शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:15 IST

वेळीच स्वच्छता आवश्यक; अन्यथा पर्यटनावर परिणाम होण्याची भीती

पालघर : जिल्ह्यात आठवडाभरापासून कोसळणाºया मुसळधार पावसामुळे समुद्राला मोठी भरती येऊन जिल्ह्याच्या ११० किमी.च्या किनाºयावर प्लास्टिक वजा कचºयाचे तसेच डांबर गोळ्यांचे ढीग जमले आहेत. सुंदर आणि स्वच्छ म्हणून ओळखल्या जाणाºया या किनाºयावरची स्वच्छता वेळीच न झाल्यास पर्यटकांची संख्या रोडावण्याची भीती व्यक्त होत आहे.पालघर जिल्ह्याला वसई ते झाई - बोर्डी असा एकूण ११० किमी.चा समुद्र किनारा लाभला आहे. कळंब, रानगाव, अर्नाळा, कोरे, केळवे, शिरगाव, सातपाटी, नांदगाव, वरोर, डहाणू, बोर्डी आदी किनारपट्टीवरील गावात मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसाय केला जातो. केळवे, बोर्डी या भागाला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात पसंती असल्याने लाखो पर्यटक वर्षभर या भागात येत असतात. परंतु, शनिवारी वर्षभरातील सर्वात मोठी भरती (५.८८ मीटर्सच्या लाटा) असल्याने आणि त्यातच मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पाण्याबरोबर वाहत आलेला कचरा ओहोटी लागल्यानंतर कळंब, रानगाव, अर्नाळा, केळवे, शिरगाव, सातपाटीच्या किनाºयावर आला आहे. समुद्रातील ओएनजीसीच्या तेल उत्खननामुळे आणि मोठ्या तेलवाहू जहाजातून निघालेले तेल एकत्र येत त्याचे डांबर गोळे किनाºयावर लागले असून प्लास्टिक पिशव्यांचा मोठा खचही किनाºयावर दिसतो आहे. शनिवार-रविवारी जिल्ह्यात फिरायला आलेल्या पर्यटकांची या कचºयामुळे निराशा झाल्याचे दिसले. पर्यटन वाढीसाठी शासन कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत असताना कचरा साफ करणे गरजेचे बनले आहे.जिल्ह्यातील सरावली, सातपाटी, शिरगाव, केळवे आदी अनेक भागातील कचरा उचलून तो किनाºया लगतच टाकला जात असल्याने तो पुन्हा पावसाच्या पाण्याने वहात समुद्राला जाऊन मिळतो. ग्रामपंचायतीने याची काळजी घेत समुद्रापासून लांब आपले स्वत:चे डम्पिंग ग्राउंड बनवणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे पालघर नगर परिषदेकडून पूर्ण पालघर शहराचा, बिडको आदी औद्योगिक क्षेत्रातील कचरा वाहत पानेरी खाडीमार्गे समुद्राला मिळत असल्याने सर्व किनारे कचºयाने विद्रूप झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे.आपले सुंदर किनारे टिकवून ठेवण्याची जबाबदारी सर्वांची असून प्लास्टिक बंदी आणि रासायनिक सांडपाण्यावर निर्बंध घालण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळ अपयशी ठरले आहे.- प्रल्हाद उर्फ बाबा कदम, सदस्य पर्यावरण नियंत्रण समिती, पालघर