शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

अंगठ्यामुळे वाढणार कोरोनाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 23:20 IST

मोफत धान्यासाठीची ई-पॉस यंत्रणा : वापर चुकीचा असल्याचे दुकानदारांचे मत

सुनील घरतलोकमत न्यूज नेटवर्क पारोळ : आर्थिकदृष्ट्या दुर्बल शिधापत्रिकाधारकांना १ मे या महाराष्ट्र दिनापासून मोफत अन्नधान्य शिधावाटप दुकानांतून करण्यात येत आहे. सध्याचा कोरोनाचा कहर पाहता ई-पॉसवर अंगठा घेऊन अन्नधान्य वाटप करणे चुकीचे असल्याचे बोलले जात आहे. यामुळे दुकानदार, शिधापत्रिकाधारकांना याचा धोका निर्माण होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

रेशनवर प्रत्येक व्यक्तीला तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत दिले जात आहेत. जिल्ह्यातील एकूण साडेबारा लाख शिधापत्रिकाधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे. वसई शहरात शनिवारपासून या अन्नधान्य वाटपाला प्रारंभ झाला आहे. ‘ब्रेक द चेन’अंतर्गत घातलेल्या कडक निर्बंधांमुळे मागील १५ दिवसांपासून अनेक व्यवसाय बंद आहेत. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी १५ मेपर्यंत वाढवल्याने गरीब, मजूरवर्गापुढील समस्या गंभीर बनल्या आहेत. कामधंदा बंद झाल्यामुळे गोरगरीब कार्डधारकांना किराणा भरता आलेला नाही. त्यामुळे मोफत अन्नधान्याचा लाभ घेण्यासाठी रेशन दुकानांवर गर्दी वाढणार आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याची शक्यता आहे. तसेच ई-पॉस मशीनवर प्रत्येक कार्डधारकांचा अंगठा घेऊन धान्य वितरण केले जाणार आहे. त्यातून कोरोना पसरण्याची भीतीही लाभार्थी व दुकानदारांकडून व्यक्त होत आहे. वसई तालुक्यात कोरोना लाटेचा प्रादुर्भाव वाढत आहे. असे असताना आता धान्यासाठी अंगठा वापरणे हे कोरोनाला निमंत्रण देणारे ठरेल, असे मत दुकानदारांनी व्यक्त केले.

सामाजिक अंतर राखणे दुकानदारांना अशक्य nदुकानात येणाऱ्या नागरिकांना मास्क, सामाजिक अंतर याचे पालन करणे गरजेचे असून सॅनिटायझर होणे गरजेचे आहे. तरच धोका कमी होऊ शकणार आहे. ई-पॉस मशीनवर अंगठा देऊन धान्य घ्यावे लावत असल्याने हे आमच्यासाठी धोक्याचे आहे. nअनेकदा ग्राहकांचा अंगठा हातात धरून तो मशीनवर ठेवावा लागतो. त्यामुळे सामाजिक अंतर पाळता येत नाही. काही मास्क न घालताच धान्य घेण्यासाठी येतात. अशा वेळी कोरोनाचा संसर्गाची शक्यता आहे. तर सॅनिटायझर प्रत्येकदा वापरणे परवडणारे नसल्याने प्रशासनाने याचा विचार करावा, असे रेशनिंग चालकांचे म्हणणे आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ई-पॉस मशीनवर अंगठा वापरण्यास दुकानदार यांनी विरोध केला आहे. यामुळे आता दुकानदार आपल्या अंगठ्याचा वापर करून शिधापत्रिकाधारकासमोर पावती देईल. त्यामुळे शिधापत्रिकाधारकाला अंगठा वापरता येणार नसल्याने कोरोना प्रादुर्भावाचा धोका कमी होणार आहे.- रोशन कापसे, पुरवठा अधिकारी, वसई

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरार