शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
3
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
4
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
5
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
6
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
7
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
8
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
9
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
10
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
14
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
15
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
16
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
17
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
18
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
19
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
20
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम

अंगठ्यामुळे वाढणार कोरोनाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 23:20 IST

मोफत धान्यासाठीची ई-पॉस यंत्रणा : वापर चुकीचा असल्याचे दुकानदारांचे मत

सुनील घरतलोकमत न्यूज नेटवर्क पारोळ : आर्थिकदृष्ट्या दुर्बल शिधापत्रिकाधारकांना १ मे या महाराष्ट्र दिनापासून मोफत अन्नधान्य शिधावाटप दुकानांतून करण्यात येत आहे. सध्याचा कोरोनाचा कहर पाहता ई-पॉसवर अंगठा घेऊन अन्नधान्य वाटप करणे चुकीचे असल्याचे बोलले जात आहे. यामुळे दुकानदार, शिधापत्रिकाधारकांना याचा धोका निर्माण होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

रेशनवर प्रत्येक व्यक्तीला तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत दिले जात आहेत. जिल्ह्यातील एकूण साडेबारा लाख शिधापत्रिकाधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे. वसई शहरात शनिवारपासून या अन्नधान्य वाटपाला प्रारंभ झाला आहे. ‘ब्रेक द चेन’अंतर्गत घातलेल्या कडक निर्बंधांमुळे मागील १५ दिवसांपासून अनेक व्यवसाय बंद आहेत. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी १५ मेपर्यंत वाढवल्याने गरीब, मजूरवर्गापुढील समस्या गंभीर बनल्या आहेत. कामधंदा बंद झाल्यामुळे गोरगरीब कार्डधारकांना किराणा भरता आलेला नाही. त्यामुळे मोफत अन्नधान्याचा लाभ घेण्यासाठी रेशन दुकानांवर गर्दी वाढणार आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याची शक्यता आहे. तसेच ई-पॉस मशीनवर प्रत्येक कार्डधारकांचा अंगठा घेऊन धान्य वितरण केले जाणार आहे. त्यातून कोरोना पसरण्याची भीतीही लाभार्थी व दुकानदारांकडून व्यक्त होत आहे. वसई तालुक्यात कोरोना लाटेचा प्रादुर्भाव वाढत आहे. असे असताना आता धान्यासाठी अंगठा वापरणे हे कोरोनाला निमंत्रण देणारे ठरेल, असे मत दुकानदारांनी व्यक्त केले.

सामाजिक अंतर राखणे दुकानदारांना अशक्य nदुकानात येणाऱ्या नागरिकांना मास्क, सामाजिक अंतर याचे पालन करणे गरजेचे असून सॅनिटायझर होणे गरजेचे आहे. तरच धोका कमी होऊ शकणार आहे. ई-पॉस मशीनवर अंगठा देऊन धान्य घ्यावे लावत असल्याने हे आमच्यासाठी धोक्याचे आहे. nअनेकदा ग्राहकांचा अंगठा हातात धरून तो मशीनवर ठेवावा लागतो. त्यामुळे सामाजिक अंतर पाळता येत नाही. काही मास्क न घालताच धान्य घेण्यासाठी येतात. अशा वेळी कोरोनाचा संसर्गाची शक्यता आहे. तर सॅनिटायझर प्रत्येकदा वापरणे परवडणारे नसल्याने प्रशासनाने याचा विचार करावा, असे रेशनिंग चालकांचे म्हणणे आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ई-पॉस मशीनवर अंगठा वापरण्यास दुकानदार यांनी विरोध केला आहे. यामुळे आता दुकानदार आपल्या अंगठ्याचा वापर करून शिधापत्रिकाधारकासमोर पावती देईल. त्यामुळे शिधापत्रिकाधारकाला अंगठा वापरता येणार नसल्याने कोरोना प्रादुर्भावाचा धोका कमी होणार आहे.- रोशन कापसे, पुरवठा अधिकारी, वसई

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरार