शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

डहाणूत अवैध पार्किंगमुळे होते वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 23:08 IST

दंडात्मक कारवाई औटघटकेची : शहरवासीयांचा जीव मेटाकुटीला; वेळीच कारवाई करण्याची मागणी

शौकत शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : डहाणू रोड रेल्वे स्थानकाबाहेरच्या मुख्य रस्त्यावर, असंख्य विनापरवाना बेशिस्त वाहनांनी रस्त्याच्या कडेला अनधिकृत पार्किंग सुरू केले आहे. तसेच फळे, भाजीपाला विक्रेते व फेरीवाल्यांनी डहाणू शहरवासीयांचा जीव मेटाकुटीला आणला आहे. या अवैध पार्किंगविरुद्ध पोलिसांनी हाती घेतलेली दंडात्मक मोहीमही औटघटकेची ठरली आहे.डहाणू पोलीस ठाण्याच्या बाहेरचा थर्मल पॉवर रस्ता, रेल्वे स्थानकाबाहेरचा रस्ता, इराणी रोड आणि सागरनाका या रस्त्याच्या बाजूला अनधिकृतपणे पार्किंग करून ठेवलेल्या वाहनाविरुद्ध, डहाणू पोलिसांनी दंडात्मक मोहीम उघडून, ८० हजारांचा दंडही वसूल केला होता, मात्र थोड्याच दिवसात ही मोहीम बारगळली आणि अवैद्य वाहनतळांनी डोके वर काढले आहे.शहरातील रस्त्याच्या बाजूला अवैधपणे पार्किंग करून ठेवलेल्या वाहनांमुळे महिला, वयोवृद्ध नागरिक, लहान मुले आणि गर्भवती महिलांना रस्ता ओलांडण्यासाठी जोखीम पत्करावी लागत आहे. डहाणू परिसरात फेरीवाले, हातगाडीवाले, फळे भाजीपाला विक्रेते आणि रिक्षावाल्यांनी मुख्य रस्ते अडवले आहेत. रेल्वे स्थानकाबाहेर पूर्वापार असलेले भाजी मार्केट काही वर्षांपूर्वी डहाणू नगरपरिषदेने तोडून, त्यातील काही जागा दोन रिक्षातळांसाठी दिली होती, मात्र रिक्षाचालक या जागेवर चार चार रिक्षा लावून मुख्य रस्ताच अडवत आहेत. शिवाय रेल्वे गाडी येण्याच्या वेळी, हे रिक्षाचालक रेल्वे फाटकातच घोळका करून राहात असतात. त्यामुळे संपूर्ण रस्ताच अडवला जातो आणि प्रवाशांना त्याचा त्रास भोगावा लागतो.याबाबत डहाणू नगरपरिषदेकडे नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. येथील मुख्य रस्त्यावर काही नोकरदार मंडळी बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग करून बिनदिक्कत कामावर जात असतात. त्याचप्रमाणे फेरीवाले, हातगाडीवाले तसेच काही वाहने मनमानीपणे उलट-सुलट पार्किंग करून ठेवलेली असतात. या असंख्य वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर चालणेही कठीण झाले आहे, डहाणूहून कासा, चारोटी, महालक्ष्मी, चिंचणी, कोसबाड, घोलवड अशा अनेक गावांत जाणाऱ्या सुमारे हजार रिक्षा आहेत. यातील २० टक्के रिक्षा विनापरवाना बेकायदेशीरपणे चालत आहेत. प्रवासी मिळवण्यासाठी रिक्षाचालकांत स्पर्धा चालत असल्याने अनेकदा अपघात होतात.