शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

सफाळे - पारगाव रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 23:24 IST

आगरी समाज उन्नती मंडळाची मागणी; पावसाळ्यानंतर सुरू होणार काम

पारोळ : मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे टोल नाका ते दारशेत गावाजवळून पारगाव, सफाळे भागात जाण्यासाठी महामार्गावरील सातिवली, दहिसरमार्गे फेरा मारावा लागतो. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरु झाल्या असून पावसाळ्यानंतर काम सुरु करण्यात येईल. हा रस्ता ३.७५ मीटर रुंदीचा असून एक पदरी असेल. यासाठी २.२५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून निविदा निघाली आहे.पारगाव पोलीस चौकीपर्यंतचा रस्ता झाला तर महामार्गावरून सफाळे, पालघरकडे जायचे जवळपास १५ कि.मी.चे अंतर वाचणार आहे. यामुळे साहजिकच वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. या रस्त्यादरम्यान असलेल्या दुर्गम आदिवासी भागातील गावे - पाडे वस्त्या इतर भागाशी पक्क्या रस्त्याने जोडली जाणार आहेत. या रस्त्याची मागणी १९७६ पासून होत होती. दारशेतच्या पुढे हा रस्ता कच्चा असून आजही हा प्रस्तावित रस्ता डांबरीकरणाच्या प्रतिक्षेतच आहे.आगरी समाज उन्नती मंडळाने प्रथम १९७६ मध्ये खानिवडे येथील समाजाच्या अधिवेशनात खानिवडे, उंबरपाडा, दारशेत, सोनावे ते पारगाव अशा रस्त्याची मागणी केली होती. मात्र या रस्त्यासाठी मार्गामधील काही गावांनी विरोध केल्याने रस्ता रखडला. या रस्त्यासाठी १५ वर्षांपासून उन्नती मंडळ राजकीय नेते, संबंधित मंत्री, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा करत आहेत. विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडल्या असून राज्य सरकार तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीवर नवे शासन स्थापन झाले आहे. आता हे नवे सरकार आमच्या मागणीचा विचार करेल, अशी आशा रहिवासी व्यक्त करत आहेत. आजही आमच्या गावात जाताना दर पावसाळ्यात तीन ते चार कि.मी. अंतर चिखलातून पार करावे लागत आहे. हा रस्ता झाला तर ही पायपीट संपून जाईल. त्यामुळे सरकारने हा रस्ता लवकर करावा, अशी विनंती येथील प्रवाशांनी केली आहे.हा रस्ता दारशेतच्या पुढून महामार्गकडे वनखात्याच्या जागेतून जात आहे. तिकडे वनखात्याने डांबरीकरण करण्यास मनाई केली आहे. याबाबतचे त्यांचे पत्र आम्हाला आले असून जोपर्यंत त्यांची ना हरकत मिळत नाही तोवर रस्त्याचे काम मार्गी लागू शकत नाही. मात्र सोनावे ते दारशेतपर्यंत रस्त्याचे काम होणार आहे.- महेंद्र किणी, उपअभियंता, बांधकाम विभाग, पालघर तालुकारस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, वनखात्याची काही अडचण निर्माण झाल्याने त्यांनी काम रोखले आहे. त्यांची मंजुरी मिळून लवकरच काम सुरु होईल असे समजले आहे.- नरसिंह पाटील, सचिव, आगरी समाज उन्नती मंडळ