शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

सर आली धावून, सेंट्रिंग गेले वाहून; वाडा-भिवंडीला जोडणाऱ्या उचाट पुलाचा अर्धवट स्लॅब कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 01:12 IST

गेल्या एप्रिल महिन्यात पुलाच्या स्लॅबसाठी सेट्रींग ठोकण्यात आले होते.

वाडा : वाडा व भिवंडी तालुक्यांना जोडणारा उचाट येथील तानसा नदीवरील पुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू असून मुदत संपून एक वर्षाहून अधिक काळावधी उलटला असतनाही पुलाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिकांची गैरसोय सुरूच आहे. गेल्या एप्रिल महिन्यात पुलाच्या स्लॅबसाठी सेट्रींग ठोकण्यात आले होते. मात्र, उन्हाळ्यात स्लॅब न भरल्याने व शुक्रवारी झालेल्या पावसात नदीला पुर आल्याने सेट्रींग चे साहित्य वाहून गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.वाडा व भिवंडी तालुक्यांना जोडणारा उचाट येथील तानसा नदीवरील पुलाच्या कामाला ५ एप्रिल २०१६ मध्ये मंजूरी देण्यात आली. पुल अधिक ५०० मीटर रस्ता अशा दोन्ही कामांसाठी ४ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. पुलाच्या कामाचा ठेका नाशिक येथील आर. के. सावंत या ठेकेदाराला देण्यात आला आहे. उभारणीसाठी दोन वर्षाचा कालावधी देण्यात आला होता.ठेकेदाराने २०१६ मधील एप्रिल महिन्यात पुलाच्या कामाला सुरवात केली मात्र, नियोजित कालावधी होऊन वर्षाहून अधिक काळ उलटला तरी अद्यापही या पुलाचे ४० टक्के काम शिल्लक आहे. एप्रिल २०१९ साली पुलाचा स्लॅब टाकण्यासाठी सेट्रींगचे काम करण्यात आले होते. मात्र, स्लॅब न टाकल्याने शुक्रवारी झालेल्या पावसात नदीला पुर आल्याने सेट्रींग चे साहित्य वाहून गेले आहे. त्यातच पुलाजवळ तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरही मुरूम ऐवजी माती टाकल्याने संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. या कामात दिरंगाई करणाºया ठेकेदाराला प्रति दिन एक हजार रु पये प्रमाणे दंड आकारला जातो मात्र, दंड आकारूनही ठेकेदार याकामाकडे गांभीर्याने बघत नसल्याचे दिसून येत आहे.वाडा तालुक्यातील उचाट येथे पहिली ते बारावीपर्यंत शाळा असून या शाळेत भिवंडी तालुक्यातील म्हणजेच तानसा नदीपलीकडच्या २० ते २५ गावातील सुमारे ८०० विद्यार्थी उचाट येथे शिक्षणासाठी येत असतात. नियोजित पुलाच्या वरच्या बाजूला एक छोटा बंधारा असून या बंधाºयावरून पावसाळ्यात विद्यार्थी येत असतात. मात्र पुराच्या वेळेस या बंधाºयावरून पाणी जात असते. अशा वेळी त्यांचे शैक्षणकि नुकसान होते. तसेच, काही वर्षापूर्वी या बंधाºयाला संरक्षक कठडा नव्हता त्यामुळे येथे विद्यार्थी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या एक दोन घटनाही येथे घडल्या आहेत.संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाकडे आम्ही हेलपाटे मारून कंटाळलो मात्र, त्यांना पुलाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पुलाचे काम अतिशय कासवगतीने सुरू असल्याने ते पूर्ण होता होईना. आता आम्हाला आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही.- प्रभाकर मोरे,ज्येष्ठ ग्रामस्थ उचाटशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत पुलाचे काम पूर्ण करू न शकलेल्या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे.- प्रा.रमेश मोहिते, शिक्षक,उचाट शिक्षण संस्था उचाटपुलाच्या कामात दिरंगाई केल्याने संबंधित ठेकेदाराला प्रति दिन एक हजाराचा दंड आकारला जात आहे.- प्रकाश पातकर,शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, वाडा

टॅग्स :Vasai Virarवसई विरार