शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:15 IST

वेळीच स्वच्छता आवश्यक; अन्यथा पर्यटनावर परिणाम होण्याची भीती

पालघर : जिल्ह्यात आठवडाभरापासून कोसळणाºया मुसळधार पावसामुळे समुद्राला मोठी भरती येऊन जिल्ह्याच्या ११० किमी.च्या किनाºयावर प्लास्टिक वजा कचºयाचे तसेच डांबर गोळ्यांचे ढीग जमले आहेत. सुंदर आणि स्वच्छ म्हणून ओळखल्या जाणाºया या किनाºयावरची स्वच्छता वेळीच न झाल्यास पर्यटकांची संख्या रोडावण्याची भीती व्यक्त होत आहे.पालघर जिल्ह्याला वसई ते झाई - बोर्डी असा एकूण ११० किमी.चा समुद्र किनारा लाभला आहे. कळंब, रानगाव, अर्नाळा, कोरे, केळवे, शिरगाव, सातपाटी, नांदगाव, वरोर, डहाणू, बोर्डी आदी किनारपट्टीवरील गावात मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसाय केला जातो. केळवे, बोर्डी या भागाला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात पसंती असल्याने लाखो पर्यटक वर्षभर या भागात येत असतात. परंतु, शनिवारी वर्षभरातील सर्वात मोठी भरती (५.८८ मीटर्सच्या लाटा) असल्याने आणि त्यातच मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पाण्याबरोबर वाहत आलेला कचरा ओहोटी लागल्यानंतर कळंब, रानगाव, अर्नाळा, केळवे, शिरगाव, सातपाटीच्या किनाºयावर आला आहे. समुद्रातील ओएनजीसीच्या तेल उत्खननामुळे आणि मोठ्या तेलवाहू जहाजातून निघालेले तेल एकत्र येत त्याचे डांबर गोळे किनाºयावर लागले असून प्लास्टिक पिशव्यांचा मोठा खचही किनाºयावर दिसतो आहे. शनिवार-रविवारी जिल्ह्यात फिरायला आलेल्या पर्यटकांची या कचºयामुळे निराशा झाल्याचे दिसले. पर्यटन वाढीसाठी शासन कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत असताना कचरा साफ करणे गरजेचे बनले आहे.जिल्ह्यातील सरावली, सातपाटी, शिरगाव, केळवे आदी अनेक भागातील कचरा उचलून तो किनाºया लगतच टाकला जात असल्याने तो पुन्हा पावसाच्या पाण्याने वहात समुद्राला जाऊन मिळतो. ग्रामपंचायतीने याची काळजी घेत समुद्रापासून लांब आपले स्वत:चे डम्पिंग ग्राउंड बनवणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे पालघर नगर परिषदेकडून पूर्ण पालघर शहराचा, बिडको आदी औद्योगिक क्षेत्रातील कचरा वाहत पानेरी खाडीमार्गे समुद्राला मिळत असल्याने सर्व किनारे कचºयाने विद्रूप झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे.आपले सुंदर किनारे टिकवून ठेवण्याची जबाबदारी सर्वांची असून प्लास्टिक बंदी आणि रासायनिक सांडपाण्यावर निर्बंध घालण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळ अपयशी ठरले आहे.- प्रल्हाद उर्फ बाबा कदम, सदस्य पर्यावरण नियंत्रण समिती, पालघर