शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
2
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
3
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
4
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
5
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
6
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
7
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
8
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
9
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
10
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
11
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
12
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
13
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
14
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
15
Pune Hit And Run: टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले
16
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
17
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
18
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
19
IND vs SA: रोहित-विराट पुन्हा संघात दिसणार, बुमराह बाहेर जाणार; 'या' खेळाडूचाही पत्ता कट?
20
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

समस्या सोडविण्यासाठी, विद्यार्थांचा मोर्चा

By admin | Updated: December 16, 2015 00:21 IST

आदिवासी विकास विभाग व विकास प्रकल्पांतर्गत चालवण्यात येणा-या आदिवासी वसतिगृहातील समस्या सोडविण्यासाठी आदिवासी विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र

जव्हार : आदिवासी विकास विभाग व विकास प्रकल्पांतर्गत चालवण्यात येणा-या आदिवासी वसतिगृहातील समस्या सोडविण्यासाठी आदिवासी विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र यांच्या वतीने मंगळवार दुपारी १ वाजता, जव्हार आदिवासी विकास प्रकल्पावर शेकडों विद्यार्थांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. वसतीगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थांसमोर अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड व काही पनवेल येथील वसतिगृहात राहणारे विद्यार्थी या मोर्च्यात सहभागी झाले होते. या मोर्चाची सुरुवात हनुमान पॉइंट जवळील वसतिगृहापासून झाली. शेकडो विद्यार्थी मोर्च्यात सहभागी झाले होते व मोर्च्यादरम्यान विद्यार्थांनी घोषणा दिल्या. गांधीचौक, यशवंत नगर, येथून थेट जव्हार प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढणात आला. तसेच चार महिन्यापूर्वी पनवेल येथे आदिवासी विद्यार्थांनी काढलेल्या मोर्च्याला हिंसक वळण लागल्याने, मोर्चा काढणाऱ्या, आदिवासी विद्यार्थांवर यापूर्वी फौजदारी गुन्हे झाले होते. असे होऊ नये म्हणून, येथील पोलिसांनी आज खबदारी घेतली होती. पोलीस फोर्स वाढवून चोख बंदोबस्त लावला होता. प्रकल्प कायार्लायाच्या बाहेर बंदोबस्त लावण्यात आला होता. वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थांनी मोर्च्या दरम्यान करण्यात आलेल्या मागण्या, वसतिगृहात प्रवेश क्षमता वाढवून प्रवेशापासून वंचित राहणा-या आदिवासी विद्यार्थांना प्रवेश देण्यात यावा. ११.११.२०११ चा शासन निर्णय लागू करण्यात यावा. जव्हार येथील आदिवासी मुलांच्या नवीन वसतिगृहाची इमारत तात्काळ बदलण्यात यावी. मुलींच्या वसतिगृहात महिला गृहपालांची नेमणूक करावी. वसतिगृहातील भोजन ठेके आदिवासी महिला बचत गटांना द्यावेत. वसतिगृहातील मागील वर्षाची शिष्यवृत्ती देण्यात यावी. जुन्या वसतिगृहाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी. जव्हार कुपोषण मुक्त करण्यासाठी निधीचा उपयोग योग्य करावा. बेरोजगारांना व्यवसायिक प्रशिक्षण देवून व्यवसायासाठी निधी द्यावा. भाडे तत्वावर चालू असणाऱ्या वसतिगृहाच्या इमारतींचे बांधकाम लवकरच चालू करण्यात यावे आदी मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या त्या पूर्ण करण्याचे आश्वासन प्रकल्प अधिकारी- बाबासाहेब पारधे यांनी दिला आहे.