शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

‘सूर्या’चे पाणी आता पेटणार

By admin | Updated: March 28, 2017 04:54 IST

सर्वोच्च न्यायालयाने डहाणू तालुका पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित केला असतांना शासन

पालघर : सर्वोच्च न्यायालयाने डहाणू तालुका पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित केला असतांना शासन त्या भागात पर्यावरणास हानी पोहोचिवणारे बुलेट ट्रेन, वाढवणं बंदर सारखे विनाशकारी प्रकल्प जबरदस्तीने राबविण्याच्या प्रयत्नाच्या आणि सूर्याचे पाणी पळवून नेण्याच्या विरोधात सोमवारी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांचा मोठा सहभाग असलेल्या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शासनाला निर्वाणीचा इशारा दिला.पालघर जिल्ह्यातील बाधित गावातील पेसा ग्रामसभांनी लोकशाही व संविधानाच्या चौकटीत राहून भूसंपदानास विरोध दर्शविणारे बहुमाताचे ठराव करून ते तहसीलदार, प्रांतअधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी दिले आहेत. तरीही लोकमत व लोकभावनेचा आदर न करता प्रशासन पूर्व सूचना न देता हुकूमशाही, जुलूम जबरदस्ती पद्धतीने भूसंपादनासाठी सर्व्हे करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने डहाणू तालुक्याला पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित केले असतानाही या क्षेत्रात बुलेट ट्रेन, फ्रेट कॉरीडोर, मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस हायवे, वाढवणं बंदर, इंडस्ट्रियल बेल्ट, या प्रकल्पांसाठी जबरदस्तीने सर्व्हे करून भूसंपादन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी भूमीपुत्रांवर दबाव आणला जात आहे. तसेच बोईसर दांडीपाडा येथील आदिवासी सहकारी सोसायटीची ५ एकर जमीन सामाजिक कामासाठी द्यावी, जिल्ह्यातील जिप चे शासकीय अधिकारी, विस्तार अधिकारी ग्रामसेवक पेसा गावातील सरपंच, सदस्यांवर मनमानी कारभाराद्वारे बेकायदेशीर कामाची सक्ती करीत असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. भारतीय संविधानाच्या तरतूदी नुसार जिल्ह्यातील पालघर, वसई तालुक्यातील पूर्व पट्टा आणि अन्य तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, हे तालुके अनुसूचित क्षेत्र म्हणून संरक्षित आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार अनुसूचित क्षेत्रात खाजगी कंपन्यांनाच नव्हे तर खुद्द राज्य शासनालाही जमीन संपादनाचा अधिकार नाही. असे असतांना भारतीय संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन करून भूसंपादनाचे काम सुरू आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.जिल्ह्यातील आदिवासी भागाच्या शेती आणि विकासासाठी उभारलेल्या सूर्या प्रकल्पाचे पाणी वसई-विरार सह,मिरा-भार्इंदर, मुंबई येथे पळवून नेले जात असल्याने १४ हजार ६९६ हेक्टर जमिनी पैकी तब्बल ७ हजार ६८१ हेक्टर क्षेत्र (१९ हजार २०२ एकर) सिंचना बाहेर जाऊन हे सर्व क्षेत्र नापीक बनणार आहे. शासन, प्रशासनास दिला भूमिपुत्रांनी निर्वाणीचा इशारा या नापीक जमिनीवर वसई-विरार, भार्इंदर आणि मुंबईच्या बिल्डरांचा डोळा असल्याने हा प्रकार सुरू असल्याने मोर्चातील महिला वर्ग प्रचंड संतापल्या होत्या. त्यांनी ‘जान देंगे पर जमीन नही’ अशा गर्जना करून शासनाचा निषेध व्यक्त केला. हळू हळू जिल्ह्याचे पाणी राजकीय मताच्या जोरावर पळविले जात असल्याने भविष्यात जव्हार, मोखाड्या सारखी परिस्थिती पालघर, डहाणू तालुक्यातील जनतेवर ओढावणार आहे.त्यामुळे ह्या मोर्चात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहात आपला संताप व्यक्त केला. शासनास हा आता निर्वाणीचा इशारा भूमीसेना-आदिवासी एकता परिषदेच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघर्ष समिती, श्रमिक संघटना, वाढवणं बंदर विरोधी कृती समितिच्या वतीने आदिवासी एकता परिषदेचे निमंत्रक काळूराम धोदडे,वाहरू सोनवणे, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, जिल्हाध्यक्ष दत्ताराम करबट, अशोक ठाकरे, शंकर नारले, नीता काटकर ई. नी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून दिला.