शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

वादळाचा प्रताप, अडकलेली मच्छीमार बोट सुखरूप आणली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 23:12 IST

समुद्रात अचानक निर्माण झालेल्या वादळी वाऱ्याच्या फटकाºयाने सातपाटी येथील रवींद्र दवणे ह्यांची ‘पंचाली’ ही बोट भरकटुन बंधाऱ्याच्या दगडात अडकली

पालघर : समुद्रात अचानक निर्माण झालेल्या वादळी वाऱ्याच्या फटकाºयाने सातपाटी येथील रवींद्र दवणे ह्यांची ‘पंचाली’ ही बोट भरकटुन बंधाऱ्याच्या दगडात अडकली. स्थानिक मच्छीमारांनी एकत्र येऊन ती सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले. परंतु बोटीचे हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे.

दक्षिण पूर्व बंगालच्या खाडी लगत ३० एप्रिल पासून निर्माण झालेल्या जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे फनी हे निर्माण झालेले वादळ पुढील काही काळात तामिळनाडूच्या उत्तरे कडील किनाºयावर तसेच आंध्रप्रदेशच्या दक्षिण किनाºयावर धडकू शकते असा कयास हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता.तसेच हे वादळ किनाºयावर धडकण्यापूर्वी हे चक्रीवादळ परत फिरण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. सोमवार पासून दमण आणि गुजरात च्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या काही बोटींना खवळलेल्या समुद्राचा आणि जोरदार वाºयाचा सामना करावा लागला होता. ह्याचा फनी वादळाचा काहीही संबंध नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तर मग सोमवार पासून समुद्रात गुजरात राज्याच्या काही भागात जोरदार वाºयाचे उमटत असलेले पडसाद कसले? असा प्रश्न सातपाटी मधील मच्छीमार महेश भोईर ह्यानी उपस्थित केला. ह्या संदर्भात हवामान विभागाशी संपर्क साधला असता फनी वादळशी ह्याचा कुठलाही संबंध नसून उष्णतेमुळे समुद्र खवळलेला राहत असावा असा तर्क त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील पालघर,डहाणू व वसई भागातील हजारो बोटी ह्या मासेमारी साठी दिव-दमण किंवा गुजरातच्या जाफराबाद भागात जाऊन मंगळवारी आपल्या बंदरात परत येत असताना अनेक बोटींना जोरदार वारा आणि खवळलेल्या समुद्राचा सामना करीत सुखरूपपणे आपला किनारा गाठावा लागला होता.

मंगळवारी सातपाटी येथील एक मच्छीमार रवींद्र दवणे यांनी आपली बोट समुद्रात अँकर (लोखंडी लोयली) च्या सहाय्याने नांगरून ठेवली होती. त्या रात्री अचानक समुद्रात आलेल्या जोरदार वाऱ्याच्या झोताने दवणे ह्याच्या पंचाली बोटीच्या अँकरला लावलेला जाडसर दोरखंड तुटून बोट किनाºयावर बांधलेल्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्यात अडकली. बंधाºयातील दगडामुळे बोटीचे नुकसान झाले असून अचानक समुद्रात झालेल्या ह्या बदला बाबत भीती व्यक्त केली जात आहे. शासनासह सहकारी संस्थांनी दवणे ह्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मच्छीमार सहकारी संस्थेचे संचालक तानाजी चौधरी ह्यांनी केली आहे.

समुद्रात मच्छीमारांनी मासेमारीला जाऊ नये अशा प्रकारच्या कुठल्याही सूचना आमच्या कडे आलेल्या नाहीत. - डॉ.नवनाथ जरे, निवासी उपजिल्हाधिकार,पालघर

टॅग्स :Vasai Virarवसई विरारSea Routeसागरी महामार्गfishermanमच्छीमार