शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

वसईच्या केळीला आता शहापूरची टक्कर, लेनाडमध्ये प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 01:30 IST

शहापूर तालुका पाणीटंचाईचा म्हणून परिचित आहे. मात्र, आता त्याची ओळख केळ्यांची लागवड करणारा म्हणून नावारूपाला येणार आहे.

जनार्दन भेरे भातसानगर : शहापूर तालुका पाणीटंचाईचा म्हणून परिचित आहे. मात्र, आता त्याची ओळख केळ्यांची लागवड करणारा म्हणून नावारूपाला येणार आहे. ठिबक सिंचनाचा वापर करून केळीलागवडीचा प्रयोग यशस्वी झाला असून पैसा देणारे हे उत्पादन आहे.शहापूर तालुक्यातील लेनाड (बु) येथील कृषी तंत्र महाविद्यालयातील २५ एकर जागेत केळीची लागवड केली आहे. कृषी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष भगवान भोईर हे प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत. फुलशेती, ग्रीनहाउस, वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्याची पिके घेतली. ही शेती चांगल्या प्रकारे तालुक्यात रुजल्यानंतर याच विद्यालयात मागील वर्षी पपईची लागवड यशस्वी करून दाखवल्यानंतर केळीचे उत्पादन घ्यायचे भोईर यांनी ठरवले आणि हा प्रयोगही यशस्वी झाला. आपल्याकडे वसईची केळी अधिक प्रसिद्ध आहेत.केळीच्या लागवडीच्या प्रयोगाची जबाबदारी प्रभाकर भोईर, भैरव सोनावळे, प्राचार्य प्रकाश भांगरात, नरेंद्र वाघ, नितीन घुडे यांच्यासह १८० विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आली. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य त्यांनीच पुरविले आणि अपार मेहनत घेऊन तो प्रयोग यशस्वीही करून दाखवला. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून २५ एकर जागेत २३ हजार ६०० रोपांची लागवड म्हणजेच एकरी १२०० झाडांची लागवड केली. प्रत्येक झाडावर किमान ५०० रुपये उत्पन्न देणारे केळीचे ३० ते ३५ किलो वजनाचे घड तयार झाले असून खर्च वजा जाता एकरी सहा लाख रुपये पीक देईल, अशी अपेक्षा आहे. हे पीक २८ महिन्यांत घेता येत असून एकरी १० लाख रुपये इतके उत्पन्न देणारे ठरणारे आहे. केळ्यांची विक्र ी याच ठिकाणी केली जाणार असून जागेवरच व्यापारी येऊन ती घेऊन जाण्याची तजवीज केली जाणार आहे.ठिबक सिंचनाचा अवलंब केल्याने एकदा गर काढून ते झाड तोडून त्याला दुबार आलेल्या रोपांपासून असे तीन वेळा उत्पादन घेता येते. त्यामुळे ते शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरणार आहे. या पिकावर हवामानाचा कोणताच वाईट परिणाम होत नाही. ज्याज्या ठिकाणी पाणी आहे, त्यात्या ठिकाणी शेतकऱ्यांनी केळीचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन प्राचार्य भांगरत यांनी केले आहे.>कृषी तंत्र महाविद्यालयात केलेल्या शेतीतून अधिक फायदा होणार असून अशा प्रकारचे उत्पादन शेतकºयांनी घेतल्यास ते फायदेशीर ठरेल.- विलास झुंजारराव,कृषी अधिकारी