शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

प्रकल्प अधिकाऱ्याची बदली वसतिगृह प्रवेशाच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:50 IST

डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आँचल गोयल यांची दीड महिन्यांपूर्वी बदली झाल्या नंतर नवे प्रकल्प अधिकारीच नियुक्त न झाल्याने नवीन शैक्षणिक वर्षातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृह प्रवेशाचा प्रश्न रखडला

शशिकांत ठाकूरकासा : डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आँचल गोयल यांची दीड महिन्यांपूर्वी बदली झाल्या नंतर नवे प्रकल्प अधिकारीच नियुक्त न झाल्याने नवीन शैक्षणिक वर्षातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृह प्रवेशाचा प्रश्न रखडला आहे. यावर्षीपासुन नवे वसतीगृह आणि विद्यार्थ्यांच्या जुन्या क्षमतेत वाढ करण्याची मागणी आदिवासी संघटनांनी केली होती. मात्र, याचा निर्णय घेण्यासाठी अधिकारीच नसल्याने निर्णयाआभावी विद्यार्थ्यांची परवड होणार आहे.आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत डहाणू, तलासरी, पालघर, वसई या तालुक्याचा समावेश होत असून या भागातील आदिवासीबहूल क्षेत्रात १७ निवासी वस्तीगृहे तसेच ३५ आश्रमशाळा याबरोबर अनुदानित शाळा सुरु केल्या आहेत. आदिवासी समाजाती विद्यार्थी अलिकडच्या काळात शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. मात्र, दुर्गम खेड्यातील विद्यार्थ्यांना अपुर्ण दळणवळण सुविधा व आर्थिक परिस्थितीमुळे वसतीगृह हाच पर्याय असतो. १५ जून पासून शाळा सुरु झाल्या असल्याने आजही अनेक जण पदरमोड करुन किंवा उसनवारीकरुन शाळेत येत आहेत.२०१८ या शैक्षणिक वर्षामध्ये आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून १९९५ सालचे निकष लावले जात असल्याने दरवर्षी अनेक होतकरु विद्यार्थ्यांना वसतीगृहात जागाच नसल्याने शिक्षणाच्या मुख्यधारेतून दुर व्हावे लागत आहे. एकिकडे उत्तीर्ण होणाºया आदिवासी विद्यार्थ्यांच्या संख्येत दरवर्षी होणारी वाढ होत असून गत दहा वर्षात एकही नवीन वस्तीगृह उघडले न जाणे राज्य सरकारच्या शिक्षणाच्या धोरणाला छेद देणार आहे. त्यातच सध्या उभी असणारी वसतीगृहे आणि आश्रमशाळा यांच्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. त्यातच तुटपुंज्या दरामुळे भाड्याने इमारती मिळत नसल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांची प्रचंड परवड होते आहे.शहरीभागात उच्च शिक्षणासाठी जाणाºया विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच इतर खर्च दिला जात असल्याने ते मोठ्या प्रमाणात शिक्षणाकडे वळू लागले आहेत. मात्र, प्रत्यक्षात डहाणू, तलासरी, पालघर, वसई सारख्या ठिकाणच्या वस्तीगृह तसेच आश्रमशाळा कमी पडू लागल्या आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी आदिवासी संघटना सक्रिय होत आहेत.शैक्षणिक वर्ष २०१८मध्ये १९९५ चे मापदंड१९९५ साली आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदीवासी विकास विभागामार्फत त्यावेळी ठाणे जिल्हयात आदिवासी वसतीगृह सुरु करण्यात आली. या परिस्थीला आज तब्बल २० वर्षाचा कालावधी उलटुन गेला आहे. मात्र वसतीगृहाची २० वर्षापुर्वीचीच विद्यार्थ्यांची क्षमता ठेवली आहे. त्यामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. वसतीगृहाची क्षमता ७५ विद्यार्थ्यांची असून ती संख्याही वाढलेली नाही. वाढत्या संख्येला वसतीगृहामध्ये प्रवेश घेताना प्रयत्नांची शर्थ करावी लागते. त्यामुळे आदिवासी विकास विभागाने यात हस्तक्षेप करण्याची मागणी आहे.