शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या सरपंच, उपसरपंचांच्या अपात्रतेला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:59 IST

कोकण आयुक्तांनी पदावरून दूर केल्याच्या निर्णयानंतर तक्रारदारांनी ग्रामविकास व बाल कल्याण विभाग मंत्र्यांकडे लगेचच कॅव्हेट दाखल केले होते. असे असताना

- शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : कोकण आयुक्तांनी पदावरून दूर केल्याच्या निर्णयानंतर तक्रारदारांनी ग्रामविकास व बाल कल्याण विभाग मंत्र्यांकडे लगेचच कॅव्हेट दाखल केले होते. असे असताना तक्रादारांची बाजू ऐकून न घेताच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दोन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांसह सदस्याचे अपिल दाखल करून घेत कोकण आयुक्तांच्या निर्णयालाच स्थगिती दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. मालजीपाडा ग्रामपंचायतीत भाजपाचे सरपंच सतीश म्हात्रे, उपसरपंच देवराम गांगडा यांच्यासह सदस्य भामिनी भेताल, तुषार पागी, रेखा नानकर आणि सुनंदा पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीला घरपट्टी लावून जागेसह ती हडप करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार बहुजन विकास आघाडीच्या सदस्या जयश्री पाटील यांनी केली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी सखोल चौकशी करून सरपंच, उपसरपंच आणि संबंधित सदस्यांवर ठपका ठेऊन त्यांना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव कोकण आयुक्त जगदीश पाटील यांच्याकडे केली होती. त्यानंतर पाटील यांनी सुनावणी घेऊन दोन्ही बाजू ऐकून घेऊन चौधरी यांचा प्रस्ताव मान्य केला होता. कोकण आयुक्तांनी ११ जुलै २०१७ रोजी सरपंच, उपसरपंच आणि चार सदस्यांना अपात्र ठरवत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय दिला होता. दुसरीकडे, अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीत निर्मल भारत अभियानात शौचालय अनुदानात गैरव्यवहार झाल्याची तक्रार वसई पंचायत समितीच्या सभापती चेतना मेहेर यांनी केली होती. याप्रकरणाची सखोल चौकशी करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी सरपंच भारती वैती, उपसरपंच विजय मेहेर आणि सदस्य कांता म्हात्रे यांच्यावर गैरव्यवहाराचा ठपका ठेऊन त्यांना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव कोकण आयुक्तांकडे पाठवला होता. कोकण आयुक्त जगदीश पाटील यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन चौधरी यांचा प्रस्ताव मान्य केला होता. कोकण आयुक्तांनी याप्रकरणी १२ जुलै २०१७ रोजी सरपंच भारती वैती, उपसरपंच विजय मेहेर आणि सदस्या कांता म्हात्रे यांना अपात्र ठरवत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयानंतर मेहेर यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे १३ जुलै २०१७ रोजी ( कॅव्हेट क्रमांक ३४५४१ आणि ३४५४२) आणि जयश्री पाटील यांनी १४ जुलै २०१७ रोजी (कॅव्हेट क्रमांक ३४५५९) कॅव्हेट दाखल केले होते. कॅव्हेट दाखल झाल्यानंतर अर्नाळा आणि मालजीपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी कोकण आयुक्तांच्या निर्णयाविरोधात १७ जुलै २०१७ रोजी ग्रामविकास मंत्र्यांकडे अपिल केले होते. धक्कादायक बाब म्हणजे मंत्री पंकजा मुंडे यांनी दोन्ही अपिल दाखल करून घेत कोकण आयुक्तांच्या निर्णयाला लगेचच स्थगिती आदेश दिला. वसई पंचायत समितीच्या सभापतींनी केला आरोपहा आदेश पुढील सुनावणी होईपर्यंत लागू राहणार असल्याने दोन्ही ग्रामपंचायतीतील भाजपाची सत्ता कायम राहणार आहे. कॅव्हेट दाखल केले असल्यास कोणताही निर्णय देण्याआधी तक्रारदारांची बाजू ऐकून घेणे बंधनकारक आहे. मात्र, मुंडे यांनी भाजपच्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांना वाचवण्यासाठी आमची बाजू ऐकून न घेताच कोकण आयुक्तांच्या निर्णयला स्थगिती देऊन कायद्याचा भंग केला आहे, असा आरोप वसई पंचायत समितीच्या सभापती चेतना मेहेर यांनी केला आहे. दरम्यान, डिसेंबरमध्ये दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये निवडणूका होणार आहेत.