शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
4
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
5
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
6
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
7
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
8
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
9
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
10
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
11
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
12
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
13
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
14
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
15
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
16
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
17
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
18
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
19
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
20
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?

सोळाही नाक्यांवर सुरू राहणार १२ वर्षे टोल वसुली

By admin | Updated: December 13, 2015 00:08 IST

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या व मुंबई महानगराचे प्रवेशव्दार असलेल्या ठाणे- पालघरमधील १६ही टोलनाके पुढील १२ वर्षे बंद होण्याची शक्यता नसल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री

- सुरेश लोखंडे,  ठाणेदेशाची आर्थिक राजधानी असलेल्या व मुंबई महानगराचे प्रवेशव्दार असलेल्या ठाणे- पालघरमधील १६ही टोलनाके पुढील १२ वर्षे बंद होण्याची शक्यता नसल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीच जाहीर केल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. हे टोलनाके म्हणजे जिझिया कर असल्याची टीका करून जिल्हा नियोजन समितीचे कामकाज रोखून धरणाऱ्या आमदारांना यापुढील काळात कामही रोखता येत नाही आणि टोलला विरोधही करता येत नाही, अशा अवस्थेला सामोरे जावे लागणार आहे. राज्यात सर्वात जास्त टोलनाके ठाणे जिल्ह्यात आहेत. ते बंद करण्यासाठी केलेले आंदोलन हा अविचार होता की काय, अशी भावना शिवसैनिकांत आहे. राज्यातील १२ टोलनाके ज्यावेळी बंद झालेत. त्यावेळी चार टोल नाक्यांवरील केवळ चारचाकी, दुचाकीसह बसचा टोल बंद झाला. पण त्या नाक्यांचा वापरच कमी प्रमाणात होत होता. या प्रश्नाचा पूर्ण अभ्यास न करता लोकप्रतिनिधींसह जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी स्वत:साठी टोलमाफीचा पास मिळवण्याचा आग्रह मात्र सतत धरला. राजकारण्यानी पासव्दारे टोल माफ करून घ्यायचा आणि जनतेला मात्र तो भरण्यास भाग पाडायचे, त्यासाठी दांडगाई करायची, अशी दुटप्पी भूमिका या काळात पाहायला मिळाली. ठाणे-पालघर जिल्ह्यातून मुंबई-अहमदाबाद, आग्रा, बेंगळुरू व गोवा आदी चार राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. शिवाय चारही बाजूंनी हे जिल्हे राजमार्गांनी वेढलेले आहेत. अगदी कमी किलोमीटरच्या अंतरावर वेगवेगळ््या यंत्रणांचे १६ टोल नाके जागोजाग उभे आहेत. तेथे आयआरबी, गॅमन इंडिया, सुप्री्रम इन्फ्रास्ट्रक्चर, डी. के. प्लस, केटी, संगम इंडिया, जयभारत, अ‍ॅटलांटा आदी खासगी कंपन्याकडून टोल वसूली सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग किंवा राज्यमार्गावरील सुमार ३५ किलोमीटरच्या अंतरावर एक टोल नाका सुरू करण्याचे धोरण आहे. मात्र सरकारच्या या आदेशाची पायमल्ली करून कमी अंतरावर टोलनाके असल्याच्या तक्रारी आहेत. सोयीनुसार हे अंतर जुळवून आणले जाते. त्यामुळे टोलवसुली बिनबोभाट सुरू आहे आणि आता पुढील १२ वर्षे तो सुरू राहील, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.