शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
4
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
5
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
6
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
7
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
8
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
9
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
12
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
13
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
14
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
15
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
16
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
17
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
18
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
19
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
20
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 

फळभाज्यांचा माल घेऊन जाणारी पहाटेची लोकल सुरु करा; वसईकरांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 17:19 IST

Local Train : वसई तालुका हा कृषी प्रधान असून तेथील शेतकरी आज ही भाजी, केळी, फुले यांचे उत्पादन घेत असून जोडधंदा म्हणून दुधाचाही व्यवसाय करीत आहेत.

वसई :-वसईतील भाजी उत्पादक, फूल उत्पादक, दूध उत्पादक वसईकर शेतकरी व त्यांचा माल मुंबईस पहाटेच्या वेळेस घेऊन जाणारी बंद झालेली लोकल ट्रेन पुन्हा तात्काळ सुरु करा अशी मागणी ग्राम स्वराज्य अभियान च्या वतीनं मिलिंद खानोलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे यांच्याकडे केली आहे.

वसई तालुका हा कृषी प्रधान असून तेथील शेतकरी आज ही भाजी, केळी, फुले यांचे उत्पादन घेत असून जोडधंदा म्हणून दुधाचाही व्यवसाय करीत आहेत.गेली  अनेक वर्षे सकाळी विरार स्थानकातून सुमारे पहाटे 3.30 च्या सुमारास सुटणारी पहिली लोकल हि त्या शेतकऱ्याना स्वत:ला व आपला माल मुंबईत विक्रीकरिता नेण्यासाठी अत्यंत सोयीची व उपलब्ध होती.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून लोकलसेवा बंद करण्यात आली होती. गेल्या काही दिवसापासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी व  आज रोजी विशेषतः महिलांसाठी लोकल सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने आणि रेल्वे बोर्डाने घेतलेला आहे. त्या सेवा सुरू देखील आहेत.त्याचप्रमाणे नाशिवंत असलेला भाजीपाला, फुले, आणि दूध याची मुंबईस वाहतूक करून विक्री करू शकत नसल्याने वसईतील उत्पादकांवर आधीच आर्थिक संकट कोसळलेले आहे.

त्यांच्यासाठी असलेली सकाळी विरार स्थानकातून सुमारे पहाटे 3.30 च्या सुमारास सुटणारी पहिली लोकल सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास आणि ती सुरु झाल्यास उत्पादक शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळेल.

एकूणच तसा निर्णय शासनाने तात्काळ घेऊन व त्यास रेल्वे बोर्डाची मंजुरी घेऊन सदरहू लोकल लवकरात लवकर सुरू करावी अशी विनंती ग्राम स्वराज्य अभियानाच्या वतीने संस्थापक संयोजक मिलिंद खानोलकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासह पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे आणि खासदार राजेंद्र गावित यांच्याकडे देखील केली आहे.

टॅग्स :localलोकल