पालघर : दरवर्षी /मकरसंक्र ांती सणाबाबत विशेषत: स्त्रियांना उत्सुकता लागून असते. तिळगूळ घ्या, गोड गोड बोला असा संदेश देणारा मकरसंक्र ांतीचा सण यावर्षी १५ जानेवारी २०१६ रोजी येत आहे.मकर संक्रांतीबाबत अनेक धर्मग्रंथात वेगवेगळा उल्लेख आढळतो. तसेच संक्र ांतीबाबत शुभ-अशुभ अशा चर्चाही होतात; परंतु अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो, असे पंचागांमध्ये सांगितले आहे. त्यामुळे केवळ आनंदाची देवाण-घेवाण व गोड संबंध जपण्यासाठीच हा सण साजरा केला जात आहे. सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाल्यावर हा मकर-संक्र ांत योग येतो. यावर्षी १५ जानेवारी रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे याच दिवशी संक्र ती आहे. परंपरेनुसार या दिवशी तिळमिश्रीत पाण्याने स्नान करणे, तिळाचे उटणे अंगास लावणे, तीळ होम, तीळ तर्पण, तीळभक्षण व तीळदान अशा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला जातो. यामुळे सर्व पापांचा क्षय होतो, असेही पंचागात सांगितले आहे. तसेच अजूनही ग्रामीण भागात संक्र ांत पाहणे सुरू आहे. संक्र ांत पाहणे म्हणजे पुरोहित किंवा धर्मशास्त्री यांच्याकडे जाऊन संक्र ांतीचा पुण्यकाल कोणता? संक्र ांत यावर्षी कशी आहे, तिचे वाहन कोणते, ती कुठून कोणत्या दिशेला जात आहे? कोणते कार्य करणे या काळात उचित आहे इत्यादी बाबी पाहतात. यावर्षी संक्र ांतीचा पुण्यकाल १५ जानेवारी रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे. तिचे वाहन वराह असून उपवाहन बैल आहे. हिरवे वस्त्र परिधान करून ती पश्चिमेकडून पूर्वेस जात आहे.२२ डिसेंबर रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, परंतु आपल्याकडील पंचांग हे निरयन पद्धतीवर आधारित असल्याने सूर्याने निरयन मकर राशीत प्रवेश केला की, आपण मकर संक्रांत साजरी करतो.यंदा गुरुवार १४ जानेवारी रोजी उत्तर रात्री १ वाजून २६ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे पुण्यकाळ १५ जानेवारीला आला आहे. सूर्याने एकदा निरयन मकर राशीत प्रवेश केला की, पुन्हा तो त्याच राशीत येईपर्यंत ३६५ दिवस, सहा तास, नऊ मिनिटे, दहा सेकंद एवढा कालावधी लागतो.
संक्र ांतीचा पर्वकाळ दिवसभर, वाहन वराह, उपवाहन वृषभ
By admin | Updated: January 13, 2016 00:37 IST