शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

विक्रमगडला होतो आहे मातीमिश्रित पाण्याचा पुरवठा

By admin | Updated: July 16, 2017 02:13 IST

पावसाळा सुरु होतांच या ही वर्षी या शहरातील रहिवाशांना गढुळ व माती मिश्रीत पाण्याचा पुरवठा सुरु झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ अव्वाच्या

- राहुल वाडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : पावसाळा सुरु होतांच या ही वर्षी या शहरातील रहिवाशांना गढुळ व माती मिश्रीत पाण्याचा पुरवठा सुरु झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ अव्वाच्या सव्वा पाणीपट्टीची वसूली झाल्यानंतरही परिस्थिती बदललेली नाही. प्रशासनाकडून लाखो रुपये खर्च करुन उभारण्यात आलेली फिल्टर योजना अपुरी पडत असल्याने अभ्यास न करता पैशाची उधळपट्टी केल्याचा आरोप होत आहे. फिल्टर योजनद्वारे फक्त उन्हाळयातच स्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असतो. पावसाळा सुरु होताच नळाद्वारे येणारे पाणी गढूळ व मातीमिश्रीत असल्याने ते तोंडात घेण्यासही भीती वाटते असल्याने अनेकांनी घरोघरी फिल्टर लावले आहेत. मात्र, शहरातील मध्यमवर्गीय व गरीब नागरीकांनी काय उपाय करावा असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, अशीच परिस्थितीत तालुक्यातील खेडया -पाडयात पाणी पुरवठा योजना नसल्याने तेथील रहिवासी खड्ड्यातील गढूळ व मातीमिश्रीत पाणी पित आहेत. नुकतेच ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्याने त्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरेंच्या प्रयत्नाने नवीन योजना मंजूर झाली असून ती साकारल्यावर यापासून विक्रमगडवासियांची सुटका होईल, अशी अशा येथील रहीवाशांना आहे़ त्यामुळे प्रशासनाने याबाबत ठोस पावले उचलणे आवश्यक आहे़ ही ग्रामपंचायत नगरपंचायत झाल्याने कारभारदेखील वाढलेला आहे़ लोकसंख्येमध्ये भर पडल्याने आता नवीन सुधारीत मोठया स्वरुपाच्या फिल्टर पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळावी व तिची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी होत आहे़.पाणी पुरवठाविभागाशी संपर्क साधला असता, विक्रमगडच्या नागरिकरणामध्ये झपाटयाने वाढ झाली असून सध्याच्या पाणी पुरवठयामध्ये प्रतिदीन साडेचार लाख लीटर पाण्याची आवश्यकता आहे़ मात्र, फिल्टर प्लँटची मर्यादा फक्त दिड लाख लीटरची असल्याने दिवसातून चारवेळा सोडण्यात येणारे पाणी पावसाळयात गढूळ व माती मिश्रीत होते़ त्यामुळे साडेचार लाख लिटर पाणी फिल्टर करण्याची क्षमता असलेला प्लँट हवा. तरच या समस्येवर उपाय करता येणार आहे़ आम्ही सध्या तुरटीचा वापर पाण्यामध्ये करीत आहोत़ असे नगरपंचायत पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे ही समस्या प्रत्यक्षात दूर होणार तरी कधी हा जनतेचा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. पाण्याची रोजची गरज साडे चार लाख लीटर आहेत तर फिल्टरची श्रमता दीड लाख लीटरची आहे. दरवर्षीचा हा प्रश्न असून आम्ही पाण्यामध्ये तुरटीचा वापर करुन ते निर्जंतूक करीत आहोत. - रविंद्र खुताडे, नगराध्यक्ष, विक्रमगड न.पं. मुख्याधिकारी नसल्याने नगरपंचायत नावालाच आहे. पाण्याचा प्रश्न दरवर्षीचा असल्याने आम्ही येत्या मंगळवार पासून उपोषणाला बसणार आहोत. - महेश पाटील, नरगसेवक, विक्रमगड न.पं.विक्रमगड नगरपंचायतीचा वाढता विस्तार पाहाता पालकमंत्र्यानीं सुधारीत पाच ते दहा लाख लीटर पाणी फिल्टर योजनेस मंजुरी देऊन हा प्रश्न कायमचा मिटवावा. तसेच तत्काळ मुख्याधिकारी नेमणूक करावी अशी लेखी मागणी वारंवार करीत आहोत़ त्याची अंमलबजावणी होणे देखील तेवढेच गरजेचे आहे़.-निलेश सांबरे, सामाजिक कार्यकर्ते