शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
2
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
3
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
4
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
5
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
6
"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण
7
ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा
8
Aastha Poonia : आकाशाला गवसणी! नौदलाची पहिली महिला फायटर पायलट; 'विंग्स ऑफ गोल्ड'ने सन्मान
9
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
10
'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर?
11
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...
12
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
13
भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
14
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
15
Guru Purnima 2025: स्वामी समर्थांची 'ही' एक शिकवण बदलून टाकेल आपले आयुष्य!
16
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
17
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
18
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
19
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
20
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."

तलावाचे काम युद्धपातळीवर सुरू; डिसेंबरपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 23:36 IST

महापौरांच्या आदेशानंतर जलतरण तलाव लवकरच सुरू होणार

- आशिष राणे वसई : वसई-विरार शहर महापलिकेचा नवघर माणिकपूर येथील ओमनगर भागातील आॅलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव लवकरच सुरू होणार आहे. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत महापौरांनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.डिसेंबर २०१९ पासून दुरुस्तीच्या कामासाठी हा तलाव बंद ठेवण्यात आला होता. आता या आठवड्यात पाणी फिल्टरेशनचे काम पूर्ण होताच हा तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती ‘एच’ प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त गिलसन घोन्सालवीस यांनी ‘लोकमत’ला दिली.या संदर्भात नागरिकांची तक्र ार आल्यावर २० डिसेंबर रोजी त्याची पाहणी केली असता, या तलावाला गळती लागल्याचे लक्षात आले होते. याकडे कोणी लक्ष देत नाही, असे दिसल्यावर ‘लोकमत’ने २० डिसेंबरच्या अंकात ‘दररोज शेकडो लिटर पाणी वाया’ असे वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर महापौर प्रवीण शेट्टी यांनी लागलीच युद्ध पातळीवर या जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.ज्यांनी वर्षभराचे पास काढले आहेत, त्यांना याचा आर्थिक फटका बसू नये, त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी बंद असलेल्या काळातील दिवस भरून मिळतील, असे आश्वासनही महापौर शेट्टी यांनी दिले आहे.दरम्यान, डिसेंबरमध्ये या तरणतलावाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने गळती लागून यातून मोठ्या प्रमाणात हजारो लिटर पाणी वाहून जात असल्याचे समोर आले होते. ही गळती होत असलेल्या भागाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी पालिका तसेच स्विमिंग पुलाच्या व्यवस्थापनाकडे केली होती.त्यानुसार, या तरणतलावाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र दुरुस्तीचे काम हाती घेऊन नेमकी गळती कुठून होत आहे याचा बोध होत नव्हता. आणि बांधकाम तसेच पाणी खाते यांच्यात या दुरुस्तीवरून तू - तू - मैं - मैं होत होती.‘लोकमत’ने वृत्त छापल्यानंतर महापौरांनी तत्काळ कार्यवाही करत या दोन्ही विभागाला धारेवर धरत काम सुरू केले.महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात, पोहण्यास येणाऱ्या नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले. यात ज्यांनी सहा महिने आणि वर्षभराचा पास काढला, त्यांचे दोन महिन्यांचे पैसे वाया गेले.वसई पश्चिमेतील नवघर माणिकपूर परिसरात महापालिकेतर्फे २५ बाय १५ मीटर सें.मी. लांबीचा आॅलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव तयार करण्यात आला आहे. येथे सकाळ व संध्याकाळी नागरिक येतात.एप्रिल २०१९ मध्ये याच तलावात बुडून एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून हा तलाव पोहण्यासाठी बंद करण्यात आला.त्यानंतर पोलीस आणि महापालिका आयुक्तांच्या चौकशीनंतर आॅक्टोबर २०१९ मध्ये हा तरणतलाव महापालिकेने पुन्हा सुरू केला होता.