शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

साठ नवे वर्ग, नववीची समस्या सुटली लोकमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:59 IST

या जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत ६० वर्ग सुरु करण्यास शासनाने सोमवारी मान्यता दिल्याने शाळा सुरु होऊनही गेली दोन महिने शाळेबाहेर राहिलेल्या हजारो विद्यार्थ्यांची नववीतील प्रवेशाची समस्या सुटली आहे.

पालघर : या जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत ६० वर्ग सुरु करण्यास शासनाने सोमवारी मान्यता दिल्याने शाळा सुरु होऊनही गेली दोन महिने शाळेबाहेर राहिलेल्या हजारो विद्यार्थ्यांची नववीतील प्रवेशाची समस्या सुटली आहे. जिल्ह्यातील ९ वीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न एका बाजूने मार्गी लागत असताना स्वातंत्रोत्तर काळात जिल्हा परिषदेमार्फत नववीचे वर्ग प्रथमच सुरु होत असल्याने हा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे.पालघर जिल्ह्यात ८ वी उत्तीर्ण होऊन ९ वीत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या जास्त व शाळा त्यामानाने अपुºया पडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालकमंत्री विष्णू सवरा, आमदार पास्कल धनारे, जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले, उपाध्यक्ष सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी व शिक्षणाधिकाºयांनी गेल्या महिन्यात शिक्षणमंत्र्यांची यासंदर्भात भेट घेतली. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांच्या सांगण्यावरून जिल्हापरिषदेतील अशा शाळांचे प्रस्ताव मंत्रालयीन पातळीवर पाठविण्यात आले याचबरोबरीने या प्रश्नाचे गांभीर्य पाहता आदिवासी विकास विभागानेही यासंबंधीचे आपले प्रस्ताव पाठविले होते.मंत्रालयीन पातळीवर पालकमंत्री सवरा, आमदार धनारे, आमदार अमित घोडा यांच्यासह जिल्हा परिषदेच्या शिष्टमंडळाने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर काल शिक्षणमंत्र्यांशी झालेल्या चर्चेअंती त्यांनी जिल्ह्यातील ६० जिल्हा परिषद शाळांना ९ वी व १० वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता दिली.अशा वर्गाना मान्यता देणारा पालघर हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा ठरला आहे.