शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

पाचूबंदर स्मशानभूमीला रात्री टाळे

By admin | Updated: March 16, 2017 02:42 IST

पाचूबंदर येथील महापालिकेच्या स्मशानभूमीला रात्री आठ वाजताच टाळे लावले जात असल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे

शशी करपे, वसईपाचूबंदर येथील महापालिकेच्या स्मशानभूमीला रात्री आठ वाजताच टाळे लावले जात असल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. सदर स्मशानभूमीच्या देखभाल दुरुस्तीचे काम महिला बचत गटाकडे सोपवण्यात आल्यापासून आठ वाजता स्मशानभूमी बंद केली जात असल्याने अंत्यसंस्कार करण्याऱ्यांना रात्री गेटबाहेर थांबावे लागत आहे.वसई विरार महापालिकेच्या सर. डी. एम. पेटीट हॉस्पीटलमध्ये गेल्या आठवड्यात चंद्रीका शर्मा ही महिला प्रसुत झाली. मात्र, प्रसुतीनंतर लगेचच बाळाचा मृत्यु झाला. यावेळी रात्रीचे अकरा वाजले होते. हॉस्पीटलमध्ये जबाबदार डॉक्टर नव्हते. त्याठिकाणी असलेल्या नर्सने मृत बाळ वडिलांच्या ताब्यात दिले. मृत बाळ नवजात असल्याने वडिल आपल्या नातेवाईकांसह रात्री बाराच्या सुमारास पाचूबंदर स्मशानभूमीत गेले. मात्र, स्मशानभूमीचे गेट बंद होते आणि त्याला टाळे लावण्यात आले होते. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह हातात घेऊन त्या लोकांना तब्बल तीन तास गेटबाहेर ताटकळत बसून रहावे लागले. गेल्या चार महिन्यातील ही तिसरी घटना. रात्री आठनंतर अंत्यसंस्काराला गेलेल्या दोन मृतदेहांना अशीच वाट पहावी लागली होती. दोन महिन्यांपूर्वी तर संतप्त लोकांनी स्मशानभूमीचे टाळे तोडून अंत्यसंस्कार उरकले होते. याची तक्रार आयुक्त सतीश लोखंडे यांच्याकडे दोन वेळा करण्यात आली होती. मात्र, त्यांनी आश्वासन देऊनही कोणतीच कारवाई झाली नाही, अशी माहिती भाजपाचे वसई शहर युवकचे उपाध्यक्ष सुशील ओगले यांनी दिली. तत्कालीन वसई नगरपरिषेदपासून पंधरा वर्षे याठिकाणी ठेका पद्धतीवर एक सुरक्षा रक्षक नेमण्यात आला होता. त्याला जवळच एक खोलीही बांधून देण्यात आली होती. सुरक्षा रक्षक चोवीस तास असल्याने रात्री अपरात्री स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करता येत होते. पण, आता सुरक्षा रक्षक काढून टाकण्यात आला आहे. त्याऐवजी स्मशानभूमीची देखभाल दुरुस्तीचे काम एका महिला बचत गटाला देण्यात आले आहे. त्यामुळे रात्री आठ वाजतानंतर सुरक्षा रक्षक नसल्याने स्मशानभूमीच्या गेटला टाळे लावले जाते. त्यामुळे पाचूबंदर परिसरातील गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येतो. हा प्रकार अतिशय गंभीर असून त्याची सखोल चौकशी केली जाईल, असे उपमहापौर उमेश नाईक यांनी दिले. तसेच याप्रकरणी लक्ष घालून असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी काळजी घेण्यात यावी असे प्रभाग समिती आयचे सभापती प्रवीण शेट्टी सूचना दिल्या.