शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पालघर जिल्ह्यातील १२ गावांच्या विकासाचे नियोजन; ठाणे, रायगड जिल्ह्यांतील गावांचाही समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 06:24 IST

मुंबई महानगर प्रदेशाला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यांतील १२ गावांच्या विकास आराखड्याला राज्य शासनाने गुरूवारी मंजुरी दिली. वाडा, मोखाडा, विक्रमगड, तलासरी आणि वसई तालुक्यांतील १२ गावांचा यात समावेश आहे.

- नारायण जाधव।ठाणे : मुंबई महानगर प्रदेशाला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यांतील १२ गावांच्या विकास आराखड्याला राज्य शासनाने गुरूवारी मंजुरी दिली. वाडा, मोखाडा, विक्रमगड, तलासरी आणि वसई तालुक्यांतील १२ गावांचा यात समावेश आहे. साधारणत: मुंबई महानगर प्रदेश अर्थात एमएमआरडीएला लागून असलेल्या आणि प्रस्तावित चार ग्रोथ सेंटर आणि सात एमआयडीसीसह मुंबई-दिल्ली औद्योगिक कॉरिडोर, मुंबई-नागपूर समृद्धी मार्ग, वसई-अलिबाग सुपर एक्स्प्रेस वे च्या विकासात मैलाचा दगड ठरणाºया परिसराचा या रायगड, ठाणे, पालघर या तिन्ही जिल्ह्यांच्या संयुक्त प्रादेशिक योजनेत समावेश करण्यात आला आहे.परिसरात बेसुमार होणारी अनधिकृत बांधकामे, त्यामुळे कोलमडणारे नियोजन, पायाभूत सुविधांवर येणारा ताण, याला आळा घालण्यासाठी तिन्ही जिल्ह्यांची ही संयुक्तिक प्रादेशिक योजना तयार करण्याचे आदेश नगरविकास विभागाने जुलै २०१६ मध्ये दिले होते. त्यानंतर, जानेवारी २०१७ मध्ये यासाठी ठाणे-पालघर-रायगड असे नियोजन मंडळ गठीत करण्यात आले. या मंडळानेच ही प्रादेशिक योजना तयार केली आहे.या प्रदेशातील २०११ च्या जनगणनेनुसारची १७ लाख ५१ हजार १४८ ही लोकसंख्या आणि २०३६ पर्यंतची प्रस्तावित २३ लाख ५५ हजार ५३४ लोकसंख्या गृहीत धरून ही प्रादेशिक योजना तयार करण्यात आली आहे.यात या प्रदेशातील विद्यमान गृहबांधणी, भविष्यातील निकड, जाणारे रस्ते, लोहमार्ग, नियोजित धरणे, प्रस्थापितांचे पुनर्वसन, नागरी आणि ग्रामीण नियोजन करण्यात आले आहे. यात ६९.६७ चौरस किलोमीटर, शेती आणि नाविकास क्षेत्र २९९८.६१ चौरस किलोमीटर, वनविभाग ३४१३.८२ चौरस किलोमीटर, औद्योगिक क्षेत्र ३४.८३, जलाशय ३४८.३५ चौरस किलोमीटर, कांदळवन, दलदल ५९.२२ चौरस किलोमीटर, सिडको आणि एमएसआरडीसीची प्रस्तावित टाउनशिप ५२.४६ चौरस किलोमीटर अशा एकूण ६९६६.९६ चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश आहे.सिडकोच्या प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नैना परिसरासाठी नगरविकास विभागाने हे तत्त्व सध्या लागू केले आहे. या ठिकाणी पायाभूत सुविधांसाठी ४० टक्के भूखंड घेऊन उर्वरित ६० टक्के वाढीव चटईक्षेत्रासह जमीनमालकास देत आहे.नगररचनेच्या माध्यमातून होणार विकासना नफा ना तोटा या तत्त्वावर जमीन विकास कार्यक्रम राबवण्याचे महाराष्ट्र नगरविकास अधिनियम १९६६ मधील तंत्र महाराष्ट्र शासनाने अवलंबले आहे. यात नगररचना योजना प्रक्रियेत प्रत्येक जमीनमालकास त्याच्या जमिनीपैकी काही हिस्सा हा रस्ते, पायाभूत आणि सार्वजनिक सुविधांसाठी ठेवून उर्वरित जमीन अंतिम विकास आराखड्यानुसार अंतिम भूखंड देण्यात येते. ही जमीन तो स्वत: विकसित करू शकतो किंवा विकू शकतो. यात त्याने पायाभूत सुविधांसाठी जी जमीन दिलेली असते, त्या पुरवल्यानंतर त्याला अंतिम भूखंड मिळालेल्या जमिनीचे बाजारमूल्य आपसूक वाढून त्याचा लाभ त्याला होतो, असे हे तत्त्व आहे.नवीन विकास कार्यक्रमांचे खासगीकरणप्रादेशिक योजनेतील नवीन टाउनशिप आणि रहिवासी सुविधांचा विकास खासगी विकासकांच्या माध्यमातूनही करता येणार आहे. शिवाय, पुण्याच्या मगरपट्टा सिटीच्या धर्तीवर सहकार क्षेत्राच्या माध्यमातूनही ती बांधता येणार आहे.

टॅग्स :thaneठाणे