शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार तहसीलमध्ये सर्वत्र शुकशुकाट

By admin | Updated: June 13, 2017 03:07 IST

पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा व तलासरी हे शंभर टक्के आदिवासी तालुके असून त्यामध्ये प्रशासनाच्या विविध पदांवर कार्यरत असणारे अधिकारी अजूनही

- हुसेन मेमन । लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा व तलासरी हे शंभर टक्के आदिवासी तालुके असून त्यामध्ये प्रशासनाच्या विविध पदांवर कार्यरत असणारे अधिकारी अजूनही येथे वास्तव्यास नाहीत. त्यामुळे येथील तहसीलमध्ये शुकशुकाटच असतो.प्रामुख्याने जव्हारचा विचार करता येथे येणारे अधिकारी नियुक्त असतांनाही येथे स्थायिक नाहीत. नाशिक, ठाणे, कल्याण व पालघर येथून ते रोज ये-जा करतात. या मुळे येथील स्थानिकांच्या समस्या सुटत नाहीत कामे होत नाहीत. कुपोषण, रोजगार, शिक्षण व बालमजुरी या येथील प्रमुख समस्या आहेत. मात्र, जिल्ह्याच्या विकासाचा गाडा हाकणारे प्रशासकीय अधिकारी येथे राहतच नसल्याने ते अद्यापही या भागाशी समरस झालेले नाहीत. उशिरा येणे, कामाला दांड्या, कामाचा अतिरीक्त बोझा या प्रकारामुळे आजही अनेक प्रकारणांच्या फाईली रखडलेल्या आहेत. जर एखादी आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास ती नियंत्रणात आणणे अशक्य ठरावे अशी स्थिती आहे.तालुक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांपासून शिपाया पर्यंत सर्वांनाच इतर भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक पगार शासनाकडून मिळतो. यामध्ये दुर्गम भागात काम करीत असल्याच्या विशेष भत्त्याचा समावेश असतो. तरीही ही अवस्था आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतरही येरे माझ्या मागल्याया भागातील शिपाई, शिक्षक, आश्रमशाळा, आरोग्य, बांधकाम विभाग, पंचायत समिती, ग्रामसेवक महसूल खाते अशा विभागातील कर्मचारी तालुक्यात राहत नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी प्रशांत नरनावरे यांनी जव्हार-मोखाडा येथील कार्यालयात अचानक भेट देऊन अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर निलबंनाची तर काही कर्मचाऱ्यांवर शो कॉज बजावल्या आहेत. मात्र, तरीही परिस्थिती जैसे थे आहे.एक नव्हे असंख्य कारणे : कधी दौरा, कधी मिटींंग, कधी अतिरीक्त कार्यभार तर कधी मुख्यालयाला जावे लागणे अशी अनेक कारणे कागदोपत्री दाखवून कार्यालयात नसण्याचे समर्थन केले जाते त्यात जोडून सुट्या त्याला जोडून घेतलेल्या रजा, आजारपण, प्रतिनियुक्ती, प्रशिक्षण, हंगामी कार्यभार अशाचीही भर पडते त्यातून कार्यालयात शुकशुकाट निर्माण होतो.निवासी भत्त्याची ‘चोरी’पावसाळ्याच्या दिवसात तर कुठे पुलावर पाणी साचले अन कुठे दरड कोसळली तर अनेक कार्यालयात शुकशुकाट असतो. याचा परीणाम येथील विकास कामे व जनतेची दैनंदिन कामे यावर होतो. रोजगाराअभावी बांधवांना खळगी भरण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागते. मात्र, निवासी भत्त्यासाठी खोटी माहीती पुरवून शासनाची दिशाभूल करण्याचे काम हे कर्मचारी करतात.