शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
4
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
5
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
6
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
7
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
8
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
9
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
10
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
11
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
13
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
14
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
15
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
16
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
17
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
18
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
19
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
20
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत

तारापूर येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 01:18 IST

शेकडो उद्योगांचे उत्पादन होणार ठप्प : दीड लाख कामगारांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न

पंकज राऊतलोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापूर एमआयडीसीतील २५ एमएलडी क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर (सीईटीपी) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुन्हा बंदची करवाई केली आहे. यामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रामधील शेकडो उद्योगांच्या उत्पादनावर आणि हजारो कामगारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.तारापूर येथील सीईटीपीतून नवापूरच्या समुद्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने नेमून दिलेल्या माप-दंडकानुसार प्रक्रिया होत नसल्याने तसेच सांडपाण्यातील केमिकल ऑक्सिजन डिमांड (सीओडी) मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक पटीने असल्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गोळा केलेल्या नमुन्यामध्ये आढळून आले. त्याचबरोबर अनेक त्रुटी निदर्शनास आल्यानंतर आणि अनेक वेळा सुधारण्याची संधी देऊनही फारसा फरक नसल्याने जुन्या सीईटीपीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये लघु, मध्यम व मोठे असे सर्व मिळून सुमारे साडेअकराशे उद्योग कार्यरत असून त्यापैकी प्रतिदिन २५ दशलक्ष लिटर (एमएलडी) सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या या जुन्या सीईटीपीमध्ये प्रक्रियेसाठी सांडपाणी पाठविणाऱ्या उद्योगांची संख्या ६०० च्या आसपास असून, एनजीटीने एमआयडीसीतील उद्योगांच्या पाणीपुरवठ्यात ४० टक्के पाणी कपात करण्यापूर्वी या सीईटीपीमध्ये औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांमधून मागील अनेक वर्षे सुमारे ४० ते ५० एमएलडी सांडपाणी येत होते. त्या अतिरिक्त येणाऱ्या सांडपाण्यावर अपेक्षित व पुरेशी प्रक्रिया न करताच ते सांडपाणी सरळ नवापूरच्या समुद्रात सोडले जात होते. त्यामुळे पर्यावरणाच्या झालेल्या हानीबरोबरच मच्छिमारांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर आणि मासेमारी व शेतीवर झालेल्या गंभीर परिणामामुळे अखिल भारतीय मांगेला परिषदेने राष्ट्रीय हरित लवादा (एनजीटी)कडे याचिका दाखल करून ते यशस्वीपणे लढा देत आहेत.

कारवाई का?माप-दंडकानुसार प्रक्रिया होत नसल्याने तसेच सांडपाण्यातील केमिकल ऑक्सिजन डिमांड (सीओडी) मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक पटीने असल्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गोळा केलेल्या नमुन्यामध्ये आढळून आले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

नोव्हेंबर अखेरपासून जुन्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राची सुधारणा करण्यासाठी केंद्र स्वयंस्फूर्तीने बंद करण्यात आले होते. या प्रक्रिया केंद्राला जोडलेल्या सर्व उद्योगांतील शौचालय व मानवी सेवन आणि वापरासाठी लागणारे पाणी सीईटीपीत येत होते. त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने आक्षेप नोंदवला आहे, तर नवीन २५ एमएलडी क्षमतेचा सीईटीपी कार्यरत असून, या ठिकाणी ११ एमएलडी सांडपाणी सध्या येत आहे. उर्वरित उद्योगांमधील व विशेषता जुन्या सीईटीपीला जोडलेल्या उद्योगांची सांडपाण्याची लाईन नवीन सीईटीपीला जोडणी करण्यास एमआयडीसी असमर्थ ठरल्याने येथील सुमारे दोनशे-अडीचशे उद्योगांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.- डी. के. राऊत, अध्यक्ष, तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन (टीमा) 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार