शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

भाव नसल्याने शेतातच टोमॅटोचा लाल चिखल; दलाल तुपाशी शेतकरी उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 02:55 IST

चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी झाले हवालदिल 

पारोळ : वसई पूर्वेकडील ग्रामीण भागातील थळ्याचा पाडा, आडणे, भाताणे, कळभोण, शिरवली येथे टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते, मात्र या वर्षी दर कमी असल्याने शेतकरी टोमॅटो फेकून देत आहेत, मात्र शहरातील बाजारात ४० रुपये किलो टोमॅटो विकला जात आहे. ‘दलाल तुपाशी शेतकरी उपाशी’ अशीच परिस्थिती पाहायला मिळते. दरम्यान, परिसरातील काही शेतकऱ्यांनी भाव मिळत नसल्याने शेतातच फेकून दिलेल्या टोमॅटोचा लाल चिखल झाला आहे. 

देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले असतानाच शेतकऱ्यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालघर तालुक्यातील थल्याचा पाडा येथील शेतकऱ्याचा एकरातील टोमॅटोचा नुसता रेंधा झाला आहे. शेतकऱ्याने खिशात दोन पैसे शिल्लक राहतील म्हणून आपल्या एकरात टोमॅटोची लागवड केली होती, मात्र कोरोनाच्या काळात विक्रीअभावी सर्व माल जाग्यावरच सडून गेला. त्यामुळे शेतकऱ्याचे एक-दोन नव्हे तर तब्बल ५ लाखांचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे.

या झालेल्या नुकसानभरपाईची मागणी आता शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांची एकी नसल्याने त्याचा फायदा व्यापारी घेत असून उत्तम दर्जाच्या टोमॅटोला ३० किलोला २०० रुपये भाव देत असून, कमी दर्जाच्या मालाला अवघा १०० रुपये ३० किलोचा दर मिळत आहे. तर बाजारात २५ ते २० रुपये किलो असा दर आहे. मात्र शेतकऱ्यांना फक्त पाच ते सहा रुपये दर मिळत आहे. ‘पिकेल तेथे विकेल’ ही शासनाची योजना आहे, मात्र या ठिकाणी ही योजना केवळ कागदावरच असून व्यापारी एकी करून आपल्या मर्जीनुसारच भाव करीत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने या भागातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

खाऱ्या पाण्यामुळे आणि हवामानात बदल झाल्याने टोमॅटो आणि पालेभाज्या यांना कीड लागत असून यामुळे अन्य पालेभाज्यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच बाजारभाव करणारे मध्यस्थी आम्हाला योग्य तो भाव मिळवून देत नसल्याने आमचे मोठे नुकसान होत आहे.- सुगंधा जाधव,  महिला शेतकरी, थल्याचा पाडा