शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

अंगठ्यामुळे वाढणार कोरोनाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 23:20 IST

मोफत धान्यासाठीची ई-पॉस यंत्रणा : वापर चुकीचा असल्याचे दुकानदारांचे मत

सुनील घरतलोकमत न्यूज नेटवर्क पारोळ : आर्थिकदृष्ट्या दुर्बल शिधापत्रिकाधारकांना १ मे या महाराष्ट्र दिनापासून मोफत अन्नधान्य शिधावाटप दुकानांतून करण्यात येत आहे. सध्याचा कोरोनाचा कहर पाहता ई-पॉसवर अंगठा घेऊन अन्नधान्य वाटप करणे चुकीचे असल्याचे बोलले जात आहे. यामुळे दुकानदार, शिधापत्रिकाधारकांना याचा धोका निर्माण होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

रेशनवर प्रत्येक व्यक्तीला तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत दिले जात आहेत. जिल्ह्यातील एकूण साडेबारा लाख शिधापत्रिकाधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे. वसई शहरात शनिवारपासून या अन्नधान्य वाटपाला प्रारंभ झाला आहे. ‘ब्रेक द चेन’अंतर्गत घातलेल्या कडक निर्बंधांमुळे मागील १५ दिवसांपासून अनेक व्यवसाय बंद आहेत. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी १५ मेपर्यंत वाढवल्याने गरीब, मजूरवर्गापुढील समस्या गंभीर बनल्या आहेत. कामधंदा बंद झाल्यामुळे गोरगरीब कार्डधारकांना किराणा भरता आलेला नाही. त्यामुळे मोफत अन्नधान्याचा लाभ घेण्यासाठी रेशन दुकानांवर गर्दी वाढणार आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याची शक्यता आहे. तसेच ई-पॉस मशीनवर प्रत्येक कार्डधारकांचा अंगठा घेऊन धान्य वितरण केले जाणार आहे. त्यातून कोरोना पसरण्याची भीतीही लाभार्थी व दुकानदारांकडून व्यक्त होत आहे. वसई तालुक्यात कोरोना लाटेचा प्रादुर्भाव वाढत आहे. असे असताना आता धान्यासाठी अंगठा वापरणे हे कोरोनाला निमंत्रण देणारे ठरेल, असे मत दुकानदारांनी व्यक्त केले.

सामाजिक अंतर राखणे दुकानदारांना अशक्य nदुकानात येणाऱ्या नागरिकांना मास्क, सामाजिक अंतर याचे पालन करणे गरजेचे असून सॅनिटायझर होणे गरजेचे आहे. तरच धोका कमी होऊ शकणार आहे. ई-पॉस मशीनवर अंगठा देऊन धान्य घ्यावे लावत असल्याने हे आमच्यासाठी धोक्याचे आहे. nअनेकदा ग्राहकांचा अंगठा हातात धरून तो मशीनवर ठेवावा लागतो. त्यामुळे सामाजिक अंतर पाळता येत नाही. काही मास्क न घालताच धान्य घेण्यासाठी येतात. अशा वेळी कोरोनाचा संसर्गाची शक्यता आहे. तर सॅनिटायझर प्रत्येकदा वापरणे परवडणारे नसल्याने प्रशासनाने याचा विचार करावा, असे रेशनिंग चालकांचे म्हणणे आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ई-पॉस मशीनवर अंगठा वापरण्यास दुकानदार यांनी विरोध केला आहे. यामुळे आता दुकानदार आपल्या अंगठ्याचा वापर करून शिधापत्रिकाधारकासमोर पावती देईल. त्यामुळे शिधापत्रिकाधारकाला अंगठा वापरता येणार नसल्याने कोरोना प्रादुर्भावाचा धोका कमी होणार आहे.- रोशन कापसे, पुरवठा अधिकारी, वसई

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरार