शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

आरटीआय कार्यकर्त्यांची चौकशी? पोलिसांचे स्वतंत्र पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 06:14 IST

वसई विरार महापालिकेत माहिती अधिकारात अर्ज टाकून बांधकाम व्यावसायिकांकडून मागवलेल्या माहितीनंतर खंडणी वसूली तर केली नाही ना याची चौकशी करण्यासाठी पालघर पोलिसांचे खास पथक तयार करण्यात आले आहे.

वसई  - वसई विरार महापालिकेत माहिती अधिकारात अर्ज टाकून बांधकाम व्यावसायिकांकडून मागवलेल्या माहितीनंतर खंडणी वसूली तर केली नाही ना याची चौकशी करण्यासाठी पालघर पोलिसांचे खास पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने महापालिकेकडून माहिती अधिकारात अर्ज केलेल्यांची माहिती मिळवली आहे.माहिती अधिकारात माहिती मागवून बिल्डरांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी शनिवारपासून वसई विरार परिसरातील पोलीस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरु केले आहे. खंडणी घेतल्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांनी माहिती अधिकाराचीच सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एक स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने महापालिकेच्या नगररचना विभागाकडे दाखल करण्यात आलेल्या अर्जांची माहिती मिळवली आहे. अर्जदाराने किती आणि कोणाविरोधात माहिती मागवली. तक्रार केल्यानंतर त्यावर काय कारवाई झाली याची माहिती पोलीस घेत आहेत. यात ज्यांच्याविरोधात अर्ज दाखल झालेत त्या संबंधित बिल्डरांकडून खंडणीची मागणी केली गेली काय. यांची चौकशी होणार आहे.मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून दाखवाच...मनसेचे पोलिसांना आव्हानआरटीआयखाली माहिती मागवलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून दाखवावेच, असे आव्हान मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी वसईत पत्रकार परिषदेत बोलताना पोलिसांना दिले. मनसेच्या एकाही कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला तर वरती राज ठाकरे बसलेले आहेत. ते काय आहेत हे इथल्या नेत्यांना माहितीच आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिका, पोलीस आणि संबंधित विभागाची आहे. अनधिकृत बांधकामे होण्यापूर्वीच ती रोखली पाहिजेत. पण, यात त्यांचेही हितसंबंध गुंतलेले आहेत. कारवाई का नाही केली. यासाठी अनधिकृत बांधकाम झालेल्या विभागातील महापालिका अधिकारी आणि पोलिसांचीही चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या मालमत्तेचेही चौकशी झाली पाहिजे अशी मनसेची प्रमुख मागणी आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :RTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताVasai Virarवसई विरार