शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

भाजपच्या सात कार्यकर्त्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 04:37 IST

पोलिसांवर मारहाणीचा आरोप : उपाधिक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा

वसई : भाजपा युवा मोर्चा अध्यक्षांसह सात जणांना वालीव पोलिसांनी मंगळवारी अटक केली. तिच्या निषेधार्थ भाजपाने पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता. मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील तुंगारेश्वर येथे दोन गटात मारामारी सुरू होती. त्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सात जणांना वालीव पोलीस ठाण्यात आणले. ते भाजपाचे पदाधिकारी होते. त्यात युवा मोर्चाचा अध्यक्ष रणजीत ईश्वर दयाल सिंग याचा समावेश होता. मात्र आम्हाला पोलीस ठाण्यात का आणले? असा सवाल करत या सात जणांनी पोलिसांशी हुज्जत घातली आणि बाचाबाची केली. यामुळे पोलिसांनी या सातही जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली. या सर्वांना न्यायायलयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

या घटनेनेमुळे संतप्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा नेला. आमच्या सात कार्यकर्त्यांना वीस पोलिसांनी कोठडीत अमानुष मारहाण केली. समोरच्या गटातील लोकांवर कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. आता पुढे काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार