शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

विक्रमगडच्या बाजारपेठेत अजूनही शुकशुकाट

By admin | Updated: January 23, 2017 05:13 IST

अजूनही या परिसतील एटीएम व बॅकांमध्ये पुरेसे चलन उपलब्ध होत नसल्याने विक्रमगड तालुक्यातील ९५ गावपाडयातून

विक्रमगड : अजूनही या परिसतील एटीएम व बॅकांमध्ये पुरेसे चलन उपलब्ध होत नसल्याने विक्रमगड तालुक्यातील ९५ गावपाडयातून जवळजवळ २० किलोमीटरहून आलेल्या खातेदारांना अदयापही अडचणींचा सामना करावा लागतो आहे़. बॅकांमधून आठवडयाला फक्त २४ हजार रुपये काढण्याचे निर्बंध आहेत. परंतु तेवढे चलन बँकात नसल्याने त्या देतील तेवढेच पैसे ठेवीदारांना स्वीकारावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांत संताप आहे, अदयापही ग्राहकांची मोठी गैरसोय होत असल्याने येथील बाजारपेठेतील मंदी अजूनही कायम आहे. सोमवार व बुधवार सोडले तर बाकीच्या दिवसांत बोहोणीसुध्दा होत नसल्याच्या तक्रारी व्यापारीवर्गाकडून होत आहेत़ याबाबत कॉग्रेस व राष्ट्रवादीने आंदोलन देखील केले मात्र अजूनही स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. याचा मोठा फटका नागरिंकाना व त्यामुळे व्यापारी वर्गाला बसतो आहे़दरम्यान जुना नोटांची मुदत संपून बॅकेत ग्राहकांच्या जुना नोटा बदलुन रक्कम खात्यावर जमा झाली आहे़ आता खात्यातून पैसे काढतांना आपण मागू तेवढ्या नविन नोटा मिळणार या आशेवर सर्वानीच आपल्या आपल्या गरजेच्या कामांना सुरुवात केली होती. यात घर दुरुस्ती, शेतीपंप दुरुस्ती, नवीन औजारांची खरेदी, औषधे, नविन घर बांधणी, शाळा, कॉलेजची फी, अशी अनेक महत्वाची जी कामे नोटा बंदीच्या काळात झाली नव्हती. ती आता होतील अशी ठेवीदारांची अपेक्षा होती ती फोल ठरली आहे. कित्येक नागरिकांना आजही बॅकांमध्ये तासनतास रांगा लाऊनही हातामध्ये तुटपुंजी रक्कम पडते आहे़ अजूनही याभागातील बॅकेमध्ये दुपारनंतर पैसे नसल्याने रिकाम्या हाती परतावे लागत आहे़नोकरदारांनी सांगीतले की, आम्हांस आजारपणाकरीता तसेच आॅपरेशन करीता पैशांची अत्यंत गरज आहे. आमच्या खात्यामध्ये पैसे देखील आहेत़ परंतु बॅकेकडे पैसे नसल्याने व आठवडयाकरीता फक्त २४ हजार रुपये काढण्याची मुभा असली तरी तेवढेही पैसे बँक देत नसल्याने पैसे कसे उभे करायचे? अशी मोठी अडचण आहे़ सर्वाचीच ही परिस्थीती असल्याने कुणाकडे उसनवारी मागितली तर त्याचेजवळ देखील रोख रक्कम नसल्याने अडचणीमध्ये अजूनही भर पडत आहे़आदिवासी व दुर्गम भागात असलेल्या विक्रमगड या भागातील सामान्य माणूस आदिवासी, अशिक्षीत शेतकरी, शेतमजूर, अजूनही गोंधळला आहे़ कारण त्याच्याकडे जी काही तुटपूंजी रक्कम जमवली आहे़ ती त्यांनी बँकेत भरलेली आहे व ती रक्कम अडीअडचणींमध्ये उपयोगी यावी करीता त्याची आजही धडपड चालू त्यामुळे सर्वच बँकामध्ये आजही गर्दी आहे. सकाळपासून ते सायंकाळपर्यत गर्दी कायम आहे, त्यात आदिवासी स्त्री-पुरुषांची संख्या जास्त दिसते़ (वार्ताहर)