शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

भाव नसल्याने शेतातच टोमॅटोचा लाल चिखल; दलाल तुपाशी शेतकरी उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 02:55 IST

चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी झाले हवालदिल 

पारोळ : वसई पूर्वेकडील ग्रामीण भागातील थळ्याचा पाडा, आडणे, भाताणे, कळभोण, शिरवली येथे टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते, मात्र या वर्षी दर कमी असल्याने शेतकरी टोमॅटो फेकून देत आहेत, मात्र शहरातील बाजारात ४० रुपये किलो टोमॅटो विकला जात आहे. ‘दलाल तुपाशी शेतकरी उपाशी’ अशीच परिस्थिती पाहायला मिळते. दरम्यान, परिसरातील काही शेतकऱ्यांनी भाव मिळत नसल्याने शेतातच फेकून दिलेल्या टोमॅटोचा लाल चिखल झाला आहे. 

देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले असतानाच शेतकऱ्यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालघर तालुक्यातील थल्याचा पाडा येथील शेतकऱ्याचा एकरातील टोमॅटोचा नुसता रेंधा झाला आहे. शेतकऱ्याने खिशात दोन पैसे शिल्लक राहतील म्हणून आपल्या एकरात टोमॅटोची लागवड केली होती, मात्र कोरोनाच्या काळात विक्रीअभावी सर्व माल जाग्यावरच सडून गेला. त्यामुळे शेतकऱ्याचे एक-दोन नव्हे तर तब्बल ५ लाखांचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे.

या झालेल्या नुकसानभरपाईची मागणी आता शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांची एकी नसल्याने त्याचा फायदा व्यापारी घेत असून उत्तम दर्जाच्या टोमॅटोला ३० किलोला २०० रुपये भाव देत असून, कमी दर्जाच्या मालाला अवघा १०० रुपये ३० किलोचा दर मिळत आहे. तर बाजारात २५ ते २० रुपये किलो असा दर आहे. मात्र शेतकऱ्यांना फक्त पाच ते सहा रुपये दर मिळत आहे. ‘पिकेल तेथे विकेल’ ही शासनाची योजना आहे, मात्र या ठिकाणी ही योजना केवळ कागदावरच असून व्यापारी एकी करून आपल्या मर्जीनुसारच भाव करीत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने या भागातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

खाऱ्या पाण्यामुळे आणि हवामानात बदल झाल्याने टोमॅटो आणि पालेभाज्या यांना कीड लागत असून यामुळे अन्य पालेभाज्यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच बाजारभाव करणारे मध्यस्थी आम्हाला योग्य तो भाव मिळवून देत नसल्याने आमचे मोठे नुकसान होत आहे.- सुगंधा जाधव,  महिला शेतकरी, थल्याचा पाडा