शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

साखरे पूल गेला पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 01:37 IST

तालुक्यात गेल्या २४ तासात धुवांधार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत अल्याने नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.

विक्रमगड : तालुक्यात गेल्या २४ तासात धुवांधार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत अल्याने नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पूल आणि मोºया उलटल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांचा काही काळ संपर्क तुटला होता. सोमवारी विक्रमगड मध्ये १५५ तर तलवाडा १५० मंगळवारी विक्र मगड १९३ तर तलवडा १८५ मिमी पावसाची नोंद झाली.सोमवारी साखरा पुलावरून पाणी वाहू लागल्याने विक्रमगड आणि जव्हारचा संपर्क काही काळ तुटला होता. तसेच विक्र मगड-डहाणू रस्त्यावरील तांबाडी नदीवरील छोटे-मोठे पूल काही तास पाण्याखाली गेले होते.तालुक्यातील देहर्जे नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने कुंर्झे भागाशी संपर्क तुटला होता. विक्रमगड-मनोर मार्गावरील चिंचघर येथील पुलावर गाडयांच्या रांगा २ किमी पर्यंत लागल्या होत्या. या वेळी ९ बस व ४० खाजगी वाहने खोळंबली होती. मनोर-विक्रमगड रस्त्यावरील भोपोली येथील पूल ही पाण्याखाली गेला होता. तसेच दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले होते. विजेच्या गडगडाटासह पडणाºया पावसाच्या सोबतीला सोसाट्याचा वाराही असल्याने परिसरामध्ये विजेचा खेळखंडोबा सुरु होता. त्यातच काहीच्या नळाला गढूळ पाणी आल्याच्या तक्रारी होत्या. या पावसाचा मोठा फटका जनजीवनालाही बसला. विद्यार्थी, चाकरमानी यांचेही हाल झाले.नैसर्गिक नाले बुजल्याने वसईत पूरस्थितीपारोळ : वसई तालुक्यात दोन दिवस पडलेल्या पावसाने पूरस्थिती निर्माण करुन जनजीवन विस्कळीत केले. वसई, विरार नालासोपारा भागातील मार्गाना या पावसामुळे नदीचे रुप आले होते. त्यातून वाट काढतांनाच सोमवारी प्रकाश पाटील याचा जीव गेला होता. वसईमध्ये केवळ १७५ मिमी पाऊस पडला असतानाही या परिसराला जलाशयाचे रूप का आले. पाऊस पडताच ही परिस्थिती तीन चार वर्षांपासूनच का निर्माण होते? याचे कारण म्हणजे अतिक्रमण करून बुजविले गेलेले नैसर्गिक नाले हे आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करणाºया नैसर्गिक नाल्यांवर भराव टाकून बांधकाम केल्याने पाण्याचा निचरा न झाल्याने वसई, विरार, नालासोपारा, पेल्हार, नवजीवन, वालीव, धानिव, चंदनसार, गोखिवरे, वसई फाटा, सोपारा फाटा, विरार फाटा, बावखल, सातीवली हा परिसर पाण्याखाली गेला. अनेक घरात पाणी घुसले. ससुपाडा येथे मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाणी आल्याने वाहने चालवणे कठीण झाले. अनेक वाहने बंद पडली त्यामुळे वाहतूककोंडी झाली. अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली तर चाकरमान्यांनी कामावर न जाणे पसंत केले.वसईला लगत तुंगारेश्वर अभायारण्याचा डोंगर, विरारमधील जीवदानी मातेचा डोंगर असल्यामुळे त्या डोंगरावरील पावसाचे पाणी नैसर्गिक नाल्यातून समुद्राला मिळत असे. परंतु या भागाचे शहरीकरण होत असल्याने जागेच्या हव्यासा पोटी, भूमाफियानी नैसर्गिक नाल्यांवर अवैध बांधकाम केल्याने ते साठल्याने वसई विरार परिसराला नदीचे रूप आले होते.