शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
2
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
3
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
4
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
5
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
6
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
7
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
8
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
9
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
10
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
11
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
12
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
13
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
14
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
15
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
16
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
17
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
18
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
19
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
20
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर

आदिवासी भागात समिती फिरकलीच नाही

By admin | Updated: April 23, 2017 03:56 IST

विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी किनारपट्टीच्या काहीभागाचा धावता दौरा करून आदीवासी प्रदेशात येण्याचे टाळल्याने अधिकारी

- सुरेश काटे,  तलासरी

विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी किनारपट्टीच्या काहीभागाचा धावता दौरा करून आदीवासी प्रदेशात येण्याचे टाळल्याने अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या परीसरातल्या समस्यांबाबत मोठ्या मेहनतीने गोळा केलेली माहिती यामुळे निरर्थक ठरली आहे. तसेच समितीच्या दौऱ्यामुळे येथील काही समस्या सुटतील ही जनतेची अपेक्षाही फोल ठरली आहे. पालघर जिल्हा दौरा २० एप्रिल २०१७ या रोजी पासून आयोजित करण्यात आला होता, या दौऱ्यादरम्यान पालघर जिल्ह्यातील तलासरी आदिवासी ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या, विविध प्रश्न, शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, वसतीगृह तसेच विविध योजनांच्या सुरु असलेल्या कामाचा आढावा व त्रुटी, निकृष्ट कामांची पाहणी ही समिती करेल, अशी अपेक्षा जनता करीत होती. परंतु ती फोल ठरली. या समितीचे सदस्य आमदार पास्कल धनारे हे तलासरीतील असल्याने ते या समितीला तलासरीत आणून येथील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील या जनतेच्या अपेक्षेचाही भंग झाला आहे.आमदार रूपेश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये आमदार वैभव पिचड, पांडुरंग बरोरा, आनंद ठाकूर, निरंजन डावखरे, राजू तोडसाम, पास्कल धनारे, काशीराम पावरा, चंद्रकांत सोनवणे, संजय पुरम, डॉ.अशोक उइके, उपसचिव ना.रा.थिटे, ए.बी. रहाटे कक्ष अधिकारी इत्यादी दौऱ्यावर होते, मात्र या समितीने तलासरी तालुक्यातील आदिवासी बहुल भागाकडे पाठ फिरवल्याने जनतेने नाराजी व्यक्त केली, दौऱ्याचा शेवटचा दिवस असल्याने आणि समिती येणार असल्याचे समजल्याने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. भेट देऊन आश्रमशाळा नवीन इमारतींचे बांधकाम, सब सेंटर, झाई नवीन पूल बांधकाम इत्यादीचा समितीने आढावा घेतला. त्यानंतर तलासरी भागात दौरा होणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने अधिकारी आवश्यक माहिती घेऊन हजर होते मात्र तालुक्यातील अन्य भागात भेटी न देता सरळ निघून गेल्याने नागरिक नाराज तर तलासरी तालुक्याच्या काही भागाचा दौरा अचानक रद्द करण्यात आल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. जि.प. सदस्याचा सवाल- तलासरी आदिवासी भागात अनेक समस्या असतांना या भागाकडे समितीने पाठ फिरवल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. - तिने तलासरी डहाणूच्या आदिवासी भागात न येता फक्त किनारपट्ट्याची सफर करून कोणते मोठे असे उदिष्ट साध्य केले असा प्रश्न उपस्थित केला आहे.