दौऱ्यादरम्यान पालघर जिल्ह्यातील तलासरी आदिवासी ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या, विविध प्रश्न, शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, वसतीगृह तसेच विविध योजनांच्या सुरु असलेल्या कामाचा आढावा व त्रुटी, निकृष्ट कामांची पाहणी ही समिती करेल, अशी अपेक्षा जनता करीत होती. परंतु ती फोल ठरली. या समितीचे सदस्य आमदार पास्कल धनारे हे तलासरीतील असल्याने ते या समितीला तलासरीत आणून येथील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील या जनतेच्या अपेक्षेचाही भंग झाला आहे.आमदार रूपेश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये आमदार वैभव पिचड, पांडुरंग बरोरा, आनंद ठाकूर, निरंजन डावखरे, राजू तोडसाम, पास्कल धनारे, काशीराम पावरा, चंद्रकांत सोनवणे, संजय पुरम, डॉ.अशोक उइके, उपसचिव ना.रा.थिटे, ए.बी. रहाटे कक्ष अधिकारी इत्यादी दौऱ्यावर होते, मात्र या समितीने तलासरी तालुक्यातील आदिवासी बहुल भागाकडे पाठ फिरवल्याने जनतेने नाराजी व्यक्त केली, दौऱ्याचा शेवटचा दिवस असल्याने आणि समिती येणार असल्याचे समजल्याने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. भेट देऊन आश्रमशाळा नवीन इमारतींचे बांधकाम, सब सेंटर, झाई नवीन पूल बांधकाम इत्यादीचा समितीने आढावा घेतला. त्यानंतर तलासरी भागात दौरा होणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने अधिकारी आवश्यक माहिती घेऊन हजर होते मात्र तालुक्यातील अन्य भागात भेटी न देता सरळ निघून गेल्याने नागरिक नाराज तर तलासरी तालुक्याच्या काही भागाचा दौरा अचानक रद्द करण्यात आल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. जि.प. सदस्याचा सवाल- तलासरी आदिवासी भागात अनेक समस्या असतांना या भागाकडे समितीने पाठ फिरवल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. - तिने तलासरी डहाणूच्या आदिवासी भागात न येता फक्त किनारपट्ट्याची सफर करून कोणते मोठे असे उदिष्ट साध्य केले असा प्रश्न उपस्थित केला आहे.