शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

सलग पाच वर्षे खाडा न करणारी ययाती देशात दुसरी

By admin | Updated: April 18, 2017 06:41 IST

पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील चिखले गावच्या ययाती शैलेन्द्र गावड या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने इयत्ता दुसरी ते सहावी पर्यंत सलग

अनिरुध्द पाटील, बोर्डीपालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील चिखले गावच्या ययाती शैलेन्द्र गावड या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने इयत्ता दुसरी ते सहावी पर्यंत सलग पाचही शालेय वर्षात शंभरटक्के उपस्थित राहण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे ती राष्ट्रीयस्तरावरील द्वितीय आणि राज्य स्तरावरील पहिली विद्यार्थिनी बनली आहे. तिचे पूर्व प्राथमिक शिक्षण डहाणू पारनाका येथील न्यू एज्युकेशन ट्रस्ट येथे झाले. सण २०१२-१३ या शैक्षणिक वर्षात ती दुसरी इयत्तेत शिकताना एकही दिवस अनुपिस्थत राहिली नाही. त्यानंतर तिसरी, चौथी इयत्तेत हजेरीपटावरील तिची उपस्थिती शंभर टक्के राहिली. या तिन वर्षाच्या काळात तिने दररोज सोळा किमीचा प्रवास खाजगी वाहनातून केला. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी बोर्डीतील सुनाबाई पेस्तनजी हकीमजी विद्यालयात प्रवेश घेतला. तेथेही ५ वी व ६ वी इयत्तेमध्ये वर्षभर उपस्थिती कायम राखली. गतवर्षी डहाणू तालुक्यात विक्र मी पावसाची नोंद झाली शिवाय काही दिवस पुरस्थिती होती. मात्र या वेळी वडिलांनी तिला दुचाकीवर शाळेत सोडल्याने हजर राहता आले. अभ्यासाप्रमाणेच संस्कृतिक कार्यक्र म, वक्तृत्व स्पर्धा आणि खेळात तरबेज आहे. पहाटे उठून व्यायाम, योग अभ्यास, गृहपाठ, अवांतर वाचन, टीव्ही पाहणे आणि भावंड व समवयीन मुलांशी खेळणे हा तिचा दिनक्रम आहे. जंकफूडला बगल देत घरी बनविलेले जेवण सर्वाधिक प्रिय असून तिच्या आरोग्याची गुरु किल्ली असल्याचे आई पौर्णिमा हिचे म्हणणे आहे. आई-वडील दोघांनीही बिपीएडपर्यंतचे शिक्षण घेतल्याने खेळाचा वारसा तिने जपला आहे. दरम्यान, इंटरनेटच्या माध्यमातून ‘हंड्रेड पर्सेंट अटेंडन्स इन स्कूल’ या साईटला भेट दिल्यानंतर आपल्या पाल्याने नकळत एका विक्र माची नोंद केल्याचे वडील शैलेन्द्र यांच्या लक्षात आले. भोपाळच्या मानसी दास या ९ वी इयत्तेतील विद्यार्थिनीने सलग नऊ वर्ष उपस्थित राहण्याचा विक्र म केला आहे. दास ही शहरी भागातील विद्यार्थिनी आहे. तर घर ते शाळा हा खडतर प्रवास करणारी ग्रामीण भागातल्या ययाती गावड ही राष्ट्रीय पातळीवरील दुसरी आणि राज्यस्तरावरील पहिली विद्यार्थिनी बनली आहे. या बाबत लवकरच कागदपत्रांची जमवाजमव करून इंडियन रेकॉर्डसाठी प्रस्ताव पाठविणार असल्याचे शैलेन्द्र गावड यांनी लोकमतला सांगितले.