शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

विरार, डहाणू चौपदरीकरणार्थ याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 06:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : विरार-डहाणू चौपदकरणाचे काम तात्काळ मार्गी लागावे यासाठी माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे.चर्चगेट-डहाणू दरम्यान लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र, सध्या प्रवाशांची संख्या पाहता लोकलच्या सेवा वाढणे आवश्यक आहे. मात्र, विरार-डहाणू चौपदरीकरण होत नाही तोपर्यंत लोकल सेवा वाढण्याची शक्यता ...

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : विरार-डहाणू चौपदकरणाचे काम तात्काळ मार्गी लागावे यासाठी माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे.चर्चगेट-डहाणू दरम्यान लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र, सध्या प्रवाशांची संख्या पाहता लोकलच्या सेवा वाढणे आवश्यक आहे. मात्र, विरार-डहाणू चौपदरीकरण होत नाही तोपर्यंत लोकल सेवा वाढण्याची शक्यता फारच कमी आहे. सध्या विरार ते डहाणू परिसरात राहणारे चाकरमनी, विद्यार्थी, शेतकरी व्यापारी, शिक्षक, शेतकरी याना दररोज अफाट गर्दीचा सामना करीत लोकल प्रवास करावा लागत आहे. दुपदरी मार्गावर लांब पल्ल्यांच्या मेल आणि मालवाहून गाड्यांना प्राधान्य दिले जाते. त्यासाठी लोकल गाड्यांना थांबवून ठेवण्यात येते. म्हणूनच या मार्गाचे चौपदरीकरण व्हावे यासाठी चोरघे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. पालघर जिल्हा अस्तित्वात आल्याने याठिकाणच्या विकासाला चालना मिळणार आहे. मात्र, जिल्ह्याच्या विकासाला खºया अर्थाने चालना द्यायची असल्यास चौपदरीकरण होऊन लोकल गाड्यांची संख्या वाढणे गरजेचे आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.पश्चिम रेल्वेद्वारे विरार-डहाणू लोहमार्गाच्या चौपदरीकरणाचे सध्या नियोजन करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही, अशी माहिती अधिकारात रेल्वेकडून देण्यात आलेली आहे.चौपदरीकरणाचे काम प्रस्तावित असले तरी त्याला अद्याप मंजूरी मिळालेली नाही. ती नसल्याने त्यासाठी निधीची तरतूदही केली गेलेली नाही. ती कधी होणार याची निश्चिती नाही. याकामासाठी येणाºया खर्चाचा भार रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार उचलणार आहे. असे असले तरी कामाच्या शुभारंभाची निश्चिती नाहीच. त्यामुळे याचिकाकर्त्याने हायकोर्टात धाव घेतली आहे.विरार-डहाणू चौपदरी प्रकल्पासाठी ३ हजार ५५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे रेल्वेकडून २०११ साली सांगण्यात आले होते.मात्र, गेल्या सहा वर्षांत प्रकल्पाबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याने आता प्रकल्पाचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढला आहे.या प्रकल्पाला मंजूरी मिळाली असल्याचे दोन महिन्यांपूर्वी जाहिर करण्यात आले होते.मात्र, इतक्या प्रचंड खर्चाचा प्रकल्प रेल्वे मंत्रालय तत्परतेने मार्गी लावेल की नाही याबद्दलच शंका व्यक्त करण्यात येते.