शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

२९ ग्रा.पं.मध्ये अर्जच नाहीत सातची निवडणूक बिनविरोध

By admin | Updated: November 4, 2015 00:19 IST

पालघर तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीपैकी २९ ग्रामपंचायतीमधून नामनिर्देशनपत्रे सादर करण्यात न आल्याने उर्वरीत ११ ग्रामपंचायतीपैकी ४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा

पालघर : पालघर तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीपैकी २९ ग्रामपंचायतीमधून नामनिर्देशनपत्रे सादर करण्यात न आल्याने उर्वरीत ११ ग्रामपंचायतीपैकी ४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. तर इतर ७ ग्रामपंचायतीच्या जागा बिनविरोध झाल्याची माहिती तहसिलदार तथा निवडणुक निर्णय अधिकारी चंद्रसेन पवार यांनी दिली.पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील सत्पाळा व पाली ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक पोटनिवडणुका पार पडल्या तर आठ तालुक्यातील १२६ ग्रामपंचायतीमधील २५६ रिक्त झालेल्या जागासाठी १ नोव्हेंबर रोजी निवडणुका पार पडल्या होत्या. पालघर तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीच्या ८० रिक्त राहीलेल्या जागासाठी एकूण ५८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामधून २३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले होते. एकूण ४० ग्रामपंचायतीमधील २९ ग्रामपंचायतीमधून नामनिर्देशीत पत्रेच दाखल करण्यात न आल्याने घिवली, बिरवाडी, नागझरी, उच्छेही, बेटेगाव, नावझे, रावते, अक्करपट्टी, दारशेत, जायशेत, लोवरे, खैरेग्रुप, चिंचारे, पथराळी, खडकोली, महागाव, गांजेढेकाळे, गुंदले, डोंगरे, किराट, तारापुर, काटाळे, पडघे, शेलवली, नवी देलवडी, एडवण, बऱ्हाणपुर, खानिवडे-गारगाव, मान या ग्रामपंचायतीमधून एकही अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली नाही. मोरेकुरण, टेंभी, आलेवाडी, कर्दळ, नवीदापचरी, गिरनोली, वैगणी या सात ग्रामपंचायतीमधील जागा बिनविरोध झाल्या तर केळवा, नंडोरे, देवखोप, वाकसई, विराथन बुदू्रक या चार ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका पार पडल्या व आज झालेल्या मतमोजणी दरम्यान विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली.