शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

पंम्पिंग स्टेशनमध्ये गाळ, पाणीपुरवठ्यात अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 03:56 IST

सूर्या धरणाच्या योजनेतून वसई-विरारला 100 एमएलडी पाणीपुरवठा होतो.

वसई: शहर महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या पाणी योजनेच्या मासवण येथील मुख्य पंम्पिंग स्टेशनमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ अडकत असल्याने पाणी सोडण्यात मोठी अडचण येत आहे. मात्र तरीही शहराचा पाणीपुरवठा खंडित होणार नाही, असे महापालिकेचे शहर अभियंता माधव जवादे यांनी लोकमत शी बोलताना स्पष्ट केले आहे.सूर्या धरणाच्या योजनेतून वसई-विरारला 100 एमएलडी पाणीपुरवठा होतो. शहराची ही मुख्य पाणीपुरवठा योजना आहे. या योजनेचे मुख्य पंम्पिंग स्टेशन मासवण येथे असून या ठिकाणी नदीपात्रातून 3 पंपांव्दारे पाणी उचलले जाते व हे पाणी धुकटण येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाठवले जाते. या केंद्रातून पाणी शुद्ध होऊन शहरात वितरीत होते.दरम्यान दरवर्षी पावसाळा सुरू झाला की पाणी वितरण करण्यास मोठी अडचण निर्माण होते,धरण भागात मागील तीन दिवसापासून जोरदार पाऊस पडतो आहे. त्यामुळे जुन्या व नवीन योजनेच्या पंप चा फ्लो खूपच कमी झाला आहे.परिणामी मासवण येथील मुख्य पंप व धुकटंन फिल्टर प्लांट मधील जुन्या योजनेचे 3 पैकी 2 आणि नव्या योजनेचे 4 पैकी 1 पंप आता सध्या सुरू आहे.मासवण येथील जॅकवेल मध्ये मोठया प्रमाणात गाळ जमा असल्याने तो युद्धपातळीवर बाहेर काढण्यात येत आहे.मात्र तरीही प्रवाहात सतत गाळ,प्लास्टिक, केर कचरा, झाडे व त्याच्या फांद्या वाहत येत असल्याने फिल्टर वारंवार चोकअप होत आहेत.तरीही पालिकेची तांत्रिक कर्मचारी व पथक हे काम अहोरात्र करीत आहेत. त्यामुळे सूर्या धरणातून होणारा पाणीपुरवठा अनियमति व कमी दाबाने होत आहे,तरी नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सूर्या योजनेची जलवाहिनी दुरु स्ती किंवा इतर कारणांमुळे आधीच नागरिकांना अपुरा पाणी पुरवठा होत आहे. आता धो-धो पावसातही घरातील नळाला पुरेसे पाणी नसेल तर नागरिकांनी काय करायचे, असा ही प्रश्न नागरिक महापालिकेला विचारीत आहेत.अतिवृष्टी झाल्यानंतर पिम्पंग स्टेशनमध्ये गाळ, कचरा, प्लास्टिक अडकण्याची समस्या दरवर्षीची आहे. कचरा अडकल्याने पाणी उचलण्याची पंपांची क्षमता कमी होते. त्यामुळे आपोआप शहरात पाणी कमी येते. पालिकेचा पाणीपुरवठा विभाग पूर्णपणे अशा अडचणींना तोंड देण्यासाठी प्रयत्न करीत आहे,- माधव जवादे, शहर अभियंता, वसई विरार शहर महापालिका

टॅग्स :Vasai Virarवसई विरार