शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

या हंगामातील पीककर्जही माफ करा, शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 00:53 IST

अतिवृष्टीमुळे यंदा भातशेतीचे मोठे नुकसान झाल्याने थकीत कर्जमाफी सोबतच यंदा घेतलेले पीककर्ज माफ व्हावे, अशी मागणी शेतकरी वर्ग करू लागला आहे.

पारोळ : अतिवृष्टीमुळे यंदा भातशेतीचे मोठे नुकसान झाल्याने थकीत कर्जमाफी सोबतच यंदा घेतलेले पीककर्ज माफ व्हावे, अशी मागणी शेतकरी वर्ग करू लागला आहे.भातशेती मजुरी, खते, बियाणे, साधने हे शेती कसण्यासाठी लागणारे साहित्य महाग झाल्याने शेती करणे शेतकरी वर्गाला परवडत नसतानाही सेवा सोसायटीचे कर्ज काढून शेतकरी शेती करतो. पण यंदा पूर्ण रब्बी हंगामात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी वर्गाला भातपिकाची दुबार पेरणी व लावणी करावी लागली. तसेच पिकाची कापणी केली असताना सतत पडण्याºया पावसामुळे पीक व भाताचे तणही वाया गेले. पिकांची सरकारी नुकसानभरपाईही तुटपुंजी मिळाली. यामुळे यंदा आम्ही घेतलेले पीक कर्ज भरायचे कसे हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला. सरकारने मागील वर्षी पिकांचे नुकसान झाले नसतानाही थकीत कर्ज माफ केले. यंदा मात्र नुकसानीच्या जखमेवर कमी नुकसान भरपाईचे मलम लावला. यामुळे यंदा घेतलेले पीककर्ज फेडायचे कसे हा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.तालुक्यात शिरवली, सायवन सेवा, भाताणे सेवा, खानिवडे, कणेर सेवा, धानिव सेवा व कामण सेवा या सहकारी सोसायटी असून खरीप व हंगामी पिकासाठी शेतकरी वर्गाला बिनव्याजी पुरवठा करतात.>मी वीस वर्षांपासून घेतलेले पीक कर्ज भरणा करत असून आम्ही कोणत्याही कर्जमाफीचा लाभ घेतला नाही. पण यंदा मात्र पावसाने माझ्या भात शेतीचे मोठे नुकसान केल्याने आणि सरकारने थकीत पीक कर्ज माफ केले असले तरी या वर्षीचे घेतलेले पीक कर्ज भरायचे कसे हा प्रश्न माझ्या समोर आहे.- भालचंद्र पाटील, शेतकरी, उसगाव.