शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

राजीवलीतील कारवाईला पुन्हा ब्रेक, पोलीस संरक्षण न मिळाल्याने कारवाई स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 06:20 IST

राजीवली येथील वनखात्याच्या जागेवर झालेल्या चाळी उध्वस्त करण्यासाठी मंगळवारपासून धडक मोहिम हाती घेण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी सागरी सुरक्षा अभियानाचे कारण देत पोलीस संरक्षण नाकारल्याने कारवाई स्थगित करावी लागली आहे.

वसई - राजीवली येथील वनखात्याच्या जागेवर झालेल्या चाळी उध्वस्त करण्यासाठी मंगळवारपासून धडक मोहिम हाती घेण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी सागरी सुरक्षा अभियानाचे कारण देत पोलीस संरक्षण नाकारल्याने कारवाई स्थगित करावी लागली आहे.त्यामुळे मनसेने आता गुरुवारी अपर पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचे जाहिर केले आहे. तर वनखात्याने १६ एप्रिल ही तारीख निश्चित केली आहे.वसई पूर्वेकडील राजीवली परिसरात सरकारी, वन, आदिवासींच्या जागेवर अतिक्रमण करून पाच हजारांहून अधिक चाळी बांधल्या आहेत. त्या उध्वस्त करून चाळमाफियांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मनसेने अठरा दिवस धरणे आंदोलन केले होते. एकदा तर तहसिलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन महसूल, वन, पोलीस आणि महापालिका अधिकाºयांची बैठक बोलावून कारवाईचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मंगळवारपासून सलग तीन दिवस तोडक कारवाई करण्याचा निर्णय वनखात्याने घेतला होता. त्यासाठी वनखात्याने येथील लोकांना नोटीसाही बजावल्या होत्या. तर महापालिकेने मनुष्यबळ व यंत्रसामुग्री देण्याची तयारी केली होती. पोलिसांनीही संरक्षण देण्याचे मान्य केले होते.वालीव पोलिसांनी बुधवार आणि गुरुवार जिल्ह्यात सागरी सुरक्षा अभियान असल्याचे कारण पुढे करीत सोमवारी रात्री पोलीस संरक्षण देण्यास असमर्थता व्यक्त केली होती. त्यामुळे प्रत्यक्षात मंगळवारी आणि बुधवारी कारवाई झालीच नाही. याआधी दोन वेळा कारवाईची तारीख ठरली होती. पण, त्यावेळी पोलिसांनी आयत्यावेळी संरक्षण नाकारल्याने कारवाई स्थगित करावी लागली होती. त्यामुळे मनसेचे पदाधिकारी संतापले आहेत. पोलिसांमुळेच कारवाई होत नसल्याचा आरोप करीत मनसेने आता गुरुवारी वसई अपर पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचे जाहिर केले आहे.दरम्यान, सागरी सुरक्षा अभियानामुळे संरक्षण देता येत नसले तरी कारवाईची पुढची तारीख निश्चित झाल्यावर संरक्षण दिले जाईल, असे वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी म्हटले आहे. तर वनखात्याने १६ एप्रिल ही तारीख ठरवली आहे.त्या भूमाफियांचे काय? तत्कालीन अधिकाºयांना जाब विचाराराजीवली येथील वाढलेली झोपडपट्टी गत पाच वर्षामध्ये वाढली आहे. त्यामुळे त्या विरोधामध्ये कारवाई का झाली नाही हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. त्याला कुणाचा पाठींबा होता असा सवाल होत आहे.चाळींचे बांधकाम राखीव वनात केल्याने गत पाच वर्षांपासून राहणाºया रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. चाळ माफियांनी मांडवी वनक्षेत्रामध्ये बांधकाम करुन तब्बल पाचशे कुटुंबियांना फसवले.यामध्ये वाघ्राळपाडा, मौजे राजीवली, वसई पूर्व, राखीव वन सर्वे क्र मांक १३१ या वन जमिनीवरील जागी असलेल्या कुुटुंबाना पुरावे सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली होती.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या