शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

भात खरेदी केंद्रावरील कर्मचारी ‘लेट लतिफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 01:18 IST

नवीन कर्मचारी देण्याची मागणी; शेतकऱ्यांचा वेळ व पैसा जातो वाया

पारोळ : शिरवली भात खरेदी केंद्रावर ठेवण्यात आलेले कर्मचारी वेळेवर येत नसल्याने व काही भात खरेदी केंद्रावर भात घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना भात केंद्राबाहेर ठेवावे लागत आहे. यामुळे शेतकºयांचा वेळ व पैसा वाया जात असल्याने परिसरातील शेतकरी अडचणीत असून खरेदी केंद्राला नवीन कर्मचारी द्यावा, अशी मागणी होत आहे.सरत्या वर्षी अस्मानी संकटाने कोलमडलेल्या बळीराजाला येणारे नवीन वर्ष हे शुभ संकेत देणारे ठरले. या वर्षी आधारभूत भात खरेदी केंद्रावर क्विंटलमागे दरात व देण्यात येणाºया बोनसमध्ये वाढ झाल्याने या वर्षी ही दरवाढ बळीराजाला दिलासा देणारी होती. मागील वर्षी क्विंटलमागे १७५० व बोनस २०० रुपये असा शासनाचा भाताला हमीभाव होता. पण या वर्षी दरात वाढ होत १८५० व बोनस ५०० असा दर लागू झाल्याने शेतकरी बांधवांसाठी ही समाधानाची बाब आहे, मात्र महामंडळाकडे कर्मचारी कमी असल्यामुळे शेतकरीवर्गाला भातविक्री करताना अडचण येत आहे. भात पीक घेणे हे आता शेतकरी यांच्यासाठी महागडे ठरत असून बी-बियाणे, खते, औषधे, मजुरी, टॅक्टरचे वाढणारे दर, निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकºयांना भात पीक घेणे परवडत नाही. काही शेतकरी दागिने गहाण ठेवत तर काही सेवा सोसायटीचे कर्ज घेत भात पिकांची लागवड करतात. पीक लागवडीचा खर्च वजा केला असता त्यांच्या हातात काहीच उरत नाही. जर हे भात जर व्यापारी वर्गाला विकले तर त्यांचा दर हा क्विंटल मागे १२०० ते १५०० असा आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग शेतकरी वर्गाची मोठी पिळवणूक करतात. त्यामुळे वसईतील शेतकरी यांच्या भात विक्रीसाठी राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित प्रादेशिक कार्यालय जव्हार अंतर्गत वसई तालुक्यात दोन भात केंद्रांना सुरुवात करण्यात आली. शिरवली, मेढे व भिनार या ठिकाणी भात खरेदी सुरू करण्यात आली.कर्मचारी एकचमहामंडळाकडे कर्मचारी कमी असल्याने या तीन ठिकाणची जबाबदारी एकाच कर्मचाºयावर देण्यात आली. प्रत्येक खरेदी केंद्राला आठवड्याचा वार ठरवून ती करण्यात आली. पण एक दिवस खरेदी असल्याने शिरवली खरेदी केंद्रावर शेतकरी वर्गाची गर्दी होत असल्याने सर्व शेतकरी यांची भात खरेदी होत नसल्याचे व मला रोज जव्हार वरून ये-जा करावी लागत असल्याने काही वेळा उशीर होत असल्याचे भात खरेदी केंद्र कर्मचारी इंगोले यांनी सांगितले.