शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

विक्रमगडच्या बाजारपेठेत अजूनही शुकशुकाट

By admin | Updated: January 23, 2017 05:13 IST

अजूनही या परिसतील एटीएम व बॅकांमध्ये पुरेसे चलन उपलब्ध होत नसल्याने विक्रमगड तालुक्यातील ९५ गावपाडयातून

विक्रमगड : अजूनही या परिसतील एटीएम व बॅकांमध्ये पुरेसे चलन उपलब्ध होत नसल्याने विक्रमगड तालुक्यातील ९५ गावपाडयातून जवळजवळ २० किलोमीटरहून आलेल्या खातेदारांना अदयापही अडचणींचा सामना करावा लागतो आहे़. बॅकांमधून आठवडयाला फक्त २४ हजार रुपये काढण्याचे निर्बंध आहेत. परंतु तेवढे चलन बँकात नसल्याने त्या देतील तेवढेच पैसे ठेवीदारांना स्वीकारावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांत संताप आहे, अदयापही ग्राहकांची मोठी गैरसोय होत असल्याने येथील बाजारपेठेतील मंदी अजूनही कायम आहे. सोमवार व बुधवार सोडले तर बाकीच्या दिवसांत बोहोणीसुध्दा होत नसल्याच्या तक्रारी व्यापारीवर्गाकडून होत आहेत़ याबाबत कॉग्रेस व राष्ट्रवादीने आंदोलन देखील केले मात्र अजूनही स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. याचा मोठा फटका नागरिंकाना व त्यामुळे व्यापारी वर्गाला बसतो आहे़दरम्यान जुना नोटांची मुदत संपून बॅकेत ग्राहकांच्या जुना नोटा बदलुन रक्कम खात्यावर जमा झाली आहे़ आता खात्यातून पैसे काढतांना आपण मागू तेवढ्या नविन नोटा मिळणार या आशेवर सर्वानीच आपल्या आपल्या गरजेच्या कामांना सुरुवात केली होती. यात घर दुरुस्ती, शेतीपंप दुरुस्ती, नवीन औजारांची खरेदी, औषधे, नविन घर बांधणी, शाळा, कॉलेजची फी, अशी अनेक महत्वाची जी कामे नोटा बंदीच्या काळात झाली नव्हती. ती आता होतील अशी ठेवीदारांची अपेक्षा होती ती फोल ठरली आहे. कित्येक नागरिकांना आजही बॅकांमध्ये तासनतास रांगा लाऊनही हातामध्ये तुटपुंजी रक्कम पडते आहे़ अजूनही याभागातील बॅकेमध्ये दुपारनंतर पैसे नसल्याने रिकाम्या हाती परतावे लागत आहे़नोकरदारांनी सांगीतले की, आम्हांस आजारपणाकरीता तसेच आॅपरेशन करीता पैशांची अत्यंत गरज आहे. आमच्या खात्यामध्ये पैसे देखील आहेत़ परंतु बॅकेकडे पैसे नसल्याने व आठवडयाकरीता फक्त २४ हजार रुपये काढण्याची मुभा असली तरी तेवढेही पैसे बँक देत नसल्याने पैसे कसे उभे करायचे? अशी मोठी अडचण आहे़ सर्वाचीच ही परिस्थीती असल्याने कुणाकडे उसनवारी मागितली तर त्याचेजवळ देखील रोख रक्कम नसल्याने अडचणीमध्ये अजूनही भर पडत आहे़आदिवासी व दुर्गम भागात असलेल्या विक्रमगड या भागातील सामान्य माणूस आदिवासी, अशिक्षीत शेतकरी, शेतमजूर, अजूनही गोंधळला आहे़ कारण त्याच्याकडे जी काही तुटपूंजी रक्कम जमवली आहे़ ती त्यांनी बँकेत भरलेली आहे व ती रक्कम अडीअडचणींमध्ये उपयोगी यावी करीता त्याची आजही धडपड चालू त्यामुळे सर्वच बँकामध्ये आजही गर्दी आहे. सकाळपासून ते सायंकाळपर्यत गर्दी कायम आहे, त्यात आदिवासी स्त्री-पुरुषांची संख्या जास्त दिसते़ (वार्ताहर)