शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

साखरे पूल गेला पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 01:37 IST

तालुक्यात गेल्या २४ तासात धुवांधार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत अल्याने नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.

विक्रमगड : तालुक्यात गेल्या २४ तासात धुवांधार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत अल्याने नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पूल आणि मोºया उलटल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांचा काही काळ संपर्क तुटला होता. सोमवारी विक्रमगड मध्ये १५५ तर तलवाडा १५० मंगळवारी विक्र मगड १९३ तर तलवडा १८५ मिमी पावसाची नोंद झाली.सोमवारी साखरा पुलावरून पाणी वाहू लागल्याने विक्रमगड आणि जव्हारचा संपर्क काही काळ तुटला होता. तसेच विक्र मगड-डहाणू रस्त्यावरील तांबाडी नदीवरील छोटे-मोठे पूल काही तास पाण्याखाली गेले होते.तालुक्यातील देहर्जे नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने कुंर्झे भागाशी संपर्क तुटला होता. विक्रमगड-मनोर मार्गावरील चिंचघर येथील पुलावर गाडयांच्या रांगा २ किमी पर्यंत लागल्या होत्या. या वेळी ९ बस व ४० खाजगी वाहने खोळंबली होती. मनोर-विक्रमगड रस्त्यावरील भोपोली येथील पूल ही पाण्याखाली गेला होता. तसेच दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले होते. विजेच्या गडगडाटासह पडणाºया पावसाच्या सोबतीला सोसाट्याचा वाराही असल्याने परिसरामध्ये विजेचा खेळखंडोबा सुरु होता. त्यातच काहीच्या नळाला गढूळ पाणी आल्याच्या तक्रारी होत्या. या पावसाचा मोठा फटका जनजीवनालाही बसला. विद्यार्थी, चाकरमानी यांचेही हाल झाले.नैसर्गिक नाले बुजल्याने वसईत पूरस्थितीपारोळ : वसई तालुक्यात दोन दिवस पडलेल्या पावसाने पूरस्थिती निर्माण करुन जनजीवन विस्कळीत केले. वसई, विरार नालासोपारा भागातील मार्गाना या पावसामुळे नदीचे रुप आले होते. त्यातून वाट काढतांनाच सोमवारी प्रकाश पाटील याचा जीव गेला होता. वसईमध्ये केवळ १७५ मिमी पाऊस पडला असतानाही या परिसराला जलाशयाचे रूप का आले. पाऊस पडताच ही परिस्थिती तीन चार वर्षांपासूनच का निर्माण होते? याचे कारण म्हणजे अतिक्रमण करून बुजविले गेलेले नैसर्गिक नाले हे आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करणाºया नैसर्गिक नाल्यांवर भराव टाकून बांधकाम केल्याने पाण्याचा निचरा न झाल्याने वसई, विरार, नालासोपारा, पेल्हार, नवजीवन, वालीव, धानिव, चंदनसार, गोखिवरे, वसई फाटा, सोपारा फाटा, विरार फाटा, बावखल, सातीवली हा परिसर पाण्याखाली गेला. अनेक घरात पाणी घुसले. ससुपाडा येथे मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाणी आल्याने वाहने चालवणे कठीण झाले. अनेक वाहने बंद पडली त्यामुळे वाहतूककोंडी झाली. अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली तर चाकरमान्यांनी कामावर न जाणे पसंत केले.वसईला लगत तुंगारेश्वर अभायारण्याचा डोंगर, विरारमधील जीवदानी मातेचा डोंगर असल्यामुळे त्या डोंगरावरील पावसाचे पाणी नैसर्गिक नाल्यातून समुद्राला मिळत असे. परंतु या भागाचे शहरीकरण होत असल्याने जागेच्या हव्यासा पोटी, भूमाफियानी नैसर्गिक नाल्यांवर अवैध बांधकाम केल्याने ते साठल्याने वसई विरार परिसराला नदीचे रूप आले होते.