शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

भात खरेदी केंद्रावरील कर्मचारी ‘लेट लतिफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 01:18 IST

नवीन कर्मचारी देण्याची मागणी; शेतकऱ्यांचा वेळ व पैसा जातो वाया

पारोळ : शिरवली भात खरेदी केंद्रावर ठेवण्यात आलेले कर्मचारी वेळेवर येत नसल्याने व काही भात खरेदी केंद्रावर भात घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना भात केंद्राबाहेर ठेवावे लागत आहे. यामुळे शेतकºयांचा वेळ व पैसा वाया जात असल्याने परिसरातील शेतकरी अडचणीत असून खरेदी केंद्राला नवीन कर्मचारी द्यावा, अशी मागणी होत आहे.सरत्या वर्षी अस्मानी संकटाने कोलमडलेल्या बळीराजाला येणारे नवीन वर्ष हे शुभ संकेत देणारे ठरले. या वर्षी आधारभूत भात खरेदी केंद्रावर क्विंटलमागे दरात व देण्यात येणाºया बोनसमध्ये वाढ झाल्याने या वर्षी ही दरवाढ बळीराजाला दिलासा देणारी होती. मागील वर्षी क्विंटलमागे १७५० व बोनस २०० रुपये असा शासनाचा भाताला हमीभाव होता. पण या वर्षी दरात वाढ होत १८५० व बोनस ५०० असा दर लागू झाल्याने शेतकरी बांधवांसाठी ही समाधानाची बाब आहे, मात्र महामंडळाकडे कर्मचारी कमी असल्यामुळे शेतकरीवर्गाला भातविक्री करताना अडचण येत आहे. भात पीक घेणे हे आता शेतकरी यांच्यासाठी महागडे ठरत असून बी-बियाणे, खते, औषधे, मजुरी, टॅक्टरचे वाढणारे दर, निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकºयांना भात पीक घेणे परवडत नाही. काही शेतकरी दागिने गहाण ठेवत तर काही सेवा सोसायटीचे कर्ज घेत भात पिकांची लागवड करतात. पीक लागवडीचा खर्च वजा केला असता त्यांच्या हातात काहीच उरत नाही. जर हे भात जर व्यापारी वर्गाला विकले तर त्यांचा दर हा क्विंटल मागे १२०० ते १५०० असा आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग शेतकरी वर्गाची मोठी पिळवणूक करतात. त्यामुळे वसईतील शेतकरी यांच्या भात विक्रीसाठी राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित प्रादेशिक कार्यालय जव्हार अंतर्गत वसई तालुक्यात दोन भात केंद्रांना सुरुवात करण्यात आली. शिरवली, मेढे व भिनार या ठिकाणी भात खरेदी सुरू करण्यात आली.कर्मचारी एकचमहामंडळाकडे कर्मचारी कमी असल्याने या तीन ठिकाणची जबाबदारी एकाच कर्मचाºयावर देण्यात आली. प्रत्येक खरेदी केंद्राला आठवड्याचा वार ठरवून ती करण्यात आली. पण एक दिवस खरेदी असल्याने शिरवली खरेदी केंद्रावर शेतकरी वर्गाची गर्दी होत असल्याने सर्व शेतकरी यांची भात खरेदी होत नसल्याचे व मला रोज जव्हार वरून ये-जा करावी लागत असल्याने काही वेळा उशीर होत असल्याचे भात खरेदी केंद्र कर्मचारी इंगोले यांनी सांगितले.