शहरं
Join us  
Trending Stories
1
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
2
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
3
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
4
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
5
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
8
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
9
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
10
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
11
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
12
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
13
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
14
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
15
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
16
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
17
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
18
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
19
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
20
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

राजीवलीतील कारवाईला पुन्हा ब्रेक, पोलीस संरक्षण न मिळाल्याने कारवाई स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 06:20 IST

राजीवली येथील वनखात्याच्या जागेवर झालेल्या चाळी उध्वस्त करण्यासाठी मंगळवारपासून धडक मोहिम हाती घेण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी सागरी सुरक्षा अभियानाचे कारण देत पोलीस संरक्षण नाकारल्याने कारवाई स्थगित करावी लागली आहे.

वसई - राजीवली येथील वनखात्याच्या जागेवर झालेल्या चाळी उध्वस्त करण्यासाठी मंगळवारपासून धडक मोहिम हाती घेण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी सागरी सुरक्षा अभियानाचे कारण देत पोलीस संरक्षण नाकारल्याने कारवाई स्थगित करावी लागली आहे.त्यामुळे मनसेने आता गुरुवारी अपर पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचे जाहिर केले आहे. तर वनखात्याने १६ एप्रिल ही तारीख निश्चित केली आहे.वसई पूर्वेकडील राजीवली परिसरात सरकारी, वन, आदिवासींच्या जागेवर अतिक्रमण करून पाच हजारांहून अधिक चाळी बांधल्या आहेत. त्या उध्वस्त करून चाळमाफियांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मनसेने अठरा दिवस धरणे आंदोलन केले होते. एकदा तर तहसिलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन महसूल, वन, पोलीस आणि महापालिका अधिकाºयांची बैठक बोलावून कारवाईचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मंगळवारपासून सलग तीन दिवस तोडक कारवाई करण्याचा निर्णय वनखात्याने घेतला होता. त्यासाठी वनखात्याने येथील लोकांना नोटीसाही बजावल्या होत्या. तर महापालिकेने मनुष्यबळ व यंत्रसामुग्री देण्याची तयारी केली होती. पोलिसांनीही संरक्षण देण्याचे मान्य केले होते.वालीव पोलिसांनी बुधवार आणि गुरुवार जिल्ह्यात सागरी सुरक्षा अभियान असल्याचे कारण पुढे करीत सोमवारी रात्री पोलीस संरक्षण देण्यास असमर्थता व्यक्त केली होती. त्यामुळे प्रत्यक्षात मंगळवारी आणि बुधवारी कारवाई झालीच नाही. याआधी दोन वेळा कारवाईची तारीख ठरली होती. पण, त्यावेळी पोलिसांनी आयत्यावेळी संरक्षण नाकारल्याने कारवाई स्थगित करावी लागली होती. त्यामुळे मनसेचे पदाधिकारी संतापले आहेत. पोलिसांमुळेच कारवाई होत नसल्याचा आरोप करीत मनसेने आता गुरुवारी वसई अपर पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचे जाहिर केले आहे.दरम्यान, सागरी सुरक्षा अभियानामुळे संरक्षण देता येत नसले तरी कारवाईची पुढची तारीख निश्चित झाल्यावर संरक्षण दिले जाईल, असे वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी म्हटले आहे. तर वनखात्याने १६ एप्रिल ही तारीख ठरवली आहे.त्या भूमाफियांचे काय? तत्कालीन अधिकाºयांना जाब विचाराराजीवली येथील वाढलेली झोपडपट्टी गत पाच वर्षामध्ये वाढली आहे. त्यामुळे त्या विरोधामध्ये कारवाई का झाली नाही हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. त्याला कुणाचा पाठींबा होता असा सवाल होत आहे.चाळींचे बांधकाम राखीव वनात केल्याने गत पाच वर्षांपासून राहणाºया रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. चाळ माफियांनी मांडवी वनक्षेत्रामध्ये बांधकाम करुन तब्बल पाचशे कुटुंबियांना फसवले.यामध्ये वाघ्राळपाडा, मौजे राजीवली, वसई पूर्व, राखीव वन सर्वे क्र मांक १३१ या वन जमिनीवरील जागी असलेल्या कुुटुंबाना पुरावे सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली होती.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या