शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

वसईच्या केळीला आता शहापूरची टक्कर, लेनाडमध्ये प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 01:30 IST

शहापूर तालुका पाणीटंचाईचा म्हणून परिचित आहे. मात्र, आता त्याची ओळख केळ्यांची लागवड करणारा म्हणून नावारूपाला येणार आहे.

जनार्दन भेरे भातसानगर : शहापूर तालुका पाणीटंचाईचा म्हणून परिचित आहे. मात्र, आता त्याची ओळख केळ्यांची लागवड करणारा म्हणून नावारूपाला येणार आहे. ठिबक सिंचनाचा वापर करून केळीलागवडीचा प्रयोग यशस्वी झाला असून पैसा देणारे हे उत्पादन आहे.शहापूर तालुक्यातील लेनाड (बु) येथील कृषी तंत्र महाविद्यालयातील २५ एकर जागेत केळीची लागवड केली आहे. कृषी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष भगवान भोईर हे प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत. फुलशेती, ग्रीनहाउस, वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्याची पिके घेतली. ही शेती चांगल्या प्रकारे तालुक्यात रुजल्यानंतर याच विद्यालयात मागील वर्षी पपईची लागवड यशस्वी करून दाखवल्यानंतर केळीचे उत्पादन घ्यायचे भोईर यांनी ठरवले आणि हा प्रयोगही यशस्वी झाला. आपल्याकडे वसईची केळी अधिक प्रसिद्ध आहेत.केळीच्या लागवडीच्या प्रयोगाची जबाबदारी प्रभाकर भोईर, भैरव सोनावळे, प्राचार्य प्रकाश भांगरात, नरेंद्र वाघ, नितीन घुडे यांच्यासह १८० विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आली. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य त्यांनीच पुरविले आणि अपार मेहनत घेऊन तो प्रयोग यशस्वीही करून दाखवला. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून २५ एकर जागेत २३ हजार ६०० रोपांची लागवड म्हणजेच एकरी १२०० झाडांची लागवड केली. प्रत्येक झाडावर किमान ५०० रुपये उत्पन्न देणारे केळीचे ३० ते ३५ किलो वजनाचे घड तयार झाले असून खर्च वजा जाता एकरी सहा लाख रुपये पीक देईल, अशी अपेक्षा आहे. हे पीक २८ महिन्यांत घेता येत असून एकरी १० लाख रुपये इतके उत्पन्न देणारे ठरणारे आहे. केळ्यांची विक्र ी याच ठिकाणी केली जाणार असून जागेवरच व्यापारी येऊन ती घेऊन जाण्याची तजवीज केली जाणार आहे.ठिबक सिंचनाचा अवलंब केल्याने एकदा गर काढून ते झाड तोडून त्याला दुबार आलेल्या रोपांपासून असे तीन वेळा उत्पादन घेता येते. त्यामुळे ते शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरणार आहे. या पिकावर हवामानाचा कोणताच वाईट परिणाम होत नाही. ज्याज्या ठिकाणी पाणी आहे, त्यात्या ठिकाणी शेतकऱ्यांनी केळीचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन प्राचार्य भांगरत यांनी केले आहे.>कृषी तंत्र महाविद्यालयात केलेल्या शेतीतून अधिक फायदा होणार असून अशा प्रकारचे उत्पादन शेतकºयांनी घेतल्यास ते फायदेशीर ठरेल.- विलास झुंजारराव,कृषी अधिकारी