शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

नालासोपारा, वसई शहरातून एसटी बंद

By admin | Updated: March 18, 2017 03:00 IST

१ एप्रिलपासून एसटी महामंडळाने नालासोपारा आणि वसई आगारातील शहरी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला असून परिवहन मंत्र्यांनीही त्याबाबत तातडीने कार्यवाही

- शशी करपे,  वसई

१ एप्रिलपासून एसटी महामंडळाने नालासोपारा आणि वसई आगारातील शहरी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला असून परिवहन मंत्र्यांनीही त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, जागेसाठी आग्रही असलेल्या वसई विरार महापालिकेला एसटीकडून अद्याप प्रतिसाद न मिळाल्याने जागेसाठी अडून बसलेली महापालिका परिवहनच्या बसेस सोडणार की, नाही याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.राज्य सरकारच्या धोरणानुसार एसटी महामंडळाने महापालिका हद्दीमधील शहरी बस वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्नाळा आगारातील शहरी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर नालासोपारा आणि वसई आगारातील उरलेल्या २५ मार्गांवरील शहरी बस वाहतूक बंद करण्याचा निर्णय सप्टेंबर महिन्यात घेण्यात आला होता. मात्र, वसईकरांनी केलेले आंदोलन आणि वसई विरार महापालिकेने मुदत मागवून घेतल्यानंतर एसटीने ३१ मार्चपर्यंत एसटी सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, महापालिकेने एसटीने भाडे तत्वावर जागा द्यावी अशी मागणी केली आहे.परिवहनकडे स्वत:ची जागा नाही. स्टँड नाही. त्यामुळे प्रवाशांना सुविधा देणे अवघड होत आहे. एसटीने जागा भाड्याने दिल्यास परिवहनला बस सुरु करणे सोपे होईल, असे महापालिकेचे म्हणणे आहे. जागा मिळत नाही तोपर्यंत महापालिका बस सेवा सुरु करणार नाही, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी मुंबई सेंट्रल येथील कार्यालयात महापालिका आणि एसटी अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबैठकीत महापालिका जागेचा आग्रह धरणार आहे. या बैठकीत एसटीने जागा देण्याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली नाही तर मात्र, महापालिका बस सुरु करणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे हजारो प्रवाशांना जानेवारी महिन्यात एसटीने अचानक बस बंद केल्यानंतर चार दिवस जो त्रास सहन करावा लागला तसाच त्रास पुन्हा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, एसटी बचाव आंदोलन समिती एसटीनेच बस सेवा कायम सुरु ठेवावी अशी पुन्हा मागणी केली आहे. महापालिका स्वत: बस चालवणार असेल तर हरकत नाही. पण, ठेका पद्धतीवर कंत्राटदार बस चालवणार असेल तर ग्रामीण भागातून त्याला विरोध केला जाईल, असा इशारा दिला आहे.परिवहनमंत्र्यांकडूनही स्पष्ट आदेश नाहीतगुरवारी परिवहन मंत्री दिवावकर रावते पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी महापालिकेचे परिवहन सभापती भरत गुप्ता यांनी महापालिक ा अधिकाऱ्यांसह त्यांची विरार येथे भेट घेऊन जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून मार्ग काढा असा सल्ला रावते यांनी दिला. रावते यांनी एसटीची शहरी वाहतूक वसई विरार महापालिकेला हस्तांतरीत करण्याबाबत तातडीने बैठक घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी अधिकाऱ्यांनी यावेळी दिले. मात्र, महापालिकेच्या मागणी संदर्भात निर्णय दिला नाही. उलट एसटीच्या जागा महापालिकेला कशा देणार असा प्रतिसवाल रावते यांनी या बैठकीत उपस्थित केला होता. २४ मार्च रोजी सुनावणीवसईत एस.टी.सेवा सुरु ठेवण्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनआंदोलन समिती तर्फेडॉमनिका डाबरे यांच्या वतीने शुक्र वारी जनिहत याचिका दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात २४ मार्च रोजी पाहिली सुनावणी होणार असुन अँड रवी लोखंडे समितीच्या वतीने बाजू मांडणार आहेत.जागेची अडचण असल्याने परिवहन सेवेला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एसटीने भाडेतत्वावर जागा उपलब्ध करून नाही दिली तर बस सेवा सुरु करता येणार नाही. - भरत गुप्ता, सभापती, परिवहन समिती