शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बोईसर आगारात निवारा शेडच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 01:08 IST

उन्हात बसून करावी लागते प्रतीक्षा; एस.टी. प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप

बोईसर : बोईसरहून पालघरला जाणाऱ्या हजारो प्रवाशांना बोईसर एस.टी. आगारात बसची प्रतीक्षा उन्हातच करावी लागते आहे. येथे निवारा शेड असावी, या प्रवाशांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीकडे एस.टी. प्रशासन गांभीर्याने पहात नसल्याने उन्हाळा तसेच पावसाळ्यात प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.बोईसर - पालघर दरम्यान दररोज अर्ध्या तासाच्या अंतराने चाळीस - चाळीस अशा बसेसच्या एकूण ८० फेºया होतात. यातून सुमारे तीन हजार प्रवासी ये-जा करीत असतात. बोईसर एस.टी. डेपोच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पालघरकडे जाण्यासाठी बसेस थांबतात. परंतु तेथे निवारा शेड नसल्याने प्रवाशांना कधी उन्हात, कधी पावसात थांबावे लागते.पालघर हे तालुका आणि जिल्ह्याचे ठिकाण असल्याने इतर कामाबरोबरच शासकीय कामासाठी बोईसरच्या नागरिकांना ये-जा करावी लागते. अशा महत्त्वाच्या थांब्यावर ऊन - पावसापासून बचाव करण्यासाठी प्रवाशांना निवाºयाची अत्यंत गरज आहे. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे निवारा नसलेल्या या थांब्यापासून अगदी काही अंतरावर शेकडो प्रवासी तसेच नागरिक उघड्यावरच लघुशंका करीत असल्याने काहीवेळा दुर्गंधीलाही तोंड द्यावे लागते. अशा दुहेरी समस्यांना प्रवाशांना तोंड द्यावे लागते आहे. एस.टी.महामंडळाने ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन, प्रवाशांच्या सेवेसाठी नागरिकांना वाहतूक सुविधा पुरवली आहे. त्यामधे बसस्थानकावर प्रवाशांसाठी प्रतीक्षालय अपेक्षित आहे. तेथे प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था, खेळती हवा रहावी यासाठी पंखे, पिण्याचे पाणी या सुविधा त्याशिवाय प्रवाशांना बसमध्ये चढ-उतार करणे सुलभ व्हावे याकरिता स्वतंत्र फलाटाचीही व्यवस्था अनेक आगारात दिसते. परंतु बोईसर एस.टी. आगार उत्पन्नाच्या दृष्टीने मोठे असूनही येथे अशी दुरवस्था दिसत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.राज्य परिवहन पालघर विभागीय स्थापत्य अधिकाऱ्यांना निवारा संदर्भात पत्र पाठवण्यात येईल.- संदीप शिंदे, आगार व्यवस्थापक