शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पाचूबंदर स्मशानभूमीला रात्री टाळे

By admin | Updated: March 16, 2017 02:42 IST

पाचूबंदर येथील महापालिकेच्या स्मशानभूमीला रात्री आठ वाजताच टाळे लावले जात असल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे

शशी करपे, वसईपाचूबंदर येथील महापालिकेच्या स्मशानभूमीला रात्री आठ वाजताच टाळे लावले जात असल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. सदर स्मशानभूमीच्या देखभाल दुरुस्तीचे काम महिला बचत गटाकडे सोपवण्यात आल्यापासून आठ वाजता स्मशानभूमी बंद केली जात असल्याने अंत्यसंस्कार करण्याऱ्यांना रात्री गेटबाहेर थांबावे लागत आहे.वसई विरार महापालिकेच्या सर. डी. एम. पेटीट हॉस्पीटलमध्ये गेल्या आठवड्यात चंद्रीका शर्मा ही महिला प्रसुत झाली. मात्र, प्रसुतीनंतर लगेचच बाळाचा मृत्यु झाला. यावेळी रात्रीचे अकरा वाजले होते. हॉस्पीटलमध्ये जबाबदार डॉक्टर नव्हते. त्याठिकाणी असलेल्या नर्सने मृत बाळ वडिलांच्या ताब्यात दिले. मृत बाळ नवजात असल्याने वडिल आपल्या नातेवाईकांसह रात्री बाराच्या सुमारास पाचूबंदर स्मशानभूमीत गेले. मात्र, स्मशानभूमीचे गेट बंद होते आणि त्याला टाळे लावण्यात आले होते. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह हातात घेऊन त्या लोकांना तब्बल तीन तास गेटबाहेर ताटकळत बसून रहावे लागले. गेल्या चार महिन्यातील ही तिसरी घटना. रात्री आठनंतर अंत्यसंस्काराला गेलेल्या दोन मृतदेहांना अशीच वाट पहावी लागली होती. दोन महिन्यांपूर्वी तर संतप्त लोकांनी स्मशानभूमीचे टाळे तोडून अंत्यसंस्कार उरकले होते. याची तक्रार आयुक्त सतीश लोखंडे यांच्याकडे दोन वेळा करण्यात आली होती. मात्र, त्यांनी आश्वासन देऊनही कोणतीच कारवाई झाली नाही, अशी माहिती भाजपाचे वसई शहर युवकचे उपाध्यक्ष सुशील ओगले यांनी दिली. तत्कालीन वसई नगरपरिषेदपासून पंधरा वर्षे याठिकाणी ठेका पद्धतीवर एक सुरक्षा रक्षक नेमण्यात आला होता. त्याला जवळच एक खोलीही बांधून देण्यात आली होती. सुरक्षा रक्षक चोवीस तास असल्याने रात्री अपरात्री स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करता येत होते. पण, आता सुरक्षा रक्षक काढून टाकण्यात आला आहे. त्याऐवजी स्मशानभूमीची देखभाल दुरुस्तीचे काम एका महिला बचत गटाला देण्यात आले आहे. त्यामुळे रात्री आठ वाजतानंतर सुरक्षा रक्षक नसल्याने स्मशानभूमीच्या गेटला टाळे लावले जाते. त्यामुळे पाचूबंदर परिसरातील गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येतो. हा प्रकार अतिशय गंभीर असून त्याची सखोल चौकशी केली जाईल, असे उपमहापौर उमेश नाईक यांनी दिले. तसेच याप्रकरणी लक्ष घालून असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी काळजी घेण्यात यावी असे प्रभाग समिती आयचे सभापती प्रवीण शेट्टी सूचना दिल्या.