शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

वादळाचा प्रताप, अडकलेली मच्छीमार बोट सुखरूप आणली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 23:12 IST

समुद्रात अचानक निर्माण झालेल्या वादळी वाऱ्याच्या फटकाºयाने सातपाटी येथील रवींद्र दवणे ह्यांची ‘पंचाली’ ही बोट भरकटुन बंधाऱ्याच्या दगडात अडकली

पालघर : समुद्रात अचानक निर्माण झालेल्या वादळी वाऱ्याच्या फटकाºयाने सातपाटी येथील रवींद्र दवणे ह्यांची ‘पंचाली’ ही बोट भरकटुन बंधाऱ्याच्या दगडात अडकली. स्थानिक मच्छीमारांनी एकत्र येऊन ती सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले. परंतु बोटीचे हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे.

दक्षिण पूर्व बंगालच्या खाडी लगत ३० एप्रिल पासून निर्माण झालेल्या जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे फनी हे निर्माण झालेले वादळ पुढील काही काळात तामिळनाडूच्या उत्तरे कडील किनाºयावर तसेच आंध्रप्रदेशच्या दक्षिण किनाºयावर धडकू शकते असा कयास हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता.तसेच हे वादळ किनाºयावर धडकण्यापूर्वी हे चक्रीवादळ परत फिरण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. सोमवार पासून दमण आणि गुजरात च्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या काही बोटींना खवळलेल्या समुद्राचा आणि जोरदार वाºयाचा सामना करावा लागला होता. ह्याचा फनी वादळाचा काहीही संबंध नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तर मग सोमवार पासून समुद्रात गुजरात राज्याच्या काही भागात जोरदार वाºयाचे उमटत असलेले पडसाद कसले? असा प्रश्न सातपाटी मधील मच्छीमार महेश भोईर ह्यानी उपस्थित केला. ह्या संदर्भात हवामान विभागाशी संपर्क साधला असता फनी वादळशी ह्याचा कुठलाही संबंध नसून उष्णतेमुळे समुद्र खवळलेला राहत असावा असा तर्क त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील पालघर,डहाणू व वसई भागातील हजारो बोटी ह्या मासेमारी साठी दिव-दमण किंवा गुजरातच्या जाफराबाद भागात जाऊन मंगळवारी आपल्या बंदरात परत येत असताना अनेक बोटींना जोरदार वारा आणि खवळलेल्या समुद्राचा सामना करीत सुखरूपपणे आपला किनारा गाठावा लागला होता.

मंगळवारी सातपाटी येथील एक मच्छीमार रवींद्र दवणे यांनी आपली बोट समुद्रात अँकर (लोखंडी लोयली) च्या सहाय्याने नांगरून ठेवली होती. त्या रात्री अचानक समुद्रात आलेल्या जोरदार वाऱ्याच्या झोताने दवणे ह्याच्या पंचाली बोटीच्या अँकरला लावलेला जाडसर दोरखंड तुटून बोट किनाºयावर बांधलेल्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्यात अडकली. बंधाºयातील दगडामुळे बोटीचे नुकसान झाले असून अचानक समुद्रात झालेल्या ह्या बदला बाबत भीती व्यक्त केली जात आहे. शासनासह सहकारी संस्थांनी दवणे ह्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मच्छीमार सहकारी संस्थेचे संचालक तानाजी चौधरी ह्यांनी केली आहे.

समुद्रात मच्छीमारांनी मासेमारीला जाऊ नये अशा प्रकारच्या कुठल्याही सूचना आमच्या कडे आलेल्या नाहीत. - डॉ.नवनाथ जरे, निवासी उपजिल्हाधिकार,पालघर

टॅग्स :Vasai Virarवसई विरारSea Routeसागरी महामार्गfishermanमच्छीमार