शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

वसईत तिघांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:47 IST

गेल्या दोन दिवसांत वसईत तिघांचा बळी गेला आहे. तुंगारेश्वरच्या धबधब्यात बुडून एकाचा मृत्यू झाला. नालासोपारा येथे एकाचा तलावात बुडून तर वालीव येथे

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : गेल्या दोन दिवसांत वसईत तिघांचा बळी गेला आहे. तुंगारेश्वरच्या धबधब्यात बुडून एकाचा मृत्यू झाला. नालासोपारा येथे एकाचा तलावात बुडून तर वालीव येथे एकाचा शॉक लागून मृत्यू झाला.रविवारी दुपारी भांडुप येथे राहणारा प्रतीक पेडणेकर (२३) हा तरुण आपल्या मित्रांसह तुंगारेश्वर धबधब्यात फिरायला आला होता. सर्व जण दारू पिऊन धबधब्यात पोहण्यास उतरले. मात्र, प्रतीकला न घेताच सर्व मित्र रविवारी रात्री मुंबईला परतले होते. प्रतीकच्या घरच्यांनी विचारणा केली असता तो मध्येच आमच्यातून निघून गेल्याने आम्हाला वाटले तो घरी गेला असावा, असे उत्तर त्याच्या मित्रांनी दिले होते. त्यामुळे सोमवारी प्रतीकचे नातेवाईक त्याला शोधण्यासाठी तुंगारेश्वर येथे आले होते. पोलीस आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी धबधब्यातून प्रतीकचा मृतदेह बाहेर काढला. दुसऱ्या घटनेत मुसळधार पावसामुळे विजेची वायर तुटून साचलेल्या पाण्यात पडल्याने शॉक लागून वालीव खैरापाडा येथे राहणारा मनोहर भास्कर (२५) याचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. ही घटना वालीवच्या फणसपाडा येथे घडली. तर तिसऱ्या घटनेत मंगळवारी दुपारी नालासोपारा येथे राहणारा दत्तू जाधव (४५) यांचा टाकीपाडा येथील तलावात बुडून मृत्यू झाला. तलाव परिसरात फिरत असताना तोल जाऊन पडल्याने ते बुडाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.