शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

रेतीमाफियांच्या दगडफेकी पुढे महसूल प्रशासन हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 01:32 IST

वसई तालुक्यातील नारिंगी (ज्युली) ग्रामस्थांनी येथील रेती माफियांविरोधात न्यायालयीन लढाईमध्ये यश मिळवले

अजय महाडीकमुंबई : वसई तालुक्यातील नारिंगी (ज्युली) ग्रामस्थांनी येथील रेती माफियांविरोधात न्यायालयीन लढाईमध्ये यश मिळवले असले तरी प्रतिबंधात्मक कारवाई करतांना महसूल, पोलीस, मेरिटाईम आणि रेल्वे प्रशासनाकडून हात आखडता घेतला जात आहे. प्रत्यक्ष कारवाई सुरु असतांना माफियांंकडून होणारा धारदार कातळाच्या दगड गोट्यांचा मारा त्यांच्या उरात धडकी भरवत आहे. आतापर्यंत अनेक जण या कारवाईमध्ये जखमी झाल्याचे नारिंगी येथील ग्रामस्थ तसेच नायब तहसीलदार स्मिता गुरव यांनी स्पष्ट केले आहे.ज्युली खारभूमी विकास मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण पाटील यांनी बेटावरील भात शेतीच्या व कांदळवनाच्या रक्षणासाठी वर्ष २०१४ पासून प्रखर भूमिका घेऊन न्यायालयीन लढाई सुरु केली आहे. आज त्यांच्या पाठीशी गावातील १५२ कुटुंबे ठामपणे उभे आहेत. चार महिन्यांपूर्वी टेंबीखोडावे येथे महसूल विभागाच्या कारवाईच्या वेळी तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि पंधरा तलाठी यांच्या पथकाने कारवाई केली होती. यावेळी झालेल्या दगड गोट्यांच्या माऱ्यात हरेश म्हात्रे, किशोर पाटील, विजय पाटील व तलाठी बांगर जखमी झाले होते. या प्रकरणी केळवा सागरी पोलीस ठाण्यात ४५ जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वैतरणा, कसराळी, शिरगाव, खार्डी, डोलीव व टेंबी गोडावे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सक्शन पंपाद्वारे रेतीचे उत्खनन होते. एका सक्शन पंपाद्वारे दहा मिनिटात एक बोट रेती (सहा ब्रास) चे उत्खनन होते. असे शंभर ते दीडशे सक्शनपंप लावून रेती काढली जाते. विशेष म्हणजे नारिंगे वगळता कोणत्याही रेती बंदरातील बोटींना रेती उत्खननासाठी बंदर विभागाची परवानगी नाही. दरम्यान, पोलीस सरक्षण असतांना सुद्धा हे हल्ले होत असल्याने खारभूमीच्या रक्षणासाठी उभे ठाकलेले गावकरी भयभीत झाले आहेत.उत्खननाला विरोध करणाºया गावकºयांना माफियांकडून धमक्यागावकºयांना माफियांकडून धमक्या दिल्या जात आहेत. रात्री अपरात्री दगडांचा मारा होतो. तरीही या माफियांच्या विरोधात नांिरंगीचे गावकरी कंबर कसून उभे आहेत. पोलीस तक्रार घेत नाहीत, उलट सुलट प्रश्न विचारुन कायद्याचे ज्ञान नसणाºया गावकºयांच्या अंगावर ओरडतात. महसूल विभागाकडून दोन चार महिन्याने थातूर-मातूर कारवाई केली जाते आणि पुन्हा सक्शन पंप सुरु होतात. तक्रारींच्या रेट्यामुळे ७ जून २०१८ रोजी नायब तहसीलदार दिपक गायकवाड, सर्कल आॅफिसर सोनावणे, नारिंगे तलाठी अक्षदा गायकर, मेरिटाईम विभागाचे बंदर निरिक्षक सुशिल पाटणकर व खार भूमी विभागाच्या गीता गायकवाड यांनी पहाणी केली असून त्या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांना सुपुर्द केला असल्याचे पाटणकर यांनी सांगितले.२०१२ मध्ये वैतरणा रेल्वे पुलाला धोका निर्माण झाला असल्याचे लक्षात आल्यावर २० ते २२ दिवस रेल्वे गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली होती. उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही या पुला खाली उत्खनन सुरु असल्याची तक्रार जुली खारभूमी लाभार्थी सहकारी संस्था, नारिंगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यापूर्वी तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित बांगर यांनी शिरगाव, कसराळी, वैतरणा पूर्व व पश्चिम, खार्डी, तानसा, व टेबी खोडावे या लॅडिंग पॉर्इंटवर वारंवार कारवाई करुन रेती माफियांचे कंबरडे मोडले होते.