शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अर्नाळ्यातील महात्मा गांधी स्मारकाची दुर्दशा

By admin | Updated: May 28, 2017 02:57 IST

अर्नाळा समुद्रकिनारी वैतरणेच्या त्रिवेणी संगमावर महात्मा गांधींच्या अस्थि विसर्जनानंतर तयार करण्यात आलेल्या स्मारकाची दारूण दुर्दशा झाली आहे. याठिकाणी दारुडे पार्ट्या झोडतात.

- शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : अर्नाळा समुद्रकिनारी वैतरणेच्या त्रिवेणी संगमावर महात्मा गांधींच्या अस्थि विसर्जनानंतर तयार करण्यात आलेल्या स्मारकाची दारूण दुर्दशा झाली आहे. याठिकाणी दारुडे पार्ट्या झोडतात. बेवारस कुत्र्यांनी आश्रय घेतला आहे. तर साफसफाई होत नसल्याने चोहोबाजूंला घाणीचे साम्राज्य पसरले आहे. राष्ट्र्पिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांच्या अस्थींचे ८ जानेवारी १९४८ रोजी अर्नाळा समुद्रकिनारी असलेल्या अर्नाळा-वैतरणेच्या त्रिवेणी संगमावर विसर्जन करण्यात आले होते. त्याची आठवण कायम रहावी यासाठी त्याठिकाणी हे स्मारक बांधण्यात आले होते. मात्र, त्याकडे सगळ्यांचेच दुर्लक्ष झाल्याने त्याचे पावित्र्यच धोक्यात आले आहे.गांधी स्मारकाच्या वास्तूची निगा राखण्यासाठी कायमस्वरुपी रखवालदार नाही. त्यामुळे याठिकाणी दारुडे खुलेआम दारु पित बसलेले असतात. स्मारकाच्या आवारात दारुच्या रिकाम्या बाटल्या आणि खाद्यपदार्थांची रिकामी पाकिटे फेकलेली आढळून येतात. भिकारी, गर्दुल्ले यांचा याठिकाणी नेहमी राबता असतो. भटक्या कुत्र्यांनी तर स्मारक आपले निवासस्थान बनवले आहे. नियमित सफाई केली जात नसल्याने केरकचरा साचलेला दिसून येतो. मात्र, स्मारकाची कुणीच निगा राखत नसल्याने त्याचे पावित्र्य धोक्यात आले आहे.मध्यंतरी याठिकाणी चोहोबाजूंनी झाडावेलांनी वेढले होते. त्यावर मिडीयातून आवाज उठवल्यानंतर परिसर स्वच्छ करण्यात आला होता. त्यावेळी अनेक पुढारी आणि पक्षांनी स्वच्छता राखण्याच्या वल्गना केल्या होत्या. पण, दोन वर्षांनंतर स्मारक पुन्हा एकदा अपेक्षिताचे जिणे जगू लागले आहे. गांधी जयंतीच्या दिवशी याठिकाणी स्वच्छता केली जाते. त्यानंतर मात्र याठिकाणी कुणी फिरकतदेखिल नाही. महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जनानंतर या परिसराचे पावित्र्य जपण्यासाठी बांधण्यात आलेल्या स्मारकाचे पावित्र्य जपण्यात यावे. याठिकाणी कायमस्वरुपी रखवालदार नेमण्यात यावा. स्मारक परिसराची नियमितपणे स्वच्छता करण्यात यावी. अन्यथा आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते,ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रेय कराळे यांनी दिला आहे.