शहरं
Join us  
Trending Stories
1
हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
2
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
3
झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!
4
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...
5
बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
6
Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर
7
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
8
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
9
"म्हणून पुणेकर १ ते ४ झोपतात...", नेहा शितोळेने केला खुलासा, म्हणाली - "कारण ४नंतर ते..."
10
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
11
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
12
"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
13
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
14
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
15
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
16
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
17
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
18
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
19
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
20
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!

तारापूर येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 01:18 IST

शेकडो उद्योगांचे उत्पादन होणार ठप्प : दीड लाख कामगारांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न

पंकज राऊतलोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापूर एमआयडीसीतील २५ एमएलडी क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर (सीईटीपी) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुन्हा बंदची करवाई केली आहे. यामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रामधील शेकडो उद्योगांच्या उत्पादनावर आणि हजारो कामगारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.तारापूर येथील सीईटीपीतून नवापूरच्या समुद्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने नेमून दिलेल्या माप-दंडकानुसार प्रक्रिया होत नसल्याने तसेच सांडपाण्यातील केमिकल ऑक्सिजन डिमांड (सीओडी) मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक पटीने असल्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गोळा केलेल्या नमुन्यामध्ये आढळून आले. त्याचबरोबर अनेक त्रुटी निदर्शनास आल्यानंतर आणि अनेक वेळा सुधारण्याची संधी देऊनही फारसा फरक नसल्याने जुन्या सीईटीपीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये लघु, मध्यम व मोठे असे सर्व मिळून सुमारे साडेअकराशे उद्योग कार्यरत असून त्यापैकी प्रतिदिन २५ दशलक्ष लिटर (एमएलडी) सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या या जुन्या सीईटीपीमध्ये प्रक्रियेसाठी सांडपाणी पाठविणाऱ्या उद्योगांची संख्या ६०० च्या आसपास असून, एनजीटीने एमआयडीसीतील उद्योगांच्या पाणीपुरवठ्यात ४० टक्के पाणी कपात करण्यापूर्वी या सीईटीपीमध्ये औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांमधून मागील अनेक वर्षे सुमारे ४० ते ५० एमएलडी सांडपाणी येत होते. त्या अतिरिक्त येणाऱ्या सांडपाण्यावर अपेक्षित व पुरेशी प्रक्रिया न करताच ते सांडपाणी सरळ नवापूरच्या समुद्रात सोडले जात होते. त्यामुळे पर्यावरणाच्या झालेल्या हानीबरोबरच मच्छिमारांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर आणि मासेमारी व शेतीवर झालेल्या गंभीर परिणामामुळे अखिल भारतीय मांगेला परिषदेने राष्ट्रीय हरित लवादा (एनजीटी)कडे याचिका दाखल करून ते यशस्वीपणे लढा देत आहेत.

कारवाई का?माप-दंडकानुसार प्रक्रिया होत नसल्याने तसेच सांडपाण्यातील केमिकल ऑक्सिजन डिमांड (सीओडी) मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक पटीने असल्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गोळा केलेल्या नमुन्यामध्ये आढळून आले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

नोव्हेंबर अखेरपासून जुन्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राची सुधारणा करण्यासाठी केंद्र स्वयंस्फूर्तीने बंद करण्यात आले होते. या प्रक्रिया केंद्राला जोडलेल्या सर्व उद्योगांतील शौचालय व मानवी सेवन आणि वापरासाठी लागणारे पाणी सीईटीपीत येत होते. त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने आक्षेप नोंदवला आहे, तर नवीन २५ एमएलडी क्षमतेचा सीईटीपी कार्यरत असून, या ठिकाणी ११ एमएलडी सांडपाणी सध्या येत आहे. उर्वरित उद्योगांमधील व विशेषता जुन्या सीईटीपीला जोडलेल्या उद्योगांची सांडपाण्याची लाईन नवीन सीईटीपीला जोडणी करण्यास एमआयडीसी असमर्थ ठरल्याने येथील सुमारे दोनशे-अडीचशे उद्योगांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.- डी. के. राऊत, अध्यक्ष, तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन (टीमा) 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार