शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

भात खरेदी केंद्रावरील कर्मचारी ‘लेट लतिफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 01:18 IST

नवीन कर्मचारी देण्याची मागणी; शेतकऱ्यांचा वेळ व पैसा जातो वाया

पारोळ : शिरवली भात खरेदी केंद्रावर ठेवण्यात आलेले कर्मचारी वेळेवर येत नसल्याने व काही भात खरेदी केंद्रावर भात घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना भात केंद्राबाहेर ठेवावे लागत आहे. यामुळे शेतकºयांचा वेळ व पैसा वाया जात असल्याने परिसरातील शेतकरी अडचणीत असून खरेदी केंद्राला नवीन कर्मचारी द्यावा, अशी मागणी होत आहे.सरत्या वर्षी अस्मानी संकटाने कोलमडलेल्या बळीराजाला येणारे नवीन वर्ष हे शुभ संकेत देणारे ठरले. या वर्षी आधारभूत भात खरेदी केंद्रावर क्विंटलमागे दरात व देण्यात येणाºया बोनसमध्ये वाढ झाल्याने या वर्षी ही दरवाढ बळीराजाला दिलासा देणारी होती. मागील वर्षी क्विंटलमागे १७५० व बोनस २०० रुपये असा शासनाचा भाताला हमीभाव होता. पण या वर्षी दरात वाढ होत १८५० व बोनस ५०० असा दर लागू झाल्याने शेतकरी बांधवांसाठी ही समाधानाची बाब आहे, मात्र महामंडळाकडे कर्मचारी कमी असल्यामुळे शेतकरीवर्गाला भातविक्री करताना अडचण येत आहे. भात पीक घेणे हे आता शेतकरी यांच्यासाठी महागडे ठरत असून बी-बियाणे, खते, औषधे, मजुरी, टॅक्टरचे वाढणारे दर, निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकºयांना भात पीक घेणे परवडत नाही. काही शेतकरी दागिने गहाण ठेवत तर काही सेवा सोसायटीचे कर्ज घेत भात पिकांची लागवड करतात. पीक लागवडीचा खर्च वजा केला असता त्यांच्या हातात काहीच उरत नाही. जर हे भात जर व्यापारी वर्गाला विकले तर त्यांचा दर हा क्विंटल मागे १२०० ते १५०० असा आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग शेतकरी वर्गाची मोठी पिळवणूक करतात. त्यामुळे वसईतील शेतकरी यांच्या भात विक्रीसाठी राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित प्रादेशिक कार्यालय जव्हार अंतर्गत वसई तालुक्यात दोन भात केंद्रांना सुरुवात करण्यात आली. शिरवली, मेढे व भिनार या ठिकाणी भात खरेदी सुरू करण्यात आली.कर्मचारी एकचमहामंडळाकडे कर्मचारी कमी असल्याने या तीन ठिकाणची जबाबदारी एकाच कर्मचाºयावर देण्यात आली. प्रत्येक खरेदी केंद्राला आठवड्याचा वार ठरवून ती करण्यात आली. पण एक दिवस खरेदी असल्याने शिरवली खरेदी केंद्रावर शेतकरी वर्गाची गर्दी होत असल्याने सर्व शेतकरी यांची भात खरेदी होत नसल्याचे व मला रोज जव्हार वरून ये-जा करावी लागत असल्याने काही वेळा उशीर होत असल्याचे भात खरेदी केंद्र कर्मचारी इंगोले यांनी सांगितले.