शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

भाजपाच्या सरपंच, उपसरपंचांच्या अपात्रतेला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:59 IST

कोकण आयुक्तांनी पदावरून दूर केल्याच्या निर्णयानंतर तक्रारदारांनी ग्रामविकास व बाल कल्याण विभाग मंत्र्यांकडे लगेचच कॅव्हेट दाखल केले होते. असे असताना

- शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : कोकण आयुक्तांनी पदावरून दूर केल्याच्या निर्णयानंतर तक्रारदारांनी ग्रामविकास व बाल कल्याण विभाग मंत्र्यांकडे लगेचच कॅव्हेट दाखल केले होते. असे असताना तक्रादारांची बाजू ऐकून न घेताच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दोन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांसह सदस्याचे अपिल दाखल करून घेत कोकण आयुक्तांच्या निर्णयालाच स्थगिती दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. मालजीपाडा ग्रामपंचायतीत भाजपाचे सरपंच सतीश म्हात्रे, उपसरपंच देवराम गांगडा यांच्यासह सदस्य भामिनी भेताल, तुषार पागी, रेखा नानकर आणि सुनंदा पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीला घरपट्टी लावून जागेसह ती हडप करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार बहुजन विकास आघाडीच्या सदस्या जयश्री पाटील यांनी केली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी सखोल चौकशी करून सरपंच, उपसरपंच आणि संबंधित सदस्यांवर ठपका ठेऊन त्यांना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव कोकण आयुक्त जगदीश पाटील यांच्याकडे केली होती. त्यानंतर पाटील यांनी सुनावणी घेऊन दोन्ही बाजू ऐकून घेऊन चौधरी यांचा प्रस्ताव मान्य केला होता. कोकण आयुक्तांनी ११ जुलै २०१७ रोजी सरपंच, उपसरपंच आणि चार सदस्यांना अपात्र ठरवत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय दिला होता. दुसरीकडे, अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीत निर्मल भारत अभियानात शौचालय अनुदानात गैरव्यवहार झाल्याची तक्रार वसई पंचायत समितीच्या सभापती चेतना मेहेर यांनी केली होती. याप्रकरणाची सखोल चौकशी करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी सरपंच भारती वैती, उपसरपंच विजय मेहेर आणि सदस्य कांता म्हात्रे यांच्यावर गैरव्यवहाराचा ठपका ठेऊन त्यांना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव कोकण आयुक्तांकडे पाठवला होता. कोकण आयुक्त जगदीश पाटील यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन चौधरी यांचा प्रस्ताव मान्य केला होता. कोकण आयुक्तांनी याप्रकरणी १२ जुलै २०१७ रोजी सरपंच भारती वैती, उपसरपंच विजय मेहेर आणि सदस्या कांता म्हात्रे यांना अपात्र ठरवत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयानंतर मेहेर यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे १३ जुलै २०१७ रोजी ( कॅव्हेट क्रमांक ३४५४१ आणि ३४५४२) आणि जयश्री पाटील यांनी १४ जुलै २०१७ रोजी (कॅव्हेट क्रमांक ३४५५९) कॅव्हेट दाखल केले होते. कॅव्हेट दाखल झाल्यानंतर अर्नाळा आणि मालजीपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी कोकण आयुक्तांच्या निर्णयाविरोधात १७ जुलै २०१७ रोजी ग्रामविकास मंत्र्यांकडे अपिल केले होते. धक्कादायक बाब म्हणजे मंत्री पंकजा मुंडे यांनी दोन्ही अपिल दाखल करून घेत कोकण आयुक्तांच्या निर्णयाला लगेचच स्थगिती आदेश दिला. वसई पंचायत समितीच्या सभापतींनी केला आरोपहा आदेश पुढील सुनावणी होईपर्यंत लागू राहणार असल्याने दोन्ही ग्रामपंचायतीतील भाजपाची सत्ता कायम राहणार आहे. कॅव्हेट दाखल केले असल्यास कोणताही निर्णय देण्याआधी तक्रारदारांची बाजू ऐकून घेणे बंधनकारक आहे. मात्र, मुंडे यांनी भाजपच्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांना वाचवण्यासाठी आमची बाजू ऐकून न घेताच कोकण आयुक्तांच्या निर्णयला स्थगिती देऊन कायद्याचा भंग केला आहे, असा आरोप वसई पंचायत समितीच्या सभापती चेतना मेहेर यांनी केला आहे. दरम्यान, डिसेंबरमध्ये दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये निवडणूका होणार आहेत.