शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

राज्य निवडणूक आयोग प्रतिज्ञापत्र सादर करीत नाही तोपर्यंत वसई विरार महापालिकेची निवडणुक प्रकिया राबविण्यास स्थगिती" - मुंबई उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 15:43 IST

Vasai Virar Election: समीर वर्तक यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

- आशिष राणे

वसई : राज्य निवडणूक आयोग जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करीत नाही तोपर्यंत वसई विरार शहर महापालिकेची संभाव्य सार्वत्रिक निवडणुकीची एकूणच  प्रकिया राबविण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दुपारी झालेल्या सुनावणी वेळीं या प्रक्रियेला स्थगिती आदेश दिल्याची माहिती देत पुढील सुनावणी दि.29 ऑक्टोबर म्हणजे च येत्या गुरुवारी होणार असल्याचे ही याचिकाकर्ते समीर वर्तक यांनी लोकमतला दिली.

अर्थातच एन कोविड काळात निवडणूक आयोगाच्या विरोधात जाऊन याचिकाकर्ते समीर वर्तक यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी  मुंबई उच्च न्यायालयाने तीन सुनावण्या अंती हा ऐतिहासिक निर्णय दिल्याने वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुका बाबत आता पुढील काळात बरीच रंगत वाढणार आहे.

दरम्यान समीर वर्तक यांनी वसई विरार महापालिका प्रशासना तथा निवडणूक आयोगाकडे प्रभाग रचने बाबत दोष त्रुटी व काही सूचनाही आयोगाला आयुक्तांच्या मार्फत केल्या होत्या मात्र निवडणूक आयोगाने 17 पैकी केवळ एकच हरकत मान्य करीत इतर सर्वच्या सर्व हरकती फेटाळून लावल्याने वर्तक यांनी महापालिका सहीत राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आणि दि.12 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात प्रत्यक्ष याचिका क्रं.94014/2020 ही दाखल करत वसई विरार महापालिका प्रशासनाने व त्याचे आयुक्त, राज्य निवडणूक आयोग,कोकण विभागीय आयुक्त, पालघर जिल्हाधिकारी आदींना प्रतिवादी केलं होतं.

परिणामी उच्च न्यायालयात पहिली सुनावणी दि.15 ऑक्टोबर ला पार पडली तर दुसरी सुनावणी  त्यानंतर दि.22 ऑक्टोबर रोजी पार पडली मात्र दोन्ही वेळी राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी सुनावणीसाठी गैरहजर राहिले,किंबहुना निवडणूक आयोगाने आमची प्रभाग रचना प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे सांगितले तर नंतर आम्हाला नोटीसच मिळाल्या नाही असा युक्तिवाद केला मात्र याचिकाकर्ते समीर वर्तक यांनी सर्व प्रतिवादीना नोटिसा ई-मेल द्वारे पोहचवल्याचे पुराव्या सहीत उच्च न्यायालयात स्पष्ट केल्याने 22 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला प्रभाग रचना कार्यक्रम पूर्ण झाला असे म्हणत असतील तर तसे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले मात्र दोन वेळा सांगून आदेश करून ही राज्य निवडणूक आयोगाने आजवर प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने अखेर मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी झालेल्या सुनावणी वेळी स्पष्ट शब्दांत  राज्य निवडणूक आयोग जोपर्यंत उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करीत नाही तोपर्यंत वसई विरार महापालिकेची निवडणुक प्रकिया राबविण्यास स्थगिती देण्यात येत असल्याचे मुंबई उच्च न्यायालयांने आदेशात म्हंटले असून पुढील सुनावणी दि.29 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे वर्तक यांनी सांगितले.

याचिकाकर्ते समीर वर्तक यांनी उच्च न्यायालयातWRITT PETITION NO 94014/2020 दि.12 ऑक्टोबर रोजी दाखल केलेल्या याचिके बाबतीत आजवर घडलेल्या ठळक घडामोडी

15 ऑक्टोबर रोजी पहिली सुनावणी,  महानगरपालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश,

दि. 20ऑक्टोबर रोजी सुनावणी दरम्यान राज्य निवडणूक आयुक्तांना उपस्थित राहण्याचे आदेश.

दि.22ऑक्टोबर  राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी न्यायालयात याचिकेची कॉपी मिळाली नसल्याचे सांगितले.

आणि अखेर तिसऱ्या सुनावणीत दि.27 ऑक्टोबर राज्य निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश व  तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती.

पूू ढी ल सु ना व नी  दिनांक २९ ऑक्टोबर रोजी होणार.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार