शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

अर्नाळ्यातील महात्मा गांधी स्मारकाची दुर्दशा

By admin | Updated: May 28, 2017 02:57 IST

अर्नाळा समुद्रकिनारी वैतरणेच्या त्रिवेणी संगमावर महात्मा गांधींच्या अस्थि विसर्जनानंतर तयार करण्यात आलेल्या स्मारकाची दारूण दुर्दशा झाली आहे. याठिकाणी दारुडे पार्ट्या झोडतात.

- शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : अर्नाळा समुद्रकिनारी वैतरणेच्या त्रिवेणी संगमावर महात्मा गांधींच्या अस्थि विसर्जनानंतर तयार करण्यात आलेल्या स्मारकाची दारूण दुर्दशा झाली आहे. याठिकाणी दारुडे पार्ट्या झोडतात. बेवारस कुत्र्यांनी आश्रय घेतला आहे. तर साफसफाई होत नसल्याने चोहोबाजूंला घाणीचे साम्राज्य पसरले आहे. राष्ट्र्पिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांच्या अस्थींचे ८ जानेवारी १९४८ रोजी अर्नाळा समुद्रकिनारी असलेल्या अर्नाळा-वैतरणेच्या त्रिवेणी संगमावर विसर्जन करण्यात आले होते. त्याची आठवण कायम रहावी यासाठी त्याठिकाणी हे स्मारक बांधण्यात आले होते. मात्र, त्याकडे सगळ्यांचेच दुर्लक्ष झाल्याने त्याचे पावित्र्यच धोक्यात आले आहे.गांधी स्मारकाच्या वास्तूची निगा राखण्यासाठी कायमस्वरुपी रखवालदार नाही. त्यामुळे याठिकाणी दारुडे खुलेआम दारु पित बसलेले असतात. स्मारकाच्या आवारात दारुच्या रिकाम्या बाटल्या आणि खाद्यपदार्थांची रिकामी पाकिटे फेकलेली आढळून येतात. भिकारी, गर्दुल्ले यांचा याठिकाणी नेहमी राबता असतो. भटक्या कुत्र्यांनी तर स्मारक आपले निवासस्थान बनवले आहे. नियमित सफाई केली जात नसल्याने केरकचरा साचलेला दिसून येतो. मात्र, स्मारकाची कुणीच निगा राखत नसल्याने त्याचे पावित्र्य धोक्यात आले आहे.मध्यंतरी याठिकाणी चोहोबाजूंनी झाडावेलांनी वेढले होते. त्यावर मिडीयातून आवाज उठवल्यानंतर परिसर स्वच्छ करण्यात आला होता. त्यावेळी अनेक पुढारी आणि पक्षांनी स्वच्छता राखण्याच्या वल्गना केल्या होत्या. पण, दोन वर्षांनंतर स्मारक पुन्हा एकदा अपेक्षिताचे जिणे जगू लागले आहे. गांधी जयंतीच्या दिवशी याठिकाणी स्वच्छता केली जाते. त्यानंतर मात्र याठिकाणी कुणी फिरकतदेखिल नाही. महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जनानंतर या परिसराचे पावित्र्य जपण्यासाठी बांधण्यात आलेल्या स्मारकाचे पावित्र्य जपण्यात यावे. याठिकाणी कायमस्वरुपी रखवालदार नेमण्यात यावा. स्मारक परिसराची नियमितपणे स्वच्छता करण्यात यावी. अन्यथा आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते,ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रेय कराळे यांनी दिला आहे.