शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

अद्ययावतीकरणावर शिक्षकांचा बहिष्कार

By admin | Updated: October 9, 2015 23:29 IST

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावतीकरणाचे कामकाज शिक्षकांवर सोपविल्याने त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडून त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर

पालघर : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावतीकरणाचे कामकाज शिक्षकांवर सोपविल्याने त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडून त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. यात त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने या कामावर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पालघर शाखेने बहिष्कार टाकण्यात आल्याचे पत्र निवासी उपजिल्हाधिकारी राजेश काटकर यांना शुक्रवारी देण्यात आले.शाळेतील ६ ते १४ वयोगटांतील मुलांना प्राथमिक शिक्षण देणे, हा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांना फक्त निवडणुका तसेच जनगणनेव्यतिरिक्त कोणतीही शैक्षणिक कामे देण्यात येऊ नयेत, असे आदेश शासकीय परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत. अशाच एका प्रकरणात केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत शिक्षकांना सर्वसाधारणपणे अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नयेत, असे सूचित केल्याचे शिक्षक सेनेचे म्हणणे आहे. तरीही, आमच्या अनेक शाळांमध्ये आजही ‘प्रगत महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत पायाभूत चाचणी, प्रथम सत्र परीक्षा, मूल्यमापन परीक्षण नोंदी, शिक्षक माहिती, विद्यार्थी माहिती, शिष्यवृत्ती परीक्षा माहिती, सुवर्ण महोत्सव माहिती इ. सर्व कामांत शिक्षकवर्ग व्यस्त असून गुणवत्ता विकासासाठी सर्व प्रयत्नशील आहेत. वरील सर्व कामांचा बोजा शिक्षकवर्ग उचलत असताना आता लोकसंख्या नोंदवही अद्ययावतीकरणाच्या कामकाजामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.त्यामुळे शिक्षकवर्गात मोठी नाराजी असून त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष प्रदीप पाटील, कोषाध्यक्ष जितेंद्र वडे, तालुका महिलाध्यक्ष नम्रता संखे, सरचिटणीस बिपिन संखे, नंदकुमार संखे इ.नी निवासी उपजिल्हाधिकारी काटकर यांना पत्र देण्यात आले. (वार्ताहर)

विक्रमगड : महाराष्ट्र शासनाच्या लोकसंख्या नोंदवही अद्ययावतीकरणाच्या कामासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना नेमण्यात आले आहे. परंतु, या नोंदवही अद्ययावतीकरणास तालुक्यातील सर्वच शिक्षक संघटनेने विरोध केला असून बहिष्कार टाकला आहे. शासन निर्णयानुसार बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रीय आपत्ती निवारण, प्रत्यक्ष मतदान, जनगणना याव्यतिरिक्त कोणतेही अशैक्षणिक काम देऊ नये, असे निर्देश देण्यास आले आहेत. या कामावर बहिष्कार टाकला असल्याचे प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष अजित भोये यांनी सांगितले.