शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंविरोधात श्रमजीवी हायकोर्टात

By admin | Updated: May 9, 2017 00:22 IST

पालघर जिल्ह्यातील कुपोषण, अंगांवाडी सेविकांचे प्रश्न आणि या पाशर््वभूमीवर श्रमजीवीने केलेल्या आंदोलनाला सीईओ चौधरींनी बदनाम केले.

हुसेन मेमन । लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : पालघर जिल्ह्यातील कुपोषण, अंगांवाडी सेविकांचे प्रश्न आणि या पाशर््वभूमीवर श्रमजीवीने केलेल्या आंदोलनाला सीईओ चौधरींनी बदनाम केले. आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करून सोशल मिडियावर संघटनेच्या कार्यकर्त्यांवर धादांत खोटे आरोप केल्याप्रकरणी संस्थापक विवेक पंडीत व श्रमजीवीने मुंबई हायकोर्टात दाद मागितली असून याप्रकरणी दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेतले जावे व संघटनेच्या आणि कार्यकर्त्यांच्या झालेल्या बदनामीपोटी उचित अशी भरपाई मिळावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. ही माहिती विवेक पंडित यांनी येथील पत्रकारांशी साधलेल्या अनौपचारिक संवादात दिली. लोकशाही मार्गाने रस्त्यावरची लढाई समर्थपणे सुरू असतांना श्रमजीवी आता स्वातंत्र्याचे मारेकरी बनू पाहणाऱ््या अधिकाऱ्यांना न्यायालयात खेचणार आहे. असे त्यांनी सांगितले. आम्ही लोकशाहीचे अनुयायी आहोत, न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास असल्याने आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचेही ते म्हणाले. यात पंडित यांच्यासह ३७ आंदोलकांना भरपाई मिळावी अशीही याचिकाकर्त्यांची मागणी आहे. २४ एप्रिल रोजी पालघर जिल्हा परिषदेवर श्रमजीवी संघटनेने आंदोलन केले होते. कुपोषित बालकांना मिळत असलेल्या नित्कृष्ट पोषण आहार बंद करावा आण िअंगवाडी सेविकांचे मानधन, पोषण आहाराची थकीत बिलं वेळेत तात्काळ अदा करावी या मागणीसाठी केलेल्या आंदोलना दरम्यान प्रश्नांना उत्तरे न देता निघून जात असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी यांची गाडी श्रमजीवी च्या कार्यकर्त्यांनी अडवली. याबाबत तब्बल २४ तासानंतर पंडित यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल केला होता. विशेष म्हणजे चौधरी यांनी सोशल मीडियावर या आंदोलनाची तुलना सीताहरण आणि द्रौपदी वस्त्रहरणाशी केली होती. मात्र पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत असे काहीही नमूद केले नाही. मुळात असा कोणताही अनुचित प्रकार झाला नसतांना निधी चौधरी यांनी श्रमजीवी संघटनेची बदनामी होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या होत्या. त्यानंतर जनतेला वेठीस धरून जिल्हापरिषद अधिकाऱ््यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. यानंतर विवेक पंडित यांच्यासह इतर २५ कार्यकर्ते आणि ११ महिला कार्यकर्त्यांनी जामीन नाकारून तुरु ंगवास पत्करला होता.यामुळे लोकशाही मार्गाने होणारे आंदोलनं चिरडण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करून या अधिकाऱ्यांविरोधात श्रमजीवी संघटनेच्या सभासदांनी पालघर जिल्ह्यासह ठाणे, नाशिक, रायगड जिल्ह्यात आंदोलने केली. यानंतर विवेक पंडितांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयावर चर्चेला आमंत्रित केल्याने पंडितांसह सर्व कार्यकर्त्यांनी जामीन स्वीकारला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याबतचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.