शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

राज्य निवडणूक आयोग प्रतिज्ञापत्र सादर करीत नाही तोपर्यंत वसई विरार महापालिकेची निवडणुक प्रकिया राबविण्यास स्थगिती" - मुंबई उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 15:43 IST

Vasai Virar Election: समीर वर्तक यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

- आशिष राणे

वसई : राज्य निवडणूक आयोग जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करीत नाही तोपर्यंत वसई विरार शहर महापालिकेची संभाव्य सार्वत्रिक निवडणुकीची एकूणच  प्रकिया राबविण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दुपारी झालेल्या सुनावणी वेळीं या प्रक्रियेला स्थगिती आदेश दिल्याची माहिती देत पुढील सुनावणी दि.29 ऑक्टोबर म्हणजे च येत्या गुरुवारी होणार असल्याचे ही याचिकाकर्ते समीर वर्तक यांनी लोकमतला दिली.

अर्थातच एन कोविड काळात निवडणूक आयोगाच्या विरोधात जाऊन याचिकाकर्ते समीर वर्तक यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी  मुंबई उच्च न्यायालयाने तीन सुनावण्या अंती हा ऐतिहासिक निर्णय दिल्याने वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुका बाबत आता पुढील काळात बरीच रंगत वाढणार आहे.

दरम्यान समीर वर्तक यांनी वसई विरार महापालिका प्रशासना तथा निवडणूक आयोगाकडे प्रभाग रचने बाबत दोष त्रुटी व काही सूचनाही आयोगाला आयुक्तांच्या मार्फत केल्या होत्या मात्र निवडणूक आयोगाने 17 पैकी केवळ एकच हरकत मान्य करीत इतर सर्वच्या सर्व हरकती फेटाळून लावल्याने वर्तक यांनी महापालिका सहीत राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आणि दि.12 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात प्रत्यक्ष याचिका क्रं.94014/2020 ही दाखल करत वसई विरार महापालिका प्रशासनाने व त्याचे आयुक्त, राज्य निवडणूक आयोग,कोकण विभागीय आयुक्त, पालघर जिल्हाधिकारी आदींना प्रतिवादी केलं होतं.

परिणामी उच्च न्यायालयात पहिली सुनावणी दि.15 ऑक्टोबर ला पार पडली तर दुसरी सुनावणी  त्यानंतर दि.22 ऑक्टोबर रोजी पार पडली मात्र दोन्ही वेळी राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी सुनावणीसाठी गैरहजर राहिले,किंबहुना निवडणूक आयोगाने आमची प्रभाग रचना प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे सांगितले तर नंतर आम्हाला नोटीसच मिळाल्या नाही असा युक्तिवाद केला मात्र याचिकाकर्ते समीर वर्तक यांनी सर्व प्रतिवादीना नोटिसा ई-मेल द्वारे पोहचवल्याचे पुराव्या सहीत उच्च न्यायालयात स्पष्ट केल्याने 22 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला प्रभाग रचना कार्यक्रम पूर्ण झाला असे म्हणत असतील तर तसे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले मात्र दोन वेळा सांगून आदेश करून ही राज्य निवडणूक आयोगाने आजवर प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने अखेर मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी झालेल्या सुनावणी वेळी स्पष्ट शब्दांत  राज्य निवडणूक आयोग जोपर्यंत उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करीत नाही तोपर्यंत वसई विरार महापालिकेची निवडणुक प्रकिया राबविण्यास स्थगिती देण्यात येत असल्याचे मुंबई उच्च न्यायालयांने आदेशात म्हंटले असून पुढील सुनावणी दि.29 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे वर्तक यांनी सांगितले.

याचिकाकर्ते समीर वर्तक यांनी उच्च न्यायालयातWRITT PETITION NO 94014/2020 दि.12 ऑक्टोबर रोजी दाखल केलेल्या याचिके बाबतीत आजवर घडलेल्या ठळक घडामोडी

15 ऑक्टोबर रोजी पहिली सुनावणी,  महानगरपालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश,

दि. 20ऑक्टोबर रोजी सुनावणी दरम्यान राज्य निवडणूक आयुक्तांना उपस्थित राहण्याचे आदेश.

दि.22ऑक्टोबर  राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी न्यायालयात याचिकेची कॉपी मिळाली नसल्याचे सांगितले.

आणि अखेर तिसऱ्या सुनावणीत दि.27 ऑक्टोबर राज्य निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश व  तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती.

पूू ढी ल सु ना व नी  दिनांक २९ ऑक्टोबर रोजी होणार.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार