शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

जव्हार तहसीलमध्ये सर्वत्र शुकशुकाट

By admin | Updated: June 13, 2017 03:07 IST

पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा व तलासरी हे शंभर टक्के आदिवासी तालुके असून त्यामध्ये प्रशासनाच्या विविध पदांवर कार्यरत असणारे अधिकारी अजूनही

- हुसेन मेमन । लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा व तलासरी हे शंभर टक्के आदिवासी तालुके असून त्यामध्ये प्रशासनाच्या विविध पदांवर कार्यरत असणारे अधिकारी अजूनही येथे वास्तव्यास नाहीत. त्यामुळे येथील तहसीलमध्ये शुकशुकाटच असतो.प्रामुख्याने जव्हारचा विचार करता येथे येणारे अधिकारी नियुक्त असतांनाही येथे स्थायिक नाहीत. नाशिक, ठाणे, कल्याण व पालघर येथून ते रोज ये-जा करतात. या मुळे येथील स्थानिकांच्या समस्या सुटत नाहीत कामे होत नाहीत. कुपोषण, रोजगार, शिक्षण व बालमजुरी या येथील प्रमुख समस्या आहेत. मात्र, जिल्ह्याच्या विकासाचा गाडा हाकणारे प्रशासकीय अधिकारी येथे राहतच नसल्याने ते अद्यापही या भागाशी समरस झालेले नाहीत. उशिरा येणे, कामाला दांड्या, कामाचा अतिरीक्त बोझा या प्रकारामुळे आजही अनेक प्रकारणांच्या फाईली रखडलेल्या आहेत. जर एखादी आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास ती नियंत्रणात आणणे अशक्य ठरावे अशी स्थिती आहे.तालुक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांपासून शिपाया पर्यंत सर्वांनाच इतर भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक पगार शासनाकडून मिळतो. यामध्ये दुर्गम भागात काम करीत असल्याच्या विशेष भत्त्याचा समावेश असतो. तरीही ही अवस्था आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतरही येरे माझ्या मागल्याया भागातील शिपाई, शिक्षक, आश्रमशाळा, आरोग्य, बांधकाम विभाग, पंचायत समिती, ग्रामसेवक महसूल खाते अशा विभागातील कर्मचारी तालुक्यात राहत नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी प्रशांत नरनावरे यांनी जव्हार-मोखाडा येथील कार्यालयात अचानक भेट देऊन अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर निलबंनाची तर काही कर्मचाऱ्यांवर शो कॉज बजावल्या आहेत. मात्र, तरीही परिस्थिती जैसे थे आहे.एक नव्हे असंख्य कारणे : कधी दौरा, कधी मिटींंग, कधी अतिरीक्त कार्यभार तर कधी मुख्यालयाला जावे लागणे अशी अनेक कारणे कागदोपत्री दाखवून कार्यालयात नसण्याचे समर्थन केले जाते त्यात जोडून सुट्या त्याला जोडून घेतलेल्या रजा, आजारपण, प्रतिनियुक्ती, प्रशिक्षण, हंगामी कार्यभार अशाचीही भर पडते त्यातून कार्यालयात शुकशुकाट निर्माण होतो.निवासी भत्त्याची ‘चोरी’पावसाळ्याच्या दिवसात तर कुठे पुलावर पाणी साचले अन कुठे दरड कोसळली तर अनेक कार्यालयात शुकशुकाट असतो. याचा परीणाम येथील विकास कामे व जनतेची दैनंदिन कामे यावर होतो. रोजगाराअभावी बांधवांना खळगी भरण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागते. मात्र, निवासी भत्त्यासाठी खोटी माहीती पुरवून शासनाची दिशाभूल करण्याचे काम हे कर्मचारी करतात.