शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

अजब कारभार! पाली आश्रमशाळेच्या इमारतीत गुंजचे विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 23:27 IST

; ६२१ विद्यार्थ्यांचे नुकसान

- वसंत भोईरवाडा : तालुक्यात रविवारी झालेल्या महापुरात पाली आश्रम शाळेचे संपूर्ण साहित्य पुरात वाहून गेले. यामुळे शाळेचे संपूर्ण नुकसान झाले आहे. ही संपूर्ण शाळा स्वच्छ करण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना दहा दिवस सुट्टी देण्यात आली असून यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वास्तविक, या आश्रम शाळेची इमारत आहे. मात्र येथे गुंज आश्रम शाळाचे विद्यार्थी स्थलांतरित केले असल्याकारणाने शाळेची इमारत असूनही या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे.पाली आश्रमशाळा पिंजाळ नदीच्या काठावर आहे. यामुळे दरवर्षी या शाळेत पुराचे पाणी भरत असून शाळेचे नुकसान होते. त्यामुळे प्रशासनाने या शाळेसाठी भव्यदिव्य अशी इमारत बांधली आहे. मात्र, ही शाळा तेथे स्थलांतरीत करायला प्रशासनाला वेळ न मिळाल्याने तेथे गुंज आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना स्थलांतरित केले. तीन वर्षे उलटली तरी गुंज आश्रम शाळेच्या इमारतीच्या कामाला मुहूर्त सापडलेला नाही. शिवाय कुडूस परिसरात त्यांना भाड्याने देखील इमारत मिळत नाही. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे या आदिवासी विद्यार्र्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.दरम्यान, खा. राजेंद्र गावित यांनी गुरुवारी या आश्रम शाळेची पाहणी करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, यासाठी समोरच बांधलेल्या इमारतीत शाळा सुरू करण्याचे आदेश देऊन गुंज शाळेची स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.वर्ग खोल्यांची स्वच्छता करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असून इ.१०वी, १२ वीचे वर्ग मंगळवार पासून सुरू होणार असून इतर वर्गांची शाळा देखील एक दोन दिवसात सुरू होईल. इमारतीमध्ये शाळा हलवण्याचे अधिकार वरिष्ठ पातळीवर होतात. याबाबत काही बोलता येणार नाही.- अनिल सोनावणे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प जव्हार