शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:15 IST

वेळीच स्वच्छता आवश्यक; अन्यथा पर्यटनावर परिणाम होण्याची भीती

पालघर : जिल्ह्यात आठवडाभरापासून कोसळणाºया मुसळधार पावसामुळे समुद्राला मोठी भरती येऊन जिल्ह्याच्या ११० किमी.च्या किनाºयावर प्लास्टिक वजा कचºयाचे तसेच डांबर गोळ्यांचे ढीग जमले आहेत. सुंदर आणि स्वच्छ म्हणून ओळखल्या जाणाºया या किनाºयावरची स्वच्छता वेळीच न झाल्यास पर्यटकांची संख्या रोडावण्याची भीती व्यक्त होत आहे.पालघर जिल्ह्याला वसई ते झाई - बोर्डी असा एकूण ११० किमी.चा समुद्र किनारा लाभला आहे. कळंब, रानगाव, अर्नाळा, कोरे, केळवे, शिरगाव, सातपाटी, नांदगाव, वरोर, डहाणू, बोर्डी आदी किनारपट्टीवरील गावात मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसाय केला जातो. केळवे, बोर्डी या भागाला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात पसंती असल्याने लाखो पर्यटक वर्षभर या भागात येत असतात. परंतु, शनिवारी वर्षभरातील सर्वात मोठी भरती (५.८८ मीटर्सच्या लाटा) असल्याने आणि त्यातच मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पाण्याबरोबर वाहत आलेला कचरा ओहोटी लागल्यानंतर कळंब, रानगाव, अर्नाळा, केळवे, शिरगाव, सातपाटीच्या किनाºयावर आला आहे. समुद्रातील ओएनजीसीच्या तेल उत्खननामुळे आणि मोठ्या तेलवाहू जहाजातून निघालेले तेल एकत्र येत त्याचे डांबर गोळे किनाºयावर लागले असून प्लास्टिक पिशव्यांचा मोठा खचही किनाºयावर दिसतो आहे. शनिवार-रविवारी जिल्ह्यात फिरायला आलेल्या पर्यटकांची या कचºयामुळे निराशा झाल्याचे दिसले. पर्यटन वाढीसाठी शासन कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत असताना कचरा साफ करणे गरजेचे बनले आहे.जिल्ह्यातील सरावली, सातपाटी, शिरगाव, केळवे आदी अनेक भागातील कचरा उचलून तो किनाºया लगतच टाकला जात असल्याने तो पुन्हा पावसाच्या पाण्याने वहात समुद्राला जाऊन मिळतो. ग्रामपंचायतीने याची काळजी घेत समुद्रापासून लांब आपले स्वत:चे डम्पिंग ग्राउंड बनवणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे पालघर नगर परिषदेकडून पूर्ण पालघर शहराचा, बिडको आदी औद्योगिक क्षेत्रातील कचरा वाहत पानेरी खाडीमार्गे समुद्राला मिळत असल्याने सर्व किनारे कचºयाने विद्रूप झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे.आपले सुंदर किनारे टिकवून ठेवण्याची जबाबदारी सर्वांची असून प्लास्टिक बंदी आणि रासायनिक सांडपाण्यावर निर्बंध घालण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळ अपयशी ठरले आहे.- प्रल्हाद उर्फ बाबा कदम, सदस्य पर्यावरण नियंत्रण समिती, पालघर