शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

ढगाळ वातावरणामुळे यंदा रब्बी हंगाम अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 23:03 IST

जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त; भाजीपाला पिकाला बसणार फटका

- राहुल वाडेकर विक्रमगड : निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाचा लांंबलेला पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे आधीच मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे खरीप हंगाम हातचा गेला. मात्र आता त्याचे पडसाद रब्बी हंगामावरही पडताना दिसत आहेत. गेल्या सहा-सात दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी-अधिक होत असतानाच, वारंंवार होत असलेले ढगाळ वातावरण आणि मध्ये मध्ये रिमझिम पावसाचा शिडकावा यामुळे वातावरणात होत असलेले बदल यामुळे आता रब्बी हंगामही अडचणीत सापडला आहे.वातावरण स्वच्छ नसल्याने याचा परिणाम पिकांवर होऊन लागवड केलेले उडिदाचे पीक, तुरीचे पीक हातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे, तर तीळ व वालाची वाढ खुंटणार आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. विक्रमगड तालुक्यात व परिसरात रब्बी पिकांचे मोठे क्षेत्र होऊ लागले आहे. या हंगामात शेतकरी मुग, हरभरा, वाल, उडीद, तुर या कडधान्यांबरोबरच काकडी, चवळी, वांगी, मिरची, गवार, टॉमेटो, भोपळा, मेथी, मुळा, पालक आदी भाजीपाला पिके घेतात. रंब्बी हंगामात बहुतेकदा खरीप हंगामातील आर्थिक तूट भरून काढली जाते. या वर्षी पावसाची उत्तम सुरुवात झाली, मात्र प्रमाणापेक्षा जास्त पाउस झाल्याने काही भागात भात पीक वाहून गेले, तर काही भागांत भात कुजण्याचे प्रकार घडले. तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी भात शेतीची लवकर कापणी उरकून भाजीपाल्याची लागवड केली. जमिनीला पुरेसा ओलावा असल्याने शेतकºयांनी भाजीपाल्याची लागवड केली. मूग, हरभरा, तुर फुलोरा येऊन शेंगा व हरभºयाला घाट्या लागल्या आहेत. मात्र गेले काही दिवस जास्त थंडी तर काही दिवस ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामातील फळ पिकांची वाढ खुंटल्याने याचा परिणाम तीळ, उडीद व वालाच्या रोपांच्या वाढीवर होत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच लाखो रुपये खर्च करून शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात झेंडू लागवड केली आहे. असे असताना ढगाळ वातावरण व रिमझिम पावसाचा परिणाम झेंडूच्या रोपांच्या वाढीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.वारंवार वातावणामध्ये बदल होत असून कधी कमी-अधिक थंडी तर कधी ढगाळ वातावरण याचा परिणाम पिकांवर होताना दिसत आहे. थंडीचे कमी-अधिक प्रमाण होत असल्याने कडधान्यांच्या रोपांची वाढ खुंटली आहे.-पंढरीनाथ सांबरे, शेतकरीवारंवार बदलत्या वातावरणामुळे रब्बी हंगामातील तीळ, उडीद, तुर, हरभरा पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे.- ज्ञानेश्वर जाधव, शेतकरी, विक्रमगड