शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

विक्रमगडच्या बाजारपेठेत अजूनही शुकशुकाट

By admin | Updated: January 23, 2017 05:13 IST

अजूनही या परिसतील एटीएम व बॅकांमध्ये पुरेसे चलन उपलब्ध होत नसल्याने विक्रमगड तालुक्यातील ९५ गावपाडयातून

विक्रमगड : अजूनही या परिसतील एटीएम व बॅकांमध्ये पुरेसे चलन उपलब्ध होत नसल्याने विक्रमगड तालुक्यातील ९५ गावपाडयातून जवळजवळ २० किलोमीटरहून आलेल्या खातेदारांना अदयापही अडचणींचा सामना करावा लागतो आहे़. बॅकांमधून आठवडयाला फक्त २४ हजार रुपये काढण्याचे निर्बंध आहेत. परंतु तेवढे चलन बँकात नसल्याने त्या देतील तेवढेच पैसे ठेवीदारांना स्वीकारावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांत संताप आहे, अदयापही ग्राहकांची मोठी गैरसोय होत असल्याने येथील बाजारपेठेतील मंदी अजूनही कायम आहे. सोमवार व बुधवार सोडले तर बाकीच्या दिवसांत बोहोणीसुध्दा होत नसल्याच्या तक्रारी व्यापारीवर्गाकडून होत आहेत़ याबाबत कॉग्रेस व राष्ट्रवादीने आंदोलन देखील केले मात्र अजूनही स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. याचा मोठा फटका नागरिंकाना व त्यामुळे व्यापारी वर्गाला बसतो आहे़दरम्यान जुना नोटांची मुदत संपून बॅकेत ग्राहकांच्या जुना नोटा बदलुन रक्कम खात्यावर जमा झाली आहे़ आता खात्यातून पैसे काढतांना आपण मागू तेवढ्या नविन नोटा मिळणार या आशेवर सर्वानीच आपल्या आपल्या गरजेच्या कामांना सुरुवात केली होती. यात घर दुरुस्ती, शेतीपंप दुरुस्ती, नवीन औजारांची खरेदी, औषधे, नविन घर बांधणी, शाळा, कॉलेजची फी, अशी अनेक महत्वाची जी कामे नोटा बंदीच्या काळात झाली नव्हती. ती आता होतील अशी ठेवीदारांची अपेक्षा होती ती फोल ठरली आहे. कित्येक नागरिकांना आजही बॅकांमध्ये तासनतास रांगा लाऊनही हातामध्ये तुटपुंजी रक्कम पडते आहे़ अजूनही याभागातील बॅकेमध्ये दुपारनंतर पैसे नसल्याने रिकाम्या हाती परतावे लागत आहे़नोकरदारांनी सांगीतले की, आम्हांस आजारपणाकरीता तसेच आॅपरेशन करीता पैशांची अत्यंत गरज आहे. आमच्या खात्यामध्ये पैसे देखील आहेत़ परंतु बॅकेकडे पैसे नसल्याने व आठवडयाकरीता फक्त २४ हजार रुपये काढण्याची मुभा असली तरी तेवढेही पैसे बँक देत नसल्याने पैसे कसे उभे करायचे? अशी मोठी अडचण आहे़ सर्वाचीच ही परिस्थीती असल्याने कुणाकडे उसनवारी मागितली तर त्याचेजवळ देखील रोख रक्कम नसल्याने अडचणीमध्ये अजूनही भर पडत आहे़आदिवासी व दुर्गम भागात असलेल्या विक्रमगड या भागातील सामान्य माणूस आदिवासी, अशिक्षीत शेतकरी, शेतमजूर, अजूनही गोंधळला आहे़ कारण त्याच्याकडे जी काही तुटपूंजी रक्कम जमवली आहे़ ती त्यांनी बँकेत भरलेली आहे व ती रक्कम अडीअडचणींमध्ये उपयोगी यावी करीता त्याची आजही धडपड चालू त्यामुळे सर्वच बँकामध्ये आजही गर्दी आहे. सकाळपासून ते सायंकाळपर्यत गर्दी कायम आहे, त्यात आदिवासी स्त्री-पुरुषांची संख्या जास्त दिसते़ (वार्ताहर)