शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
3
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
4
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
5
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
6
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
7
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
8
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
9
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
10
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
11
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
12
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
13
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
14
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
15
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
16
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
17
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
18
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
19
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
20
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार

साखरे पूल गेला पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 01:37 IST

तालुक्यात गेल्या २४ तासात धुवांधार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत अल्याने नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.

विक्रमगड : तालुक्यात गेल्या २४ तासात धुवांधार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत अल्याने नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पूल आणि मोºया उलटल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांचा काही काळ संपर्क तुटला होता. सोमवारी विक्रमगड मध्ये १५५ तर तलवाडा १५० मंगळवारी विक्र मगड १९३ तर तलवडा १८५ मिमी पावसाची नोंद झाली.सोमवारी साखरा पुलावरून पाणी वाहू लागल्याने विक्रमगड आणि जव्हारचा संपर्क काही काळ तुटला होता. तसेच विक्र मगड-डहाणू रस्त्यावरील तांबाडी नदीवरील छोटे-मोठे पूल काही तास पाण्याखाली गेले होते.तालुक्यातील देहर्जे नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने कुंर्झे भागाशी संपर्क तुटला होता. विक्रमगड-मनोर मार्गावरील चिंचघर येथील पुलावर गाडयांच्या रांगा २ किमी पर्यंत लागल्या होत्या. या वेळी ९ बस व ४० खाजगी वाहने खोळंबली होती. मनोर-विक्रमगड रस्त्यावरील भोपोली येथील पूल ही पाण्याखाली गेला होता. तसेच दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले होते. विजेच्या गडगडाटासह पडणाºया पावसाच्या सोबतीला सोसाट्याचा वाराही असल्याने परिसरामध्ये विजेचा खेळखंडोबा सुरु होता. त्यातच काहीच्या नळाला गढूळ पाणी आल्याच्या तक्रारी होत्या. या पावसाचा मोठा फटका जनजीवनालाही बसला. विद्यार्थी, चाकरमानी यांचेही हाल झाले.नैसर्गिक नाले बुजल्याने वसईत पूरस्थितीपारोळ : वसई तालुक्यात दोन दिवस पडलेल्या पावसाने पूरस्थिती निर्माण करुन जनजीवन विस्कळीत केले. वसई, विरार नालासोपारा भागातील मार्गाना या पावसामुळे नदीचे रुप आले होते. त्यातून वाट काढतांनाच सोमवारी प्रकाश पाटील याचा जीव गेला होता. वसईमध्ये केवळ १७५ मिमी पाऊस पडला असतानाही या परिसराला जलाशयाचे रूप का आले. पाऊस पडताच ही परिस्थिती तीन चार वर्षांपासूनच का निर्माण होते? याचे कारण म्हणजे अतिक्रमण करून बुजविले गेलेले नैसर्गिक नाले हे आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करणाºया नैसर्गिक नाल्यांवर भराव टाकून बांधकाम केल्याने पाण्याचा निचरा न झाल्याने वसई, विरार, नालासोपारा, पेल्हार, नवजीवन, वालीव, धानिव, चंदनसार, गोखिवरे, वसई फाटा, सोपारा फाटा, विरार फाटा, बावखल, सातीवली हा परिसर पाण्याखाली गेला. अनेक घरात पाणी घुसले. ससुपाडा येथे मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाणी आल्याने वाहने चालवणे कठीण झाले. अनेक वाहने बंद पडली त्यामुळे वाहतूककोंडी झाली. अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली तर चाकरमान्यांनी कामावर न जाणे पसंत केले.वसईला लगत तुंगारेश्वर अभायारण्याचा डोंगर, विरारमधील जीवदानी मातेचा डोंगर असल्यामुळे त्या डोंगरावरील पावसाचे पाणी नैसर्गिक नाल्यातून समुद्राला मिळत असे. परंतु या भागाचे शहरीकरण होत असल्याने जागेच्या हव्यासा पोटी, भूमाफियानी नैसर्गिक नाल्यांवर अवैध बांधकाम केल्याने ते साठल्याने वसई विरार परिसराला नदीचे रूप आले होते.