शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

भाव नसल्याने शेतातच टोमॅटोचा लाल चिखल; दलाल तुपाशी शेतकरी उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 02:55 IST

चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी झाले हवालदिल 

पारोळ : वसई पूर्वेकडील ग्रामीण भागातील थळ्याचा पाडा, आडणे, भाताणे, कळभोण, शिरवली येथे टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते, मात्र या वर्षी दर कमी असल्याने शेतकरी टोमॅटो फेकून देत आहेत, मात्र शहरातील बाजारात ४० रुपये किलो टोमॅटो विकला जात आहे. ‘दलाल तुपाशी शेतकरी उपाशी’ अशीच परिस्थिती पाहायला मिळते. दरम्यान, परिसरातील काही शेतकऱ्यांनी भाव मिळत नसल्याने शेतातच फेकून दिलेल्या टोमॅटोचा लाल चिखल झाला आहे. 

देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले असतानाच शेतकऱ्यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालघर तालुक्यातील थल्याचा पाडा येथील शेतकऱ्याचा एकरातील टोमॅटोचा नुसता रेंधा झाला आहे. शेतकऱ्याने खिशात दोन पैसे शिल्लक राहतील म्हणून आपल्या एकरात टोमॅटोची लागवड केली होती, मात्र कोरोनाच्या काळात विक्रीअभावी सर्व माल जाग्यावरच सडून गेला. त्यामुळे शेतकऱ्याचे एक-दोन नव्हे तर तब्बल ५ लाखांचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे.

या झालेल्या नुकसानभरपाईची मागणी आता शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांची एकी नसल्याने त्याचा फायदा व्यापारी घेत असून उत्तम दर्जाच्या टोमॅटोला ३० किलोला २०० रुपये भाव देत असून, कमी दर्जाच्या मालाला अवघा १०० रुपये ३० किलोचा दर मिळत आहे. तर बाजारात २५ ते २० रुपये किलो असा दर आहे. मात्र शेतकऱ्यांना फक्त पाच ते सहा रुपये दर मिळत आहे. ‘पिकेल तेथे विकेल’ ही शासनाची योजना आहे, मात्र या ठिकाणी ही योजना केवळ कागदावरच असून व्यापारी एकी करून आपल्या मर्जीनुसारच भाव करीत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने या भागातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

खाऱ्या पाण्यामुळे आणि हवामानात बदल झाल्याने टोमॅटो आणि पालेभाज्या यांना कीड लागत असून यामुळे अन्य पालेभाज्यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच बाजारभाव करणारे मध्यस्थी आम्हाला योग्य तो भाव मिळवून देत नसल्याने आमचे मोठे नुकसान होत आहे.- सुगंधा जाधव,  महिला शेतकरी, थल्याचा पाडा