शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

सफाळे - पारगाव रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 23:24 IST

आगरी समाज उन्नती मंडळाची मागणी; पावसाळ्यानंतर सुरू होणार काम

पारोळ : मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे टोल नाका ते दारशेत गावाजवळून पारगाव, सफाळे भागात जाण्यासाठी महामार्गावरील सातिवली, दहिसरमार्गे फेरा मारावा लागतो. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरु झाल्या असून पावसाळ्यानंतर काम सुरु करण्यात येईल. हा रस्ता ३.७५ मीटर रुंदीचा असून एक पदरी असेल. यासाठी २.२५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून निविदा निघाली आहे.पारगाव पोलीस चौकीपर्यंतचा रस्ता झाला तर महामार्गावरून सफाळे, पालघरकडे जायचे जवळपास १५ कि.मी.चे अंतर वाचणार आहे. यामुळे साहजिकच वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. या रस्त्यादरम्यान असलेल्या दुर्गम आदिवासी भागातील गावे - पाडे वस्त्या इतर भागाशी पक्क्या रस्त्याने जोडली जाणार आहेत. या रस्त्याची मागणी १९७६ पासून होत होती. दारशेतच्या पुढे हा रस्ता कच्चा असून आजही हा प्रस्तावित रस्ता डांबरीकरणाच्या प्रतिक्षेतच आहे.आगरी समाज उन्नती मंडळाने प्रथम १९७६ मध्ये खानिवडे येथील समाजाच्या अधिवेशनात खानिवडे, उंबरपाडा, दारशेत, सोनावे ते पारगाव अशा रस्त्याची मागणी केली होती. मात्र या रस्त्यासाठी मार्गामधील काही गावांनी विरोध केल्याने रस्ता रखडला. या रस्त्यासाठी १५ वर्षांपासून उन्नती मंडळ राजकीय नेते, संबंधित मंत्री, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा करत आहेत. विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडल्या असून राज्य सरकार तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीवर नवे शासन स्थापन झाले आहे. आता हे नवे सरकार आमच्या मागणीचा विचार करेल, अशी आशा रहिवासी व्यक्त करत आहेत. आजही आमच्या गावात जाताना दर पावसाळ्यात तीन ते चार कि.मी. अंतर चिखलातून पार करावे लागत आहे. हा रस्ता झाला तर ही पायपीट संपून जाईल. त्यामुळे सरकारने हा रस्ता लवकर करावा, अशी विनंती येथील प्रवाशांनी केली आहे.हा रस्ता दारशेतच्या पुढून महामार्गकडे वनखात्याच्या जागेतून जात आहे. तिकडे वनखात्याने डांबरीकरण करण्यास मनाई केली आहे. याबाबतचे त्यांचे पत्र आम्हाला आले असून जोपर्यंत त्यांची ना हरकत मिळत नाही तोवर रस्त्याचे काम मार्गी लागू शकत नाही. मात्र सोनावे ते दारशेतपर्यंत रस्त्याचे काम होणार आहे.- महेंद्र किणी, उपअभियंता, बांधकाम विभाग, पालघर तालुकारस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, वनखात्याची काही अडचण निर्माण झाल्याने त्यांनी काम रोखले आहे. त्यांची मंजुरी मिळून लवकरच काम सुरु होईल असे समजले आहे.- नरसिंह पाटील, सचिव, आगरी समाज उन्नती मंडळ